शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

मासळ परिसरात अजूनही वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:58 IST

तालुक्यातील कोलारा (तु), मासळ(बु), मासळ(तु), मानेमोहाळी परिसरात अद्यापही वाघाचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये वाघाची दहशत कायम आहे. या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी सदर गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे वनमंत्र्यांना निवेदन : बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ बु.: तालुक्यातील कोलारा (तु), मासळ(बु), मासळ(तु), मानेमोहाळी परिसरात अद्यापही वाघाचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये वाघाची दहशत कायम आहे. या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी सदर गावातील ग्रामस्थांनी केली आहे.या संदर्भात ग्रामस्थांनी वनमंत्री सुधीर मुंनगंटीवार, श्रेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांना निवेदन दिले आहे. मासळ बु येथील अमरनाथ गंधरे यांच्या शेतात, पटेदार वाघाने एक बैल मारला तर एक गंभीर जखमी केला. दुसºया दिवसी शामराव धारणे यांच्या बैलाची शिकार केली. अडेगाव म्हसली येथील शेतकºयाचे दोन बैल मारले, तुकुम येथील अशोक खिरडकर यांच्या गायीला ठार मारले, दिलीप सूर यांच्या गायीवरही हल्ला करून ठार केले. मागील दोन महिन्यांपासून तुकुम येथील तलावात वाघ वास्तव्य करीत असल्याचे अनेकांना दिसले आहे. मात्र वन विभाग येतो, पाहतो व पंचनामा करतो. त्याउपरही कुठलीही ठोस उपाययोजना वनविभागाने केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती कायम आहे. निवेदन देताना अमरनाथ गंधारे, प्रदिप गंधारे, दिलीप गंधारे, अकाश बोरकर, सागर सुखदेव, भावराव सूर, विकास गरमडे, वंसता झापे, देवनाथ वावरे, ग्रामपंचायत मासळ, वनहक्क समितीचे सदस्य, ग्राम सुरक्षा रक्षक दलाचे सदस्य उपस्थित होते.वाघाचे वारंवार दर्शनअनेकाना शेतात, रस्त्यावर वाघाचे दर्शन होत आहे. काही दिवसांपूर्वी मानेमोहाळी येथील सुभाष कराळे वाघाच्या हल्ल्यात थोडक्यात बचावले. ही घटना समोर आली, तेव्हापासून मासळ बु. परिसरातील नागरिकामध्ये वाघाची दहशत पसरली आहे.सौरकुंपण करावेजंगलातील हिंस्र प्राणी सध्या शिकार व पाण्याच्या शोधात गावात येत आहेत. या वन्यप्राण्यांना गावात येण्यापासून रोखण्यासाठी सौर कुंपण करणे गरजेचे आहे. मात्र याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे गावात येऊन वाघाने बैलाची शिकार करणे सुरूच ठेवले आहे. शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे शेतकामे खोळंबली आहेत. मासळ बु परिसरातील नागरिकामध्ये चांगलीच धास्ती भरली आहे.मासळ बु परिसरात दोन महिन्यांपासून वाघ पाळीव जनावरांवर हल्ला करीत आहे. तरीही वनविभाग सुस्तच आहे. अनेकांची जनावरे वाघाने मारली आहेत. शासनाकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. वनविभागाने सर्वप्रथम वाघाचा बंदोबस्त करावा.- अमरनाथ गंधारे, शेतकरी, मासळ बु.