शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

By admin | Updated: July 14, 2016 00:58 IST

गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवार, शनिवार, रविवार व सोमवारपर्यंत पाऊस सुरूच होता.

कोठारी परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान कोठारी : गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवार, शनिवार, रविवार व सोमवारपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे नदी, नाले, तलाव व बोड्या फुगल्या. त्यात इरई, वर्धा व गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने अनेक नद्यांना पूर आला. त्यात कोठारी परिसरातील वर्धा नदीला पूर चढला व हजारो हेक्टर पेरणी झालेली शेती पुराच्या पाण्याखाली आली. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मृग नक्षत्राच्या सरी पडताच जमीन ओली झाली. शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या पूर्वीच शेतीची योग्य मशागत करून पेरणीसाठी तयारी केली. जून महिन्याच्या मध्यंतरी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करून बाजार भावापेक्षा जास्त किमतीचे बी-बियाणे खरेदी करून पेरणी आटोपली. बियाणांना अंकूर फुटून रोपे तयार झाली. कापूस, सोयाबीन, तूर व धान पेरणी करून तयार रोपांची डवरणीसुद्धा केली. धान पऱ्ह्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने व पावसाने विश्रांती न घेतल्याने २५ टक्के शेतकऱ्यांचे धान पऱ्हे मागे राहिले. मात्र ज्यांनी धानाचे पऱ्हे टाकले, त्यांच्या बांध्यात सतत पावसाने पाणी तुडूंब भरून उगवलेले धान पऱ्हे सडले. परिणामी यात शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे. पुराच्या पाण्याखाली सतत तीन दिवस कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला असल्याने उगवलेले, डवरलेले पीक सडले आहेत. आधीच नापिकीने त्रस्त शेतकरी मागील वर्षी हैराण झाले होते. यावर्षी पाऊस उशिरा आला. परंतु सतत झड लागून राहिल्याने शेतकरी आस्मानी संकटात सापडला. पीक कर्ज, सावकारी कर्ज व खासगी कर्ज करून बियाणांची खरेदी करून पेरणी केली. मात्र निसर्गाच्या रौद्र रुपामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. वर्धा नदीच्या पुराच्या गढूळ पाण्यात कोठारी, पळसगाव, आमडी, किन्ही, कवडजई, मानोरा, इटोली, बामणी, काटवली, कुडेसावली, परसोडी, तोहोगाव, आर्वी, वेजगाव, सरांडी व लाठी आदीसह २० ते २५ गावातील हजारो हेक्टर शेतीतील उगवलेली पीके, पेरलेले बियाणे सडून गेले आहेत. अशात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पिकाची पाहणी करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. त्यांनी सोमवारपर्यंत मदत देण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्याप शासनाचे कर्मचाऱ्यांनी सर्व्हेक्षण पूर्ण केले नाही व कोणतीही मदत मिळाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. (वार्ताहर)