शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

बाधित तरुण हजाराच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दैनंदिन व्यवहारही सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र समाजात वावरताना तरुणवर्ग बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. कोरोना वगैरे काही नाही, आपल्याला कोरोनाची बाधा होत नाही, अशा अविर्भावात अनेक तरुणमंडळी वावरताना दिसतात. त्यामुळे संपर्कातून त्यांनाच कोरोनाची अधिक बाधा होत आहे.

ठळक मुद्देतरुणांनो सावधान : कोरोना नियमांचे करा पालन, अन्यथा परिस्थिती जाईल हाताबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग सध्या जिल्ह्यात झपाटाने वाढत आहे. विशेष म्हणजे हा संसर्ग तरुणांमगध्ये अधिक होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वयांचा विचार केला तर १९ ते ४० या वयोगटातील बाधितांच्या संख्या हजाराच्या आसपास पोहचली आहे. या वयोगटात तब्बल ९८४ जण बाधित झाले आहे. एकूण १७९९ रुग्णांच्या तुलनेत ही टक्केवारी ६० टक्क्याहून अधिक आहे.यावरून तरुणांनाच कोरोनाची अधिक बाधा होत असल्याने तरुणांनी आता गंभीर होणे गरजेचे झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दैनंदिन व्यवहारही सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र समाजात वावरताना तरुणवर्ग बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. कोरोना वगैरे काही नाही, आपल्याला कोरोनाची बाधा होत नाही, अशा अविर्भावात अनेक तरुणमंडळी वावरताना दिसतात. त्यामुळे संपर्कातून त्यांनाच कोरोनाची अधिक बाधा होत आहे. एकूण १७९९ रुग्णांपैकी ९८४ रुग्ण १९ ते ४० वयोगटातील आहेत. तरुणांनीच आतागंभीर होणे गरजेचे झाले आहे.सोशल डिस्टन्सिंग गेले कुठे?चंद्रपूर जिल्ह्यात काही प्रमाणात शिथिलता असली तरी सध्या लॉकडाऊन सुरूच आहे. छोटेमोठे दुकानात, प्रतिष्ठानामध्ये, हॉटेल्स व इतर ठिकाणी संबंधितांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याही प्रतिष्ठानांमध्ये याचे पालन होताना दिसत नाही. याशिवाय नागरिकही नियमांचे पालन करताना दिसत नाही.मास्क नाकाच्या खालीघराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेषता वाहतूक पोलीस या नियमांचे सक्ती पालन करायला भाग पाडत आहे. मात्र अनेकजण कारवाइच्या भीतीने मास्क वापरताना दिसत आहे. अनेकजणांना मास्क कसा घालावा, हेदेखील कळालेले नाही, असे दिसते. अनेकजण मास्क नाकाच्या खाली उतरवून ठेवतात. मात्र अशाने संसर्गाचा धोका टळत नाही.१०८१ रुग्ण कोरोनामुक्तजिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या एक हजार १७९९ वर पोहोचली आहे. जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात अ‍ॅन्टिजेन चाचणी चालू असल्याने बाधितांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. मात्र यात समाधानाची बाब अशी की या आजारातून बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत १०८१ बाधित उपचाराअंती बरे होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. ही टक्केवारी ६० टक्क्याहून अधिक आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या