शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

हजारो शेतकरी कामाच्या शोधात

By admin | Updated: November 20, 2014 22:49 IST

निसर्गाच्या दरवर्षीच्या वक्रदृष्टीमुळे दुबार तिबार पेरणी करूनही हाती काहीच उरत नसल्याने पहाडावरील शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असतानाही तो कसा करावा, या विवंचनेत तो अडकला आहे.

तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती : प्रशासनाचे दुर्लक्षशंकर चव्हाण - जिवती निसर्गाच्या दरवर्षीच्या वक्रदृष्टीमुळे दुबार तिबार पेरणी करूनही हाती काहीच उरत नसल्याने पहाडावरील शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असतानाही तो कसा करावा, या विवंचनेत तो अडकला आहे. दुष्काळाच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आता अस्मानी संकटात सापडला आहे. पोटाच्या भ्रांतीसाठी शाळकरी मुलांना सोबत घेऊन कोणी ऊस तोड कामगार म्हणून तर कोणी कापूस वेचणीसाठी स्थलांतरित होत असल्याचे चित्र पहाडावर बघायला मिळत आहे.आंध्र-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या तालुक्यात सिंचनाच्या सोयी अपुऱ्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वारंवार बसत असल्याने हंगाम संपण्यापूर्वीच पिकाची पानगळ होऊन उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत आहे. यात त्यांचा कणाच मोडला जात असून कर्जाची परतपेडही होत नाही. ही त्यांची करूण कहाणी आहे. देशात शेतकऱ्याला बळीराजा म्हणून ओळखले जाते. मात्र हा बळीराजा नावालाच राजा राहिला आहे. दुबार, तिबार पेरणी करूनही पिकत नाही. पिकले तरी विकत नाही. निवडणुका आल्या की आश्वासनाचा पिटारा खोलणारे राजकीय मंडळी आम्हीच त्यांचे कैवारी असल्याचा दावा करतात व निवडणुका संपल्या की त्यांच्याकडे पाठ फिरवितात. हा काही नवखा अनुभव नाही. एकीकडे शासन स्तरावरून मागेल त्याला काम, असा रोजगार हमी योजनेचा डंका पिटवीत असले तरी पहाडावरील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी अजूनही सर्वकंश अशी योजना किंवा उपाययोजना सरकारला तयार करता आली नाही, हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.