शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

कोठारीत तीन वर्षांपासून नळ योजना ठप्प

By admin | Updated: May 29, 2014 23:55 IST

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांना पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र ग्रामपंचायत कमेटी व प्रशासनाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने

सुरेश रंगारी - कोठारीबल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांना पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र ग्रामपंचायत कमेटी व प्रशासनाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे.१५ हजार लोकवस्ती असलेले कोठारी गाव मागील दहा वर्षापासून पाण्यासाठी संघर्ष करीत आहे. १९८४ मध्ये अस्तित्वात आलेली नळ योजना सध्या कुचकामी ठरली आहे. वीज देयकाचे सात लाख रुपये ग्रामपंचायतीने भरले नाही. त्यामुळे वीज पुरवठा तीन वर्षापासून खंडीत आहे. कोठारी नाल्यावर असलेली नळ योजनेची विहीर कोरडी पडली आहे. पाणी  पुरवठा करणारे मोटर पंप त्याच विहिरीत दोन वर्षापासून पडून सडत आहे. ते बाहेर काढण्याचे सौजन्य ग्रामपंचायतीने आजवर दाखविले नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी तीन कूपनलिका शासनाने खोदल्या. मात्र त्याही बंद आहेत. तांत्रिक दोष दाखवून ग्रा.पं. प्रशासनाने हात झटकले आहेत, गावात ६५ हातपंप आहेत. मात्र त्यातील पाच हातपंप  निकामी झाले आहेत. ६0 हातपंपावर गावाची तहाण भागविण्यात येत आहे. त्यातही अनेक हातपंपाची स्थिती चांगली नाही. अनेक हातपंपातून पाणीच येत नाही. गावातील चार विहिरीच पाणी वापरण्यायोग्य आहे. मात्र विहीरीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे गावातील महिला प्रचंड त्रस्त आहेत. पाण्यासाठी हातपंपावर पहाटेपासूनच महिलांची गर्दी उसळत असते. पाण्यासाठी महिलांच्या भांडणात वाढ होत आहे. दिवसभर मोलमजुरी करुन थकलेल्या महिला पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. मात्र ज्यांच्यावर विश्‍वास टाकून जनतेने  निवडून दिले, ते पदाधिकारी पाण्यासारख्या महत्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. पाण्यासाठी महिलांनी अनेकदा ग्रा.पं. कार्यालयावर समुहाने धडक देऊन  मागणी केली. मात्र थातूरमातूर कारवाई करण्याचे सांगून महिलांना हुसकावून लावण्यात येते. ग्रामपंचायतीमधील पदाधिकार्‍यांच्या या कामचुकार धोरणाचा फटका मात्र गावकर्‍यांना सहन करावा लागतो आहे.