शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे हातपंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:31 IST

यंदा अल्प पाऊस पडल्याने पाणी टंचाईची चाहुल आतापासूनच सुरू झाली.

ठळक मुद्देपाण्यासाठी भटकंती : नगर परिषद प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यंदा अल्प पाऊस पडल्याने पाणी टंचाईची चाहुल आतापासूनच सुरू झाली. मात्र, चंद्रपूर महानगर पालिकेसह जिल्ह्यातील नगर परिषद अंतर्गत २७७ हातपंप बंद असल्याचे वास्तव पुढे आले आहे.नगर परिषदअंतर्गत सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये बहुतेक मुख्य वॉर्डांचाच समावेश आहे. परंतु, मुख्य नळयोजनेच्या पाईपलाईनपासून दूर असणाºया वॉर्र्डांमधील नागरिक हातपंपावर अवलंबून आहेत. शासना विविध योजनामधील हातपंप खोदण्यात आले. जिल्ह्याती नगर परिषद हद्दीमधील सुमारे १००० हातपंप आहेत. या हातपंप दुरुस्ती करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. परिणामी, हातपंप बंद होवूनही तीन ते चार महिने दुरुस्ती होत नसल्याचे उघडकीस आले आहे.यंदा कमी पाऊस पडल्याने पाण्याची पातळी खालावली. काही वॉर्डांमध्ये शंभर फूट हातपंप खोदूनही पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. जादा फूटांवर खोदलेल्या हातपंपाची संख्या कमीच आहे. पण, नादुरुस्त असलेल्या आणि दुरुस्तीनंतर पिण्यास योग्य असणाºया हातपंपाचीच संख्या ३०० हून अधिक भरण्याची शक्यता आहे. हातपंप खोदल्यानंतर दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद यांत्रिकी अथवा शासनाच्या अन्य प्राधिकृत यंत्रणेशी करार केला जातो. त्यासाठी नगर परिषदांना शुल्क भरावा लागतो. मात्र, पदाधिकारी व संबंधित अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे शुल्क भरण्यात आले नाही. त्यामुळे शेकडो हातपंप बंद पडले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज असणाºया वॉर्डांमध्येच हातपंप बंद असल्याने पाण्याची गरज भागविण्यासाठी अन्य वॉर्डांत भटकंती सुरू असल्याचे चित्र नगर परिषद हद्दीमध्ये दिसून येत आहे.चंद्रपुरातील २०२ हातपंप बंदचंद्रपूर मनपा हद्दीत ६५६ हातपंप खोदण्यात आले. या हातपंपामुळे विविध वॉर्डांतील नागरिकांना पाण्याची गरज भागविणे शक्य झाले होते. दरम्यान, पाण्याची पातळी खालावल्याने आणि तांत्रिक अडचणीमुळे सध्य:स्थितीत चंद्रपूर शहरात केवळ ४५४ हातपंप सुरू आहेत. उर्वरीत २०२ हातपंप बंद असल्याने नागरिकांची गोची झाली आहे. नळ योजनेद्वारे ज्या वॉर्डांत पाणी मिळते, तिथून गरजा भागविण्याची वेळ हजारो नागरिकांवर आली आहे.निधीची तरतूद करावीशहरातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक राहणाऱ्या वॉर्डांत अनेक हातपंप खोदण्यात आलेत. मात्र, दुरूस्तीसाठी निधीची तरतुद केली नाही. विविध योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करताना गोरगरीब अवलंबून असणाºया हातपंपांसाठी निधीची तरतूद का नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.