शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ट्रॅव्हल्सधारकांना तीन महिन्यांचा अल्टीमेटम

By admin | Updated: July 5, 2017 01:02 IST

शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. या समस्येवर अद्यापही मात करता आलेली नाही.

पार्किंगसाठी स्वत:ची जागा शोधा : मनपा आयुक्तांनी बजावली नोटीस लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. या समस्येवर अद्यापही मात करता आलेली नाही. शहरातून विविध मार्गावर धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी पार्किंगसाठी रेल्वे उड्डाण पुलाजवळील कृषी कार्यालयालगतची शासकीय जागा बळकावून येथे वाहने उभे करतात. यामुळे प्रवाश्यांची येथे नेहमीच गर्दी असते. प्रवासी नेण्यावरून येथे अनेकदा वादही उद्भवले आहेत. याची दखल घेत मनपा आयुक्तांनी खासगी ट्रॅव्हल्स मालकांना पार्किंगसाठी स्वत:ची जागा शोधण्याची नोटीस बजावली आहे. यासाठी तीन महिन्यांचा अल्टीमेटम देण्यात आला असून जोपर्यंत स्वत:ची जागा शोधणार नाही, तोपर्यंत प्रती वाहन २०० रूपये भाडे आकारण्याची कार्यवाही ट्रॅव्हल्सधारकांवर करण्यात येणार आहे.चंद्रपूर शहरातून विविध मार्गावर डझनभरच्या वर खासगी ट्रॅव्हल्स धावतात. मात्र एकाही ट्रॅव्हल्सधारकाकडे पार्किंगसाठी स्वत:ची जागा नाही. त्यामुळे नागपूरसाठी धावणारे ट्रॅव्हल्स वरोरा मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलालगतच्या कृषी अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत उभे करतात. तर गडचिरोली मार्गावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानासमोरील रस्त्याच्या कडेला वाहने ठेवतात. येथे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. समोरच वाहतूक शाखेचे कार्यालय असतानाही प्रवासी नेण्याच्या कारणावरून अनेकदा चालकांमध्ये वादही झालेत. प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचून पोलीस तक्रारही करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. ही समस्या निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक नियती ठाकेर, मनपा आयुक्त संजय काकडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीतील चर्चेनंतर खासगी ट्रॅव्हल्स मालकांना जागा शोधण्याचे नोटीस बजाविण्यात आली आहे. मनपाकडूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असून एकमेकांकडे बोट दाखवत कारवाई टाळण्याचे काम आजपर्यंत झाले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक समस्या बिकट झाली असून नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. वाहतूक नियंत्रणाच्या जामरचा केवळ २५ वेळा वापर शहरातील वाहतूक समस्या किती बिकट आहे, याची माहिती असतानाही जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन व वाहतूक शाखा दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स् मालक, कार चालकांची मनमानी वाढली असून वाटेल तिथे वाहन पार्किंग केल्याचे शहरात दिसून येते. यातून वाहतूक प्रभावित होत असते. वाहतूक शाखेकडे वाहतूक नियंत्रणासाठी ५ जामर आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत केवळ २५ वेळा या जामरचा उपयोग वाहतूक नियंत्रणासाठी करण्यात आल्याची माहिती, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अमोल पुरी यांनी दिली.