शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यासाठी हजारो पळस वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:49 IST

पळस हा वरकरणी निरुपयोगी वाटत असला तरी या वृक्षात अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंतु, या वृक्षाची विज्ञानयुगातही पोळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पळस वृक्षांच्या फांद्या ग्रामीण व शहरी भागातही परंपरेने घरासमोर मेढे म्हणून ठेवल्या जातात. त्यामुळे पळस वृक्षांची संख्या कमी होताना दिसत आहे.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींकडून चिंता : पळस नामशेष होण्याच्या मार्गावर, नवीन पर्याय शोधावा

लोकमत न्यूज नेटवर्कआयुध निर्माणी (भद्रावती) : पोळा सणादरम्यान मेढ्यासाठी बहुगुणी पळस वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जाते. यामुळे पर्यावरणाचा ºहास होत असून बहुगुणी पळस वृक्षांची संख्या कमी होण्याची भिती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे.पळस हा वरकरणी निरुपयोगी वाटत असला तरी या वृक्षात अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंतु, या वृक्षाची विज्ञानयुगातही पोळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पळस वृक्षांच्या फांद्या ग्रामीण व शहरी भागातही परंपरेने घरासमोर मेढे म्हणून ठेवल्या जातात. त्यामुळे पळस वृक्षांची संख्या कमी होताना दिसत आहे. पळस वृक्ष ग्रामीण भागातील जनतेसाठी संकटमोचक म्हणून ओळखला जातो. घराला छत म्हणून, भिंतीला पाणी लागू नये म्हणून, तर कधी पत्रावळी व द्रोण म्हणून पळसाच्या पानांचावापर होतो. विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्यास सुरक्षिततेसाठी पळस वृक्षाचा आधार घेतात. व्यावसायिक दृष्टयाही पळसाचे महत्त्व आहे. प्लास्टिक बंदीनंतर पळसाच्या पानाच्या पत्रावळी द्रोणची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातून बेरोजगारांना रोजगार मिळू लागला आहे. पळस झाडावर लाख निर्मिती केली जाते. शेतकरी पळसाच्या मुळापासून शेतीपयोगी दोर बनवितात. पळसामध्ये औषधी गुणधर्महीआहे. अनेक औषधांमध्ये पळसाचा वापर केल्या जाते. मात्र पोळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पळसाची अवैधपणे कत्तल केली जाते. निसर्ग प्रखर उन्हाळ्यात रखरखीत असतो तेव्हा पळसाची केशरी रंगाची फुले निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकत टाकतात. होळी सणात याच फुलांपासून रंगपंचमीचा रंग बनविण्याची प्रथा आहे. मात्र परंपरा जपताना निसर्गाचा समतोल ढासळणार नाही याचेही भान सुशिक्षित पिढीने ठेवणे आता गरजेचे झाले, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे. शासनानेच पुढाकार घेऊन सणावारांच्या निमित्ताने होणारी बहुपयोगी पळसाची कत्तल थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण