शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

तीनशे हातपंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:31 IST

यंदा अल्प पाऊस पडल्याने पाणी टंचाईची चाहुल आतापासूनच सुरू झाली.

ठळक मुद्देपाण्यासाठी भटकंती : नगर परिषद प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यंदा अल्प पाऊस पडल्याने पाणी टंचाईची चाहुल आतापासूनच सुरू झाली. मात्र, चंद्रपूर महानगर पालिकेसह जिल्ह्यातील नगर परिषद अंतर्गत २७७ हातपंप बंद असल्याचे वास्तव पुढे आले आहे.नगर परिषदअंतर्गत सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये बहुतेक मुख्य वॉर्डांचाच समावेश आहे. परंतु, मुख्य नळयोजनेच्या पाईपलाईनपासून दूर असणाºया वॉर्र्डांमधील नागरिक हातपंपावर अवलंबून आहेत. शासना विविध योजनामधील हातपंप खोदण्यात आले. जिल्ह्याती नगर परिषद हद्दीमधील सुमारे १००० हातपंप आहेत. या हातपंप दुरुस्ती करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. परिणामी, हातपंप बंद होवूनही तीन ते चार महिने दुरुस्ती होत नसल्याचे उघडकीस आले आहे.यंदा कमी पाऊस पडल्याने पाण्याची पातळी खालावली. काही वॉर्डांमध्ये शंभर फूट हातपंप खोदूनही पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. जादा फूटांवर खोदलेल्या हातपंपाची संख्या कमीच आहे. पण, नादुरुस्त असलेल्या आणि दुरुस्तीनंतर पिण्यास योग्य असणाºया हातपंपाचीच संख्या ३०० हून अधिक भरण्याची शक्यता आहे. हातपंप खोदल्यानंतर दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद यांत्रिकी अथवा शासनाच्या अन्य प्राधिकृत यंत्रणेशी करार केला जातो. त्यासाठी नगर परिषदांना शुल्क भरावा लागतो. मात्र, पदाधिकारी व संबंधित अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे शुल्क भरण्यात आले नाही. त्यामुळे शेकडो हातपंप बंद पडले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज असणाºया वॉर्डांमध्येच हातपंप बंद असल्याने पाण्याची गरज भागविण्यासाठी अन्य वॉर्डांत भटकंती सुरू असल्याचे चित्र नगर परिषद हद्दीमध्ये दिसून येत आहे.चंद्रपुरातील २०२ हातपंप बंदचंद्रपूर मनपा हद्दीत ६५६ हातपंप खोदण्यात आले. या हातपंपामुळे विविध वॉर्डांतील नागरिकांना पाण्याची गरज भागविणे शक्य झाले होते. दरम्यान, पाण्याची पातळी खालावल्याने आणि तांत्रिक अडचणीमुळे सध्य:स्थितीत चंद्रपूर शहरात केवळ ४५४ हातपंप सुरू आहेत. उर्वरीत २०२ हातपंप बंद असल्याने नागरिकांची गोची झाली आहे. नळ योजनेद्वारे ज्या वॉर्डांत पाणी मिळते, तिथून गरजा भागविण्याची वेळ हजारो नागरिकांवर आली आहे.निधीची तरतूद करावीशहरातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक राहणाऱ्या वॉर्डांत अनेक हातपंप खोदण्यात आलेत. मात्र, दुरूस्तीसाठी निधीची तरतुद केली नाही. विविध योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करताना गोरगरीब अवलंबून असणाºया हातपंपांसाठी निधीची तरतूद का नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.