शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे तीन तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:33 IST

राजकुमार चुनारकर चिमूर : दीड वर्षांपासून कोरोनामुळे प्राथमिक शाळेची घंटा बंदच आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शाळेचे शिक्षण सुरू आहे. ...

राजकुमार चुनारकर

चिमूर : दीड वर्षांपासून कोरोनामुळे प्राथमिक शाळेची घंटा बंदच आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शाळेचे शिक्षण सुरू आहे. या ऑनलाईन शिक्षणपद्धतीमुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे तीन तेरा वाजले आहेत. मोबाईलमधील ऑनलाईन गेममध्ये मुले रमल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाचा विसर पडत आहे. कोरोना नियमांमध्ये शाळा सुरू करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

गतवर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. मात्र ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची स्थिती चिंताजनक आहे. विद्यार्थी बाराखडी व पाढे विसरले असून सोबतच पुढे शाळा सुरळीत सुरू झाल्यानंतर शाळेत सहज जातील की नाही अशीही शंका पालकांच्या मनात घर करत आहे.

विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रत्यक्षात ऑनलाईन प्रभावी राहिले नसून शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाईल पडला की, मुले पे गेम, कार्टून यासारख्या खेळात रंगू लागले आहेत. शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण अधिक प्रभावी असल्याने मुलांना उजळणी, तोंडपाठ होते. मात्र सध्या चौथी-पाचवीच्या मुलांना गुणाकार, भागाकार कसा करावा याचाही विसर पडला आहे.

बॉक्स

पुस्तके उघडूनही बघितली नाही

जून महिन्यात शाळांकडून पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले. मात्र कोणत्याही विषयाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदाच्या अभ्यासात कोणते धडे अभ्यासासाठी आहेत, याची माहितीही नाही. ऑनलाईन शिक्षण केवळ बोटावर मोजता येईल इतके विद्यार्थी करीत असावेत. परंतु इतरांचे काय? त्यातही यावर्षी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आणखीनच बिनधास्त झाले आहेत. परीक्षाच नाही तर अभ्यास कशाला करायचा, असे प्रतिउत्तर मुले आपल्या पालकांना देऊ लागली आहेत.

कोट

ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी त्याला खूप मर्यादा आहेत. सेतू चाचणीच्या वेळी ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा प्रकर्षाने जाणवल्या. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावली आहे. शासनाने कोरोनामुक्त गावातील, वाड्यावस्त्यांवरील तसेच कमी पटाच्या शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात, हीच अपेक्षा आहे.

-सुरेश डांगे,

जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती संघटना, चिमूर