शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

हजारो शेतकरी कामाच्या शोधात

By admin | Updated: November 20, 2014 22:49 IST

निसर्गाच्या दरवर्षीच्या वक्रदृष्टीमुळे दुबार तिबार पेरणी करूनही हाती काहीच उरत नसल्याने पहाडावरील शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असतानाही तो कसा करावा, या विवंचनेत तो अडकला आहे.

तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती : प्रशासनाचे दुर्लक्षशंकर चव्हाण - जिवती निसर्गाच्या दरवर्षीच्या वक्रदृष्टीमुळे दुबार तिबार पेरणी करूनही हाती काहीच उरत नसल्याने पहाडावरील शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असतानाही तो कसा करावा, या विवंचनेत तो अडकला आहे. दुष्काळाच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आता अस्मानी संकटात सापडला आहे. पोटाच्या भ्रांतीसाठी शाळकरी मुलांना सोबत घेऊन कोणी ऊस तोड कामगार म्हणून तर कोणी कापूस वेचणीसाठी स्थलांतरित होत असल्याचे चित्र पहाडावर बघायला मिळत आहे.आंध्र-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या तालुक्यात सिंचनाच्या सोयी अपुऱ्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वारंवार बसत असल्याने हंगाम संपण्यापूर्वीच पिकाची पानगळ होऊन उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत आहे. यात त्यांचा कणाच मोडला जात असून कर्जाची परतपेडही होत नाही. ही त्यांची करूण कहाणी आहे. देशात शेतकऱ्याला बळीराजा म्हणून ओळखले जाते. मात्र हा बळीराजा नावालाच राजा राहिला आहे. दुबार, तिबार पेरणी करूनही पिकत नाही. पिकले तरी विकत नाही. निवडणुका आल्या की आश्वासनाचा पिटारा खोलणारे राजकीय मंडळी आम्हीच त्यांचे कैवारी असल्याचा दावा करतात व निवडणुका संपल्या की त्यांच्याकडे पाठ फिरवितात. हा काही नवखा अनुभव नाही. एकीकडे शासन स्तरावरून मागेल त्याला काम, असा रोजगार हमी योजनेचा डंका पिटवीत असले तरी पहाडावरील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी अजूनही सर्वकंश अशी योजना किंवा उपाययोजना सरकारला तयार करता आली नाही, हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.