शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

ऐतिहासिक मोर्च्यात नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

By admin | Updated: December 11, 2015 01:38 IST

केंद्रात व राज्यात असणारे भाजपा प्रणित सरकारे विकासाच्या सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस ..

चंद्रपूर : केंद्रात व राज्यात असणारे भाजपा प्रणित सरकारे विकासाच्या सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात चंद्रपूर येथून माजी खासदार नरेश पुगलिया व युवानेता तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी महासचिव राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.पावसाच्या लहरीपणामुळे अतिवृष्टी, अवर्षण, योग्य वेळी पावसाचा अभाव आदी कारणामुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले. नापिकीमुळे तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. शेतमालांना आधारभूत व योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी गर्भगळीत झाले असून त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. परंतु, या गंभीर बाबींकडे सरकारचे लक्ष नाही, याकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.मोर्चात विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस, जिल्हा एन.एस.यु.आय. चे पदाधिकारी व शेतकरी तीन हजार पेक्षा जास्त संख्येने सहभागी झाले होते. नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वातील या मोर्च्यात युवानेते राहुल पुगलिया, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, माजी आमदार बाबुराव वाघमारे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे महासचिव तथा नगरसेवक अशोक नागपुरे, प्रवीण पडवेकर, संजय महाडोळे, मनपाचे गटनेता प्रशांत दानव, नगरसेवक उषा धांडे, सकीना अंसारी, पारनंदी, राजेश रेवल्लीवार, देविदास गेडाम, बापू अंसारी, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्ष छाया मडावी, नासीरखान देवेंद्र आर्य, व्यंकटेश बालबरैय्या, ओमेश्वर पदमगिरीवार, रत्नमाला बावणे, अविनाश जाधव, विनोद अहिरकर, वैशाली पुल्लावार, मंगला आत्राम, देवेंद्र बेले, रामभाऊ टोंगे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)