शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

तीन टोलनाक्याचा चंद्रपूरकरांवर भार

By admin | Updated: June 16, 2014 23:25 IST

राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागातील देवळीनाका वगळता अन्य कुठलेही नाके बंद करण्यात आले नाही. चंद्रपूर- नागपूर मार्गावर तीन टोलनाके पडतात.

नागरिकांत संताप : चारचाकीला मोजावे लागतात अडीचशे रुपयेचंद्रपूर : राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागातील देवळीनाका वगळता अन्य कुठलेही नाके बंद करण्यात आले नाही. चंद्रपूर- नागपूर मार्गावर तीन टोलनाके पडतात. या तिन्ही नाक्यांवरुन एका चारचाकीधारकास तब्बल २५० रुपये मोजावे लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या या तिहेरी टोल भाराविरोधात नागिरकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूर ते नागपूरचे अंतर जवळपास १६० किमी आहे. या मार्गावर पूर्वी ताडाळी टोलच होता. याच टोलवर चारचाकी वाहनधारकास पैसे भरावे लागत होते. काही वर्षे हा एकमेव टोल सुरू होता. आज ही परिस्थिती बदलली आहे. तब्बल तीन टोलनाके चंद्रपूर- नागपूर मार्गावर उभारण्यात आले आहेत. यातून मोठी लूट वाहनधारकांची सुरू आहे. आज चंद्रपूर ते नागपूर खासगी वाहनाने प्रवास करावयाचा झाल्यास एका चारचाकीला किमान २५० रुपये मोजावे लागतात. बोरखेडी येथील नाक्यावर नागपूरच्या बाहेर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बायपास रस्त्याचाही टोल घेण्यात येतो. परंतु ज्यांना फक्त नागपुरातच जायचे आहे. त्यांनाही सूट देण्यात येत नाही. चौदा वर्षांपासून सुरू असलेला ताडाळीचा टोलनाका, नव्याचे उभारण्यात आलेला नंदोरी येथील टोेल आणि बोरखेडी येथील जादाचा टोलनाका, असा तिहेरी फटका चंद्रपूरकरांना बसत आहे. याविरोधात संतप्त प्रतिक्रियाही उमटत आहेत. याचा सर्वाधिक फटका येथील व्यापाऱ्यांना बसत आहे. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र नागपूर विभागातील एकमेव नाका बंद करण्यात आला. चंद्रपूर- नागपूर मार्गावरील एकही टोलनाके बंद न करण्यात आले नाही. (शहर प्रतिनिधी)