शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

तेलवासा गावात तीन दिवसांत तिघांचा मृत्यू

By admin | Updated: September 25, 2014 23:21 IST

भद्रावती तालुक्यातील साडेतीनशे लोकवस्ती असलेल्या तेलवासा गावात मृत्यूने थैमान घातले आहे. लागोपाठ तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

भद्रावती : भद्रावती तालुक्यातील साडेतीनशे लोकवस्ती असलेल्या तेलवासा गावात मृत्यूने थैमान घातले आहे. लागोपाठ तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. २४ सप्टेंबर बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान गावातील प्रितम गौतम नगराळे या २२ वर्षीय तरुणाचा नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. २३ सप्टेंबरला याच गावातील १५ वर्षीय विद्यार्थीनी आचल शेषराव नगराळे हिचा डेंग्युने मृत्यू झाला. तत्पूर्वी जेना येथील सागर केशव मिलमिले याचाही मृत्यू झाला. दरम्यान गावात सुमारे १५ जणांना तापाची लागण झाली आहे. प्रितम गौतम नगराळे या युवकाला चंद्रपूरवरुन उपचारासाठी नागपूरला हलविले होते. तो एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. अविवाहीत असलेल्या प्रितमचे हरणीयाचे आॅपरेशन झाले होते. सोबतच डेंग्यु मलेरिया, काविळ आणि शिकलसेल आजाराने तो त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. लागोपाठ दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने तेलवासा गावात शोककळा पसरली आहे. या गावालगत कोळसा खाण आहे. यामुळे प्रदूषणाने गावकरी त्रस्त आहे. तसेच वर्धा नदीवरुन आयुधनिर्माणीसाठी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकली आहे. याच पाईप लाईनमधून एक नळ गावकऱ्यांसाठी दिला आहे. या नळाद्वारे नदीतील अशुद्ध पाणी गावकऱ्यांना मिळत आहे. पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया होत नाही. येथील एका सार्वजनिक बोअरवेलच्या माध्यमातूनसुद्धा पाणी रोगराईला खतपाणी घालत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. उपसरपंच अनिता बोबडे, ग्रा.पं. सदस्य मोरेश्वर जुनघरे, देवता लभाने, माजी सरपंच प्रिती कांबळे, भिमराव कांबळे, शंकर नगराळे, पवन नगराळे, शंकर कुंभरे आणि गावकऱ्यांनी सदर समस्येबाबत प्रशासनाने वेळीच उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)