शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

ग्रामीण भागातील रस्त्यांचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:50 IST

रस्ते देशाच्या विकासाचे प्रतिक आहेत. रस्त्यावरुन देशाच्या विकासाची संकल्पना ठरविली जाते. स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनचे स्वप्न बघणाºया देशात नागरिकांना जायला धड रस्ता नाही.

ठळक मुद्देनागरिकांची पायपीट : जनतेचे हाल कायम, अपघातात झाली वाढ

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : रस्ते देशाच्या विकासाचे प्रतिक आहेत. रस्त्यावरुन देशाच्या विकासाची संकल्पना ठरविली जाते. स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनचे स्वप्न बघणाºया देशात नागरिकांना जायला धड रस्ता नाही. नागरिकांना कोसोदूर पायदळ पायपीट करावी लागते. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही नागरिकांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र तरीही नागरिकांच्या जिवाचे हाल थांबायला तयार नाही. बहुतांश ठिकाणी रस्त्यांचे तिनतेरा वाजल्याने अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य उजळणार कधी, हा जनतेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षानंतरही अनुत्तरीतच आहे. रस्ते आणि विकास हे दोन्ही शब्द अगदी जवळचे आहे. मात्र हे दोनही शब्द एकमेकांपासून कोसोदूर गेल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत सर्वेक्षण केले असता अनेक गावात जायला धड रस्ताच नसल्याचे दिसून आले.भोयगाव-कवठाळा, गोवरी-पोवनी, चिंचोली-साखरी, चिंचोली-कळमना, भोयगाव फाटा-अंतरगाव, आवाळपूर-हिरापूर, हिरापूर-अंतरगाव, चार्ली-निर्ली, अंतरगाव-वनोजा, नोकारी-नांदाफाटा, चारवट-माना, पाचगाव-पारधीगुडा या ग्रामीण भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावरुन चालताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.कवठळा- भोयगाव-धानोरा हा मार्ग तर खड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर एवढे खड्डे पडले आहेत की या मार्गावरुन प्रवास करणे नागरिकांच्या नाकीनऊ येत आहे. या रस्त्यावर मागील महिन्यात रस्त्यातच आॅटो उलटल्याची घटना घडली होती. यावरुन या रस्त्यावर किती मोठ्या प्रमाणात खड्डे असेल, याचा सहज अंदाज बांधता येतो. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे रस्ता अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यातील खड्डेच आता नागरिकांच्या जिवावर उठले आहे. मात्र सामान्य माणूस मेला काय नि वाचला काय, याचे कोणालाही सोयरसुतूक नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांची एवढी मोठी दूरवस्था झाली आहे की हजारो खड्डे नागरिकांच्या जिवाला कारणीभूत ठरत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत असेल तर या देशातील नागरिकांचे सर्वात मोठे दुर्दैव कोणते, हा प्रश्न आता सामान्य नागरिकांनाच छळायला लागला आहे.लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या सोडवाव्याराज्यात आणि केंद्रात भाजपा सरकार सतेत आहे. जनतेच्या समस्या सोडविण्याची संधी सरकारमधील लोकप्रतिनिधींना आहे. रस्ता ही नागरिकांची मुलभूत समस्या असताना याकडे सरकार गांभीर्याने का पाहत नाही, हा जनतेचा सवाल असून रस्त्याचे अच्छे दिन कधी येणार, हा खरा प्रश्न आहे.