शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कोठारीत तीन वर्षांपासून नळ योजना ठप्प

By admin | Updated: May 29, 2014 23:55 IST

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांना पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र ग्रामपंचायत कमेटी व प्रशासनाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने

सुरेश रंगारी - कोठारीबल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांना पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र ग्रामपंचायत कमेटी व प्रशासनाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे.१५ हजार लोकवस्ती असलेले कोठारी गाव मागील दहा वर्षापासून पाण्यासाठी संघर्ष करीत आहे. १९८४ मध्ये अस्तित्वात आलेली नळ योजना सध्या कुचकामी ठरली आहे. वीज देयकाचे सात लाख रुपये ग्रामपंचायतीने भरले नाही. त्यामुळे वीज पुरवठा तीन वर्षापासून खंडीत आहे. कोठारी नाल्यावर असलेली नळ योजनेची विहीर कोरडी पडली आहे. पाणी  पुरवठा करणारे मोटर पंप त्याच विहिरीत दोन वर्षापासून पडून सडत आहे. ते बाहेर काढण्याचे सौजन्य ग्रामपंचायतीने आजवर दाखविले नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी तीन कूपनलिका शासनाने खोदल्या. मात्र त्याही बंद आहेत. तांत्रिक दोष दाखवून ग्रा.पं. प्रशासनाने हात झटकले आहेत, गावात ६५ हातपंप आहेत. मात्र त्यातील पाच हातपंप  निकामी झाले आहेत. ६0 हातपंपावर गावाची तहाण भागविण्यात येत आहे. त्यातही अनेक हातपंपाची स्थिती चांगली नाही. अनेक हातपंपातून पाणीच येत नाही. गावातील चार विहिरीच पाणी वापरण्यायोग्य आहे. मात्र विहीरीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे गावातील महिला प्रचंड त्रस्त आहेत. पाण्यासाठी हातपंपावर पहाटेपासूनच महिलांची गर्दी उसळत असते. पाण्यासाठी महिलांच्या भांडणात वाढ होत आहे. दिवसभर मोलमजुरी करुन थकलेल्या महिला पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. मात्र ज्यांच्यावर विश्‍वास टाकून जनतेने  निवडून दिले, ते पदाधिकारी पाण्यासारख्या महत्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. पाण्यासाठी महिलांनी अनेकदा ग्रा.पं. कार्यालयावर समुहाने धडक देऊन  मागणी केली. मात्र थातूरमातूर कारवाई करण्याचे सांगून महिलांना हुसकावून लावण्यात येते. ग्रामपंचायतीमधील पदाधिकार्‍यांच्या या कामचुकार धोरणाचा फटका मात्र गावकर्‍यांना सहन करावा लागतो आहे.