शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

हजारो शेतकरी कामाच्या शोधात

By admin | Updated: November 20, 2014 22:49 IST

निसर्गाच्या दरवर्षीच्या वक्रदृष्टीमुळे दुबार तिबार पेरणी करूनही हाती काहीच उरत नसल्याने पहाडावरील शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असतानाही तो कसा करावा, या विवंचनेत तो अडकला आहे.

तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती : प्रशासनाचे दुर्लक्षशंकर चव्हाण - जिवती निसर्गाच्या दरवर्षीच्या वक्रदृष्टीमुळे दुबार तिबार पेरणी करूनही हाती काहीच उरत नसल्याने पहाडावरील शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असतानाही तो कसा करावा, या विवंचनेत तो अडकला आहे. दुष्काळाच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आता अस्मानी संकटात सापडला आहे. पोटाच्या भ्रांतीसाठी शाळकरी मुलांना सोबत घेऊन कोणी ऊस तोड कामगार म्हणून तर कोणी कापूस वेचणीसाठी स्थलांतरित होत असल्याचे चित्र पहाडावर बघायला मिळत आहे.आंध्र-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या तालुक्यात सिंचनाच्या सोयी अपुऱ्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वारंवार बसत असल्याने हंगाम संपण्यापूर्वीच पिकाची पानगळ होऊन उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत आहे. यात त्यांचा कणाच मोडला जात असून कर्जाची परतपेडही होत नाही. ही त्यांची करूण कहाणी आहे. देशात शेतकऱ्याला बळीराजा म्हणून ओळखले जाते. मात्र हा बळीराजा नावालाच राजा राहिला आहे. दुबार, तिबार पेरणी करूनही पिकत नाही. पिकले तरी विकत नाही. निवडणुका आल्या की आश्वासनाचा पिटारा खोलणारे राजकीय मंडळी आम्हीच त्यांचे कैवारी असल्याचा दावा करतात व निवडणुका संपल्या की त्यांच्याकडे पाठ फिरवितात. हा काही नवखा अनुभव नाही. एकीकडे शासन स्तरावरून मागेल त्याला काम, असा रोजगार हमी योजनेचा डंका पिटवीत असले तरी पहाडावरील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी अजूनही सर्वकंश अशी योजना किंवा उपाययोजना सरकारला तयार करता आली नाही, हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.