शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

पोळ्यासाठी हजारो पळस वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:49 IST

पळस हा वरकरणी निरुपयोगी वाटत असला तरी या वृक्षात अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंतु, या वृक्षाची विज्ञानयुगातही पोळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पळस वृक्षांच्या फांद्या ग्रामीण व शहरी भागातही परंपरेने घरासमोर मेढे म्हणून ठेवल्या जातात. त्यामुळे पळस वृक्षांची संख्या कमी होताना दिसत आहे.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींकडून चिंता : पळस नामशेष होण्याच्या मार्गावर, नवीन पर्याय शोधावा

लोकमत न्यूज नेटवर्कआयुध निर्माणी (भद्रावती) : पोळा सणादरम्यान मेढ्यासाठी बहुगुणी पळस वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जाते. यामुळे पर्यावरणाचा ºहास होत असून बहुगुणी पळस वृक्षांची संख्या कमी होण्याची भिती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे.पळस हा वरकरणी निरुपयोगी वाटत असला तरी या वृक्षात अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंतु, या वृक्षाची विज्ञानयुगातही पोळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पळस वृक्षांच्या फांद्या ग्रामीण व शहरी भागातही परंपरेने घरासमोर मेढे म्हणून ठेवल्या जातात. त्यामुळे पळस वृक्षांची संख्या कमी होताना दिसत आहे. पळस वृक्ष ग्रामीण भागातील जनतेसाठी संकटमोचक म्हणून ओळखला जातो. घराला छत म्हणून, भिंतीला पाणी लागू नये म्हणून, तर कधी पत्रावळी व द्रोण म्हणून पळसाच्या पानांचावापर होतो. विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्यास सुरक्षिततेसाठी पळस वृक्षाचा आधार घेतात. व्यावसायिक दृष्टयाही पळसाचे महत्त्व आहे. प्लास्टिक बंदीनंतर पळसाच्या पानाच्या पत्रावळी द्रोणची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातून बेरोजगारांना रोजगार मिळू लागला आहे. पळस झाडावर लाख निर्मिती केली जाते. शेतकरी पळसाच्या मुळापासून शेतीपयोगी दोर बनवितात. पळसामध्ये औषधी गुणधर्महीआहे. अनेक औषधांमध्ये पळसाचा वापर केल्या जाते. मात्र पोळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पळसाची अवैधपणे कत्तल केली जाते. निसर्ग प्रखर उन्हाळ्यात रखरखीत असतो तेव्हा पळसाची केशरी रंगाची फुले निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकत टाकतात. होळी सणात याच फुलांपासून रंगपंचमीचा रंग बनविण्याची प्रथा आहे. मात्र परंपरा जपताना निसर्गाचा समतोल ढासळणार नाही याचेही भान सुशिक्षित पिढीने ठेवणे आता गरजेचे झाले, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे. शासनानेच पुढाकार घेऊन सणावारांच्या निमित्ताने होणारी बहुपयोगी पळसाची कत्तल थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण