शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे तीन तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:33 IST

राजकुमार चुनारकर चिमूर : दीड वर्षांपासून कोरोनामुळे प्राथमिक शाळेची घंटा बंदच आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शाळेचे शिक्षण सुरू आहे. ...

राजकुमार चुनारकर

चिमूर : दीड वर्षांपासून कोरोनामुळे प्राथमिक शाळेची घंटा बंदच आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शाळेचे शिक्षण सुरू आहे. या ऑनलाईन शिक्षणपद्धतीमुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे तीन तेरा वाजले आहेत. मोबाईलमधील ऑनलाईन गेममध्ये मुले रमल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाचा विसर पडत आहे. कोरोना नियमांमध्ये शाळा सुरू करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

गतवर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. मात्र ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची स्थिती चिंताजनक आहे. विद्यार्थी बाराखडी व पाढे विसरले असून सोबतच पुढे शाळा सुरळीत सुरू झाल्यानंतर शाळेत सहज जातील की नाही अशीही शंका पालकांच्या मनात घर करत आहे.

विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रत्यक्षात ऑनलाईन प्रभावी राहिले नसून शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाईल पडला की, मुले पे गेम, कार्टून यासारख्या खेळात रंगू लागले आहेत. शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण अधिक प्रभावी असल्याने मुलांना उजळणी, तोंडपाठ होते. मात्र सध्या चौथी-पाचवीच्या मुलांना गुणाकार, भागाकार कसा करावा याचाही विसर पडला आहे.

बॉक्स

पुस्तके उघडूनही बघितली नाही

जून महिन्यात शाळांकडून पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले. मात्र कोणत्याही विषयाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदाच्या अभ्यासात कोणते धडे अभ्यासासाठी आहेत, याची माहितीही नाही. ऑनलाईन शिक्षण केवळ बोटावर मोजता येईल इतके विद्यार्थी करीत असावेत. परंतु इतरांचे काय? त्यातही यावर्षी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आणखीनच बिनधास्त झाले आहेत. परीक्षाच नाही तर अभ्यास कशाला करायचा, असे प्रतिउत्तर मुले आपल्या पालकांना देऊ लागली आहेत.

कोट

ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी त्याला खूप मर्यादा आहेत. सेतू चाचणीच्या वेळी ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा प्रकर्षाने जाणवल्या. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावली आहे. शासनाने कोरोनामुक्त गावातील, वाड्यावस्त्यांवरील तसेच कमी पटाच्या शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात, हीच अपेक्षा आहे.

-सुरेश डांगे,

जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती संघटना, चिमूर