शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

ऐतिहासिक मोर्च्यात नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

By admin | Updated: December 11, 2015 01:38 IST

केंद्रात व राज्यात असणारे भाजपा प्रणित सरकारे विकासाच्या सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस ..

चंद्रपूर : केंद्रात व राज्यात असणारे भाजपा प्रणित सरकारे विकासाच्या सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात चंद्रपूर येथून माजी खासदार नरेश पुगलिया व युवानेता तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी महासचिव राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.पावसाच्या लहरीपणामुळे अतिवृष्टी, अवर्षण, योग्य वेळी पावसाचा अभाव आदी कारणामुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले. नापिकीमुळे तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. शेतमालांना आधारभूत व योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी गर्भगळीत झाले असून त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. परंतु, या गंभीर बाबींकडे सरकारचे लक्ष नाही, याकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.मोर्चात विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस, जिल्हा एन.एस.यु.आय. चे पदाधिकारी व शेतकरी तीन हजार पेक्षा जास्त संख्येने सहभागी झाले होते. नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वातील या मोर्च्यात युवानेते राहुल पुगलिया, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, माजी आमदार बाबुराव वाघमारे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे महासचिव तथा नगरसेवक अशोक नागपुरे, प्रवीण पडवेकर, संजय महाडोळे, मनपाचे गटनेता प्रशांत दानव, नगरसेवक उषा धांडे, सकीना अंसारी, पारनंदी, राजेश रेवल्लीवार, देविदास गेडाम, बापू अंसारी, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्ष छाया मडावी, नासीरखान देवेंद्र आर्य, व्यंकटेश बालबरैय्या, ओमेश्वर पदमगिरीवार, रत्नमाला बावणे, अविनाश जाधव, विनोद अहिरकर, वैशाली पुल्लावार, मंगला आत्राम, देवेंद्र बेले, रामभाऊ टोंगे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)