शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

By admin | Updated: July 14, 2016 00:58 IST

गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवार, शनिवार, रविवार व सोमवारपर्यंत पाऊस सुरूच होता.

कोठारी परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान कोठारी : गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवार, शनिवार, रविवार व सोमवारपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे नदी, नाले, तलाव व बोड्या फुगल्या. त्यात इरई, वर्धा व गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने अनेक नद्यांना पूर आला. त्यात कोठारी परिसरातील वर्धा नदीला पूर चढला व हजारो हेक्टर पेरणी झालेली शेती पुराच्या पाण्याखाली आली. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मृग नक्षत्राच्या सरी पडताच जमीन ओली झाली. शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या पूर्वीच शेतीची योग्य मशागत करून पेरणीसाठी तयारी केली. जून महिन्याच्या मध्यंतरी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करून बाजार भावापेक्षा जास्त किमतीचे बी-बियाणे खरेदी करून पेरणी आटोपली. बियाणांना अंकूर फुटून रोपे तयार झाली. कापूस, सोयाबीन, तूर व धान पेरणी करून तयार रोपांची डवरणीसुद्धा केली. धान पऱ्ह्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने व पावसाने विश्रांती न घेतल्याने २५ टक्के शेतकऱ्यांचे धान पऱ्हे मागे राहिले. मात्र ज्यांनी धानाचे पऱ्हे टाकले, त्यांच्या बांध्यात सतत पावसाने पाणी तुडूंब भरून उगवलेले धान पऱ्हे सडले. परिणामी यात शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे. पुराच्या पाण्याखाली सतत तीन दिवस कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला असल्याने उगवलेले, डवरलेले पीक सडले आहेत. आधीच नापिकीने त्रस्त शेतकरी मागील वर्षी हैराण झाले होते. यावर्षी पाऊस उशिरा आला. परंतु सतत झड लागून राहिल्याने शेतकरी आस्मानी संकटात सापडला. पीक कर्ज, सावकारी कर्ज व खासगी कर्ज करून बियाणांची खरेदी करून पेरणी केली. मात्र निसर्गाच्या रौद्र रुपामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. वर्धा नदीच्या पुराच्या गढूळ पाण्यात कोठारी, पळसगाव, आमडी, किन्ही, कवडजई, मानोरा, इटोली, बामणी, काटवली, कुडेसावली, परसोडी, तोहोगाव, आर्वी, वेजगाव, सरांडी व लाठी आदीसह २० ते २५ गावातील हजारो हेक्टर शेतीतील उगवलेली पीके, पेरलेले बियाणे सडून गेले आहेत. अशात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पिकाची पाहणी करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. त्यांनी सोमवारपर्यंत मदत देण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्याप शासनाचे कर्मचाऱ्यांनी सर्व्हेक्षण पूर्ण केले नाही व कोणतीही मदत मिळाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. (वार्ताहर)