शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

तीन टोलनाक्याचा चंद्रपूरकरांवर भार

By admin | Updated: June 16, 2014 23:25 IST

राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागातील देवळीनाका वगळता अन्य कुठलेही नाके बंद करण्यात आले नाही. चंद्रपूर- नागपूर मार्गावर तीन टोलनाके पडतात.

नागरिकांत संताप : चारचाकीला मोजावे लागतात अडीचशे रुपयेचंद्रपूर : राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागातील देवळीनाका वगळता अन्य कुठलेही नाके बंद करण्यात आले नाही. चंद्रपूर- नागपूर मार्गावर तीन टोलनाके पडतात. या तिन्ही नाक्यांवरुन एका चारचाकीधारकास तब्बल २५० रुपये मोजावे लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या या तिहेरी टोल भाराविरोधात नागिरकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूर ते नागपूरचे अंतर जवळपास १६० किमी आहे. या मार्गावर पूर्वी ताडाळी टोलच होता. याच टोलवर चारचाकी वाहनधारकास पैसे भरावे लागत होते. काही वर्षे हा एकमेव टोल सुरू होता. आज ही परिस्थिती बदलली आहे. तब्बल तीन टोलनाके चंद्रपूर- नागपूर मार्गावर उभारण्यात आले आहेत. यातून मोठी लूट वाहनधारकांची सुरू आहे. आज चंद्रपूर ते नागपूर खासगी वाहनाने प्रवास करावयाचा झाल्यास एका चारचाकीला किमान २५० रुपये मोजावे लागतात. बोरखेडी येथील नाक्यावर नागपूरच्या बाहेर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बायपास रस्त्याचाही टोल घेण्यात येतो. परंतु ज्यांना फक्त नागपुरातच जायचे आहे. त्यांनाही सूट देण्यात येत नाही. चौदा वर्षांपासून सुरू असलेला ताडाळीचा टोलनाका, नव्याचे उभारण्यात आलेला नंदोरी येथील टोेल आणि बोरखेडी येथील जादाचा टोलनाका, असा तिहेरी फटका चंद्रपूरकरांना बसत आहे. याविरोधात संतप्त प्रतिक्रियाही उमटत आहेत. याचा सर्वाधिक फटका येथील व्यापाऱ्यांना बसत आहे. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र नागपूर विभागातील एकमेव नाका बंद करण्यात आला. चंद्रपूर- नागपूर मार्गावरील एकही टोलनाके बंद न करण्यात आले नाही. (शहर प्रतिनिधी)