शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे तीन तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:33 IST

राजकुमार चुनारकर चिमूर : दीड वर्षांपासून कोरोनामुळे प्राथमिक शाळेची घंटा बंदच आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शाळेचे शिक्षण सुरू आहे. ...

राजकुमार चुनारकर

चिमूर : दीड वर्षांपासून कोरोनामुळे प्राथमिक शाळेची घंटा बंदच आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शाळेचे शिक्षण सुरू आहे. या ऑनलाईन शिक्षणपद्धतीमुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे तीन तेरा वाजले आहेत. मोबाईलमधील ऑनलाईन गेममध्ये मुले रमल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाचा विसर पडत आहे. कोरोना नियमांमध्ये शाळा सुरू करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

गतवर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. मात्र ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची स्थिती चिंताजनक आहे. विद्यार्थी बाराखडी व पाढे विसरले असून सोबतच पुढे शाळा सुरळीत सुरू झाल्यानंतर शाळेत सहज जातील की नाही अशीही शंका पालकांच्या मनात घर करत आहे.

विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रत्यक्षात ऑनलाईन प्रभावी राहिले नसून शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाईल पडला की, मुले पे गेम, कार्टून यासारख्या खेळात रंगू लागले आहेत. शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण अधिक प्रभावी असल्याने मुलांना उजळणी, तोंडपाठ होते. मात्र सध्या चौथी-पाचवीच्या मुलांना गुणाकार, भागाकार कसा करावा याचाही विसर पडला आहे.

बॉक्स

पुस्तके उघडूनही बघितली नाही

जून महिन्यात शाळांकडून पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले. मात्र कोणत्याही विषयाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदाच्या अभ्यासात कोणते धडे अभ्यासासाठी आहेत, याची माहितीही नाही. ऑनलाईन शिक्षण केवळ बोटावर मोजता येईल इतके विद्यार्थी करीत असावेत. परंतु इतरांचे काय? त्यातही यावर्षी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आणखीनच बिनधास्त झाले आहेत. परीक्षाच नाही तर अभ्यास कशाला करायचा, असे प्रतिउत्तर मुले आपल्या पालकांना देऊ लागली आहेत.

कोट

ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी त्याला खूप मर्यादा आहेत. सेतू चाचणीच्या वेळी ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा प्रकर्षाने जाणवल्या. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावली आहे. शासनाने कोरोनामुक्त गावातील, वाड्यावस्त्यांवरील तसेच कमी पटाच्या शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात, हीच अपेक्षा आहे.

-सुरेश डांगे,

जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती संघटना, चिमूर