शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात हजारो शौचालये बिनकामी

By admin | Updated: March 26, 2016 00:40 IST

बल्लारपूर पंचायत समितीने स्वच्छता अभियानाअंतर्गत या पंचायतीतील एकूण सर्व १७ गावांमध्ये शौचालय बांधण्याचे ठरविलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले आहे.

उद्दिष्ट पूर्ण : तरीही स्वच्छता अभियानाचा फज्जावसंत खेडेकर  बल्लारपूरबल्लारपूर पंचायत समितीने स्वच्छता अभियानाअंतर्गत या पंचायतीतील एकूण सर्व १७ गावांमध्ये शौचालय बांधण्याचे ठरविलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले आहे. मात्र, याच स्वच्छता अभियानाअंतर्गत सुमारे दहा वर्षांपूर्वी, याच गावांमध्ये बांधलेले शौचालय वापर नसलेल्या स्थितीत आहेत. कुटुंबानी त्यांचा वापर करणे बंद केले आहे. परिणामी अशा कुटुंबियांना आता उघड्यावर बसावे लागत आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानाचा फज्जा उडत आहे.बल्लारपूर पंचायत समितीने, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत येणाऱ्या एकूण सर्व १७ गावांचे शौचालयाबाबत सर्वेक्षण केले. पाच एकराच्या आत शेतजमीन असलेल्या एकूण १६२२ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे या सर्वेक्षणातून आढळून आले. या कुटूंबांना शौचालय बांधण्याकरिता पंचायत समितीकडून अनुदान देण्यात आले. मार्च महिना संपण्यापूर्वीच सर्वच १६२२ शौचालय बांधून पूर्ण झाले आहेत. याप्रकारे नवीन शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट या पंचायत समितीने मुदतीपूर्वीच पूर्ण केले. लोकांनी घरी बांधून असलेल्या शौचालयाचा उपयोग करावा, त्यांनी उघड्यावर बसू नये, असा संदेश विविध मार्गांनी गावकऱ्यांना पंचायत समितीकडून देणे सुरू आहे. प्रसंगी गुडमार्निंगचा फार्म्युलाही वापरला जातो आहे. गावांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या मनावर तसे बिंबविण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून विद्यार्थी आपल्या कुटुंबियांना शौचालयाचा वापर करण्याला आग्रहपूर्वक बाध्य करतील. त्याचा चांगला परिणामही दिसून येत असल्याचे बल्लारपूर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हे सारे ठिक असले तरी दुसरी एक बाजू या गावांत बघायला मिळते, ती म्हणजे नादुरुस्त असलेल्या शौचालयांची मोठी संख्या. पंचायत समिती वा ग्रामपंचायतीच्या निधीतून १० वर्षापूर्वी बांधलेले शौचालय आज मोडकळीस आले आहेत. त्यांचा वापर लोकांनी बंद केला आहे. या पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अशा नादुरुस्त शौचालयांची एकूण संख्या १६०० एवढी मोठी आहे. या नादुरुस्त शौचालयांना नव्याने बांधण्याकरिता पंचायत समितीकडून निधीची तरतूद नाही. आणि स्वखर्चाने नव्याने शौचालय बांधण्याची बऱ्याच जणांची आर्थिक क्षमता नाही व आर्थिक क्षमता असली तरी तशी इच्छा नाही. एकीकडे नवीन शौचालय बांधण्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे तर दुसरीकडे तेवढ्याच संख्येत नादुरुस्त शौचालय आहेत. अशी स्थिती स्वच्छता अभियानाला मारक ठरणार आहे. शासन कुणालाही शौचालय बांधण्यासाठी एकदाच अनुदान देते, दुसऱ्यांदा नाही. अशा स्थितीत, परिसरातील मोठ्या उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीतून या नादुरुस्त शौचालयांच्या बांधकामाकरिता पैसे मिळविण्याच्या प्रयत्नात पंचायत समिती लागली आहे, असे समजते.