शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

तेलवासा गावात तीन दिवसांत तिघांचा मृत्यू

By admin | Updated: September 25, 2014 23:21 IST

भद्रावती तालुक्यातील साडेतीनशे लोकवस्ती असलेल्या तेलवासा गावात मृत्यूने थैमान घातले आहे. लागोपाठ तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

भद्रावती : भद्रावती तालुक्यातील साडेतीनशे लोकवस्ती असलेल्या तेलवासा गावात मृत्यूने थैमान घातले आहे. लागोपाठ तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. २४ सप्टेंबर बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान गावातील प्रितम गौतम नगराळे या २२ वर्षीय तरुणाचा नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. २३ सप्टेंबरला याच गावातील १५ वर्षीय विद्यार्थीनी आचल शेषराव नगराळे हिचा डेंग्युने मृत्यू झाला. तत्पूर्वी जेना येथील सागर केशव मिलमिले याचाही मृत्यू झाला. दरम्यान गावात सुमारे १५ जणांना तापाची लागण झाली आहे. प्रितम गौतम नगराळे या युवकाला चंद्रपूरवरुन उपचारासाठी नागपूरला हलविले होते. तो एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. अविवाहीत असलेल्या प्रितमचे हरणीयाचे आॅपरेशन झाले होते. सोबतच डेंग्यु मलेरिया, काविळ आणि शिकलसेल आजाराने तो त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. लागोपाठ दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने तेलवासा गावात शोककळा पसरली आहे. या गावालगत कोळसा खाण आहे. यामुळे प्रदूषणाने गावकरी त्रस्त आहे. तसेच वर्धा नदीवरुन आयुधनिर्माणीसाठी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकली आहे. याच पाईप लाईनमधून एक नळ गावकऱ्यांसाठी दिला आहे. या नळाद्वारे नदीतील अशुद्ध पाणी गावकऱ्यांना मिळत आहे. पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया होत नाही. येथील एका सार्वजनिक बोअरवेलच्या माध्यमातूनसुद्धा पाणी रोगराईला खतपाणी घालत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. उपसरपंच अनिता बोबडे, ग्रा.पं. सदस्य मोरेश्वर जुनघरे, देवता लभाने, माजी सरपंच प्रिती कांबळे, भिमराव कांबळे, शंकर नगराळे, पवन नगराळे, शंकर कुंभरे आणि गावकऱ्यांनी सदर समस्येबाबत प्रशासनाने वेळीच उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)