शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने गतवर्षी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेपासून चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ३० हजार शेतकरी अजूनही वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरू होणाऱ्या हंगामात कर्ज घेण्यासाठी या शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने आॅक्टोबर २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून कर्जमाफी द्यायला ...

ठळक मुद्देआर्थिक विवंचना : खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने गतवर्षी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेपासून चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ३० हजार शेतकरी अजूनही वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरू होणाऱ्या हंगामात कर्ज घेण्यासाठी या शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने आॅक्टोबर २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून कर्जमाफी द्यायला सुरूवात केली. प्रारंभी महिनाभरात कर्जमाफी होईल, असे सांगितले गेले. त्यानंतर तारखा वाढत गेल्या. पण, आज सात महिन्यांचा काळ लोटला तरी संपूर्ण शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. शेतकऱ्यांची बँक समजल्या जाणाºया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे ३० हजार शेतकरी सदस्यांना अजूनही कर्जमाफी मिळालेली नाही. या बँकेने जिल्ह्यातील एक लाख ११ हजार शेतकºयांचे प्रस्ताव कर्जमाफीसाठी सादर झाले. त्यापैकी ८० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली.यासाठी २७२ कोटी रूपये शासनाने दिले. मात्र, उर्वरित ३० हजार शेतकऱ्यांचे पैसे अजूनही पाठवलेले नाहीत. याची रक्कम १७५ कोटी एवढी आहे. आता हंगाम जवळ येऊ लागला आहे. त्यामुळे शेतकºयांना आतपासूनच पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे. मात्र, ज्यांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही, अशा शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.यावर्षी शासनाने जिल्हा बँकेला ५१२ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. पण, ते घेण्यासाठी शेतकरीच पात्र ठरणार नाही, अशी स्थिती आहे. जोपर्यंत कर्जमाफीचे लाभार्थी कर्जमुक्त होणार नाही, तोपर्यंत हे उद्दिष्ट गाठणे कठीण आहे. जिल्हा बँक सातत्याने शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पाठपुरावा करीत आहे. मात्र, सहकार खात्याकडून ग्रीन लिस्ट आलेली नाही.शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी उशीर होणार की मुद्दाम उशिर केला जात आहे की तांत्रिक अडचणीमुळे प्रकार घडत आहे, हे समजायला मार्ग नाही. सरकारकडे पैसे नसल्याने या प्रस्तावांना मुद्दाम थांबवण्याचे काम केले जात असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. शासनाच्या या दिरंगाईमुळे अनेकांना यावर्षीच्या खरिप पीक कर्जापासून मुकावे लागणार आहे.