शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

मासळ परिसरात अजूनही वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:58 IST

तालुक्यातील कोलारा (तु), मासळ(बु), मासळ(तु), मानेमोहाळी परिसरात अद्यापही वाघाचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये वाघाची दहशत कायम आहे. या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी सदर गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे वनमंत्र्यांना निवेदन : बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ बु.: तालुक्यातील कोलारा (तु), मासळ(बु), मासळ(तु), मानेमोहाळी परिसरात अद्यापही वाघाचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये वाघाची दहशत कायम आहे. या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी सदर गावातील ग्रामस्थांनी केली आहे.या संदर्भात ग्रामस्थांनी वनमंत्री सुधीर मुंनगंटीवार, श्रेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांना निवेदन दिले आहे. मासळ बु येथील अमरनाथ गंधरे यांच्या शेतात, पटेदार वाघाने एक बैल मारला तर एक गंभीर जखमी केला. दुसºया दिवसी शामराव धारणे यांच्या बैलाची शिकार केली. अडेगाव म्हसली येथील शेतकºयाचे दोन बैल मारले, तुकुम येथील अशोक खिरडकर यांच्या गायीला ठार मारले, दिलीप सूर यांच्या गायीवरही हल्ला करून ठार केले. मागील दोन महिन्यांपासून तुकुम येथील तलावात वाघ वास्तव्य करीत असल्याचे अनेकांना दिसले आहे. मात्र वन विभाग येतो, पाहतो व पंचनामा करतो. त्याउपरही कुठलीही ठोस उपाययोजना वनविभागाने केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती कायम आहे. निवेदन देताना अमरनाथ गंधारे, प्रदिप गंधारे, दिलीप गंधारे, अकाश बोरकर, सागर सुखदेव, भावराव सूर, विकास गरमडे, वंसता झापे, देवनाथ वावरे, ग्रामपंचायत मासळ, वनहक्क समितीचे सदस्य, ग्राम सुरक्षा रक्षक दलाचे सदस्य उपस्थित होते.वाघाचे वारंवार दर्शनअनेकाना शेतात, रस्त्यावर वाघाचे दर्शन होत आहे. काही दिवसांपूर्वी मानेमोहाळी येथील सुभाष कराळे वाघाच्या हल्ल्यात थोडक्यात बचावले. ही घटना समोर आली, तेव्हापासून मासळ बु. परिसरातील नागरिकामध्ये वाघाची दहशत पसरली आहे.सौरकुंपण करावेजंगलातील हिंस्र प्राणी सध्या शिकार व पाण्याच्या शोधात गावात येत आहेत. या वन्यप्राण्यांना गावात येण्यापासून रोखण्यासाठी सौर कुंपण करणे गरजेचे आहे. मात्र याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे गावात येऊन वाघाने बैलाची शिकार करणे सुरूच ठेवले आहे. शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे शेतकामे खोळंबली आहेत. मासळ बु परिसरातील नागरिकामध्ये चांगलीच धास्ती भरली आहे.मासळ बु परिसरात दोन महिन्यांपासून वाघ पाळीव जनावरांवर हल्ला करीत आहे. तरीही वनविभाग सुस्तच आहे. अनेकांची जनावरे वाघाने मारली आहेत. शासनाकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. वनविभागाने सर्वप्रथम वाघाचा बंदोबस्त करावा.- अमरनाथ गंधारे, शेतकरी, मासळ बु.