शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

By admin | Updated: July 14, 2016 00:58 IST

गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवार, शनिवार, रविवार व सोमवारपर्यंत पाऊस सुरूच होता.

कोठारी परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान कोठारी : गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवार, शनिवार, रविवार व सोमवारपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे नदी, नाले, तलाव व बोड्या फुगल्या. त्यात इरई, वर्धा व गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने अनेक नद्यांना पूर आला. त्यात कोठारी परिसरातील वर्धा नदीला पूर चढला व हजारो हेक्टर पेरणी झालेली शेती पुराच्या पाण्याखाली आली. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मृग नक्षत्राच्या सरी पडताच जमीन ओली झाली. शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या पूर्वीच शेतीची योग्य मशागत करून पेरणीसाठी तयारी केली. जून महिन्याच्या मध्यंतरी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करून बाजार भावापेक्षा जास्त किमतीचे बी-बियाणे खरेदी करून पेरणी आटोपली. बियाणांना अंकूर फुटून रोपे तयार झाली. कापूस, सोयाबीन, तूर व धान पेरणी करून तयार रोपांची डवरणीसुद्धा केली. धान पऱ्ह्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने व पावसाने विश्रांती न घेतल्याने २५ टक्के शेतकऱ्यांचे धान पऱ्हे मागे राहिले. मात्र ज्यांनी धानाचे पऱ्हे टाकले, त्यांच्या बांध्यात सतत पावसाने पाणी तुडूंब भरून उगवलेले धान पऱ्हे सडले. परिणामी यात शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे. पुराच्या पाण्याखाली सतत तीन दिवस कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला असल्याने उगवलेले, डवरलेले पीक सडले आहेत. आधीच नापिकीने त्रस्त शेतकरी मागील वर्षी हैराण झाले होते. यावर्षी पाऊस उशिरा आला. परंतु सतत झड लागून राहिल्याने शेतकरी आस्मानी संकटात सापडला. पीक कर्ज, सावकारी कर्ज व खासगी कर्ज करून बियाणांची खरेदी करून पेरणी केली. मात्र निसर्गाच्या रौद्र रुपामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. वर्धा नदीच्या पुराच्या गढूळ पाण्यात कोठारी, पळसगाव, आमडी, किन्ही, कवडजई, मानोरा, इटोली, बामणी, काटवली, कुडेसावली, परसोडी, तोहोगाव, आर्वी, वेजगाव, सरांडी व लाठी आदीसह २० ते २५ गावातील हजारो हेक्टर शेतीतील उगवलेली पीके, पेरलेले बियाणे सडून गेले आहेत. अशात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पिकाची पाहणी करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. त्यांनी सोमवारपर्यंत मदत देण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्याप शासनाचे कर्मचाऱ्यांनी सर्व्हेक्षण पूर्ण केले नाही व कोणतीही मदत मिळाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. (वार्ताहर)