शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

हजारो अनुयायांनी फुलला परिसर

By admin | Updated: October 16, 2014 23:22 IST

५६ वर्षांपूर्वी येथील दीक्षाभूमीवर पार पडलेल्या ऐतिसासिक दीक्षांत समारोहाच्या चिरंतन आठवणींना उजाळा देत १५ आॅक्टोबरला येथे ५८ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला.

चंद्रपूर : ५६ वर्षांपूर्वी येथील दीक्षाभूमीवर पार पडलेल्या ऐतिसासिक दीक्षांत समारोहाच्या चिरंतन आठवणींना उजाळा देत १५ आॅक्टोबरला येथे ५८ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला. शोषित पिडीत, दलितांचे कैवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हजारो अनुयायी चंद्रपुरात दाखल अन् संपूर्ण दीक्षाभूमी परिसर जयभीमच्या गजराने फुलून गेला. १६ आॅक्टोबर १९५६ ला चंद्रपूरच्या दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना तथागतांच्या बुद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्माचा स्वीकार हे बौद्ध धम्माचा पूर्नरूज्जीवनाच्या क्रांतीकार्याचे पहिले पाऊल होते. ही जगातील अद्भूत व ऐतिहासिक घटना चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर घडली होती. त्या घटनेची पुनरावृत्ती सतत होत राहावी, यासाठी दरवर्षी दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूरच्यावतीने धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ आयोजीत केला जातो. काल १५ आॅक्टोबर बुधवारी विश्वशांती व विश्वबंधुत्व वाहन रॅलीने महोत्सवाला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण व सामुहिक बुद्ध वंदनेनंतर भव्य वाहन रॅलीचे जटपूरा गेट मार्गाने प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकातून वरोरा नाका मार्गाने दीक्षाभूमीवर प्रस्थान झाले. त्यानंतर वाहन रॅली दीक्षाभूमीवर पोहचली. समारंभाचे अध्यक्ष अरुण घोटकर यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण तसेच श्रद्धेय भदन्त सदानंद महाथेरो केळझर यांचे हस्ते धम्मज्योत प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी श्रद्धेय भदन्त सदानंद महाथेरो केळझर यांनी उपस्थित जनसमूहाला त्रिशरण व पंचशील दिले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भदन्त कृपाशरण महाथेरो, भदन्त श्रद्धानंद, चंद्रपूर, भन्दत विनय बोधीप्रिय थेरो, घुग्घुस, भदन्त आर्यसुत्त, भदन्त आनंद बल्लारपूर, भदन्त संघवंस मूल, भदन्त ज्ञानज्योती उपस्थित होते. तसेच मेमोरिअल सोसायटीचे सचिव वामनराव मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. मारोतराव खोब्रागडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भदन्त सदानंद महाथेरो यांनी उपस्थित जनसमुहाला संबोधित करताना म्हणाले, जीवनात पंचशीलाचे पालन करायला पाहिजे. मनुष्याचे जीवन आनंदमय, सुखमय होण्यासाठी चिताची शुद्धी आवश्यक आहे आणि ही चित्त शुद्धी विपश्यनाद्वारा प्राप्त होते, असे सांगितले. भदन्त पद्माबोधी यांनी, देशात समता, स्वातंत्र व लोकशाही निर्माण करण्यासाठी बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केले, असे सांगितले. भदन्त कृपाशरण महाथेरो यांनी, बुद्धाचा धम्म माणसांनी माणसावर प्रेम करणे, समानता, बंधुभाव शिकवितो. म्हणून बुद्धाचा धम्म मानवाच्या उत्थानाकरिता आहे, असे सांगितले. भदन्त विनय बोधिप्रिय यांनी, भगवान बुद्धांनी जो परिपूर्ण व परिशुद्ध व विज्ञानवादी धम्म दिला, तो सर्वांनी आचरणात आणला पाहिजे, असे सांगितले. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष अशोक घोटेकर यांनी, समारंभाचे महत्त्व विशद केले. बुद्धविहार हे बौद्ध संस्काराचे केंद्र आहे. प्रत्येक बौद्धांनी दर रविवारी विहारात जाऊन संस्कारमय आधुनिक बौद्धसंस्कृती निर्माण केली पाहिजे, असे सांगितले. संचालन धम्ममित्र शैलेंद्र शेंडे यांनी केले. तर आभार डॉ. विजया गेडाम यांनी मानले. (स्थानिका प्रतिनिधी)