शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

हजारो हेक्टर शेती पाण्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:38 IST

आसोलामेंढा तलाव पाथरी परिसरातील शेतकऱ्यांना वरदान तर पेंढरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहे. परिसरात आसोलामेंढा तलावाचा कोणत्याही प्रकारचा कालवा नाही. परंतु आसोलामेंढा तलावाच्या नावाखाली शेतकऱ्यांला पिक विमा मिळत नाहीं.

ठळक मुद्देसिंचन सुविधांचा अभाव : शेतकऱ्यांनी काय करावे?

सुनिल दहेलकर।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : आसोलामेंढा तलाव पाथरी परिसरातील शेतकऱ्यांना वरदान तर पेंढरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहे. परिसरात आसोलामेंढा तलावाचा कोणत्याही प्रकारचा कालवा नाही. परंतु आसोलामेंढा तलावाच्या नावाखाली शेतकऱ्यांला पिक विमा मिळत नाहीं. या परिसरात हजारो हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली आहे. सद्यस्थितीत धान पिकांना पाणी मिळत नसल्याने धान शेती पाण्यापासून वंचित आहे.तालुक्यातील पेंढरी परिसरात हजारो हेक्टर शेतीवर धान पिकाची लागवड केली आहे. या परिसरात सायमारा, मेंढा, मुण्डाला, पेंढरी, मरेगाव, चक मनकापूर, भारपायली, चारगाव, पणधारसराड, हिरापूर इत्यादी गावे येतात. समाजाचा विकास आणि देशाची आर्थिक भरभराट शेतीवर आहे. ग्रामीण भागात ८० टक्के कुटुंबातील सदस्याचे पोट शेतीवर अवलंबून आहे. तालुक्यात बोड्या, तलावासारखे पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु पाणी साठवणूक करण्याचे तंत्र आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात प्रशासनाला करता आले नाही. जलस्रोत वाढले नाही. याकरिता शासनाला आणखी जोर लावणे गरजेचे झाले आहे. आसोलामेंढा तलावाचा पेंढरी परिसरातील शेतकऱ्याला पाण्याचा लाभ मिळत नाही. यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असेल ?सिंचन क्षेत्रात शिस्त आणण्याची शासन एकीकडे घोषणा करते. सिंचन क्षेत्राचा अनुशेष भरून काढण्यासाठी विधानमंडळात आवाज उठविला जातो. पंरतु सिंचनाच्या सुविधा पाहिजे त्या प्रमाणात अजूनही मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. जलयुत शिवाराची चर्चा राज्यभर खूप झाली. जलयुक्त शिवार हा दुष्काळमुक्तीचा संकल्प पेंढरी परिसरात कूचकामी ठरतोय. परिसरात पाणी टंचाई असल्याने धान पीक ओंबीवर येत असताना जमिनीत ओलावा नाही. शेतीला भेगा जात आहेत. त्सिंचनाच्या सुविधांची कमतरता आहे. त्यावर उपाययोजना होताना दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. परिणामी शेतकरी चिंतेत आहे. आसोलामेंढातील पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी सरपंच बंडू मेश्राम, दामोदर गोबाडे, शेतकरी दशरथ शेडमाके, नामदेव कस्तुरे आदींनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती