शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

खासगी ट्रॅव्हल्सधारकांना तीन महिन्यांचा अल्टीमेटम

By admin | Updated: July 5, 2017 01:02 IST

शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. या समस्येवर अद्यापही मात करता आलेली नाही.

पार्किंगसाठी स्वत:ची जागा शोधा : मनपा आयुक्तांनी बजावली नोटीस लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. या समस्येवर अद्यापही मात करता आलेली नाही. शहरातून विविध मार्गावर धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी पार्किंगसाठी रेल्वे उड्डाण पुलाजवळील कृषी कार्यालयालगतची शासकीय जागा बळकावून येथे वाहने उभे करतात. यामुळे प्रवाश्यांची येथे नेहमीच गर्दी असते. प्रवासी नेण्यावरून येथे अनेकदा वादही उद्भवले आहेत. याची दखल घेत मनपा आयुक्तांनी खासगी ट्रॅव्हल्स मालकांना पार्किंगसाठी स्वत:ची जागा शोधण्याची नोटीस बजावली आहे. यासाठी तीन महिन्यांचा अल्टीमेटम देण्यात आला असून जोपर्यंत स्वत:ची जागा शोधणार नाही, तोपर्यंत प्रती वाहन २०० रूपये भाडे आकारण्याची कार्यवाही ट्रॅव्हल्सधारकांवर करण्यात येणार आहे.चंद्रपूर शहरातून विविध मार्गावर डझनभरच्या वर खासगी ट्रॅव्हल्स धावतात. मात्र एकाही ट्रॅव्हल्सधारकाकडे पार्किंगसाठी स्वत:ची जागा नाही. त्यामुळे नागपूरसाठी धावणारे ट्रॅव्हल्स वरोरा मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलालगतच्या कृषी अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत उभे करतात. तर गडचिरोली मार्गावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानासमोरील रस्त्याच्या कडेला वाहने ठेवतात. येथे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. समोरच वाहतूक शाखेचे कार्यालय असतानाही प्रवासी नेण्याच्या कारणावरून अनेकदा चालकांमध्ये वादही झालेत. प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचून पोलीस तक्रारही करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. ही समस्या निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक नियती ठाकेर, मनपा आयुक्त संजय काकडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीतील चर्चेनंतर खासगी ट्रॅव्हल्स मालकांना जागा शोधण्याचे नोटीस बजाविण्यात आली आहे. मनपाकडूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असून एकमेकांकडे बोट दाखवत कारवाई टाळण्याचे काम आजपर्यंत झाले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक समस्या बिकट झाली असून नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. वाहतूक नियंत्रणाच्या जामरचा केवळ २५ वेळा वापर शहरातील वाहतूक समस्या किती बिकट आहे, याची माहिती असतानाही जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन व वाहतूक शाखा दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स् मालक, कार चालकांची मनमानी वाढली असून वाटेल तिथे वाहन पार्किंग केल्याचे शहरात दिसून येते. यातून वाहतूक प्रभावित होत असते. वाहतूक शाखेकडे वाहतूक नियंत्रणासाठी ५ जामर आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत केवळ २५ वेळा या जामरचा उपयोग वाहतूक नियंत्रणासाठी करण्यात आल्याची माहिती, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अमोल पुरी यांनी दिली.