शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
2
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
3
IndiGo Bomb Threat: एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
4
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
5
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
6
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
7
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
8
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
9
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
10
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
11
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
12
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
13
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
14
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
15
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
16
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
17
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
19
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
20
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?

हजारो बौध्द अनुयायांकडून महामानवाला अभिवादन

By admin | Updated: December 7, 2015 05:11 IST

भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

चंद्रपूर : भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चंद्रपुरातील हजारो बौध्द अनुयायांनी गांधी चौक मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बाबासाहेबांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील सर्वच बुध्द विहारात व वॉर्डावॉर्डात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शहरातील सर्व बौध्द विहारातून व धम्मध्वजापासून बौध्द अनुयायांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत त्या वार्डातील बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. बाबासाहेबांच्या घोषणा देत सर्व रॅली गांधी चौक ते जयंत टॉकीज मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आली. तिथे रॅली विसर्जित करण्यात आली. तत्पूर्वी समता सैनिक दलाच्या जवानांनी अतिशय शिस्तीत रॅली काढून बाबासाहेबांना सलामी देत श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी बहुजन समाज पार्टीच्या वतीनेही बाईक रॅली काढण्यात आली. अनेक रॅलीचे नेतृत्व भिक्खू संघाने केले होते. रॅलीदरम्यान ‘महापरिनिर्वाण दिन चिरोयू होवो’, ‘जबतक सुरज चांद रहेगा, बाबासाहेब तुम्हारा नाम रहेगा’, अशा घोषणा देण्यात येत होत्या. सर्व रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरही उपस्थित पाहुण्यांनी प्रकाश टाकला. (शहर प्रतिनिधी)सायंकाळी निघाली भीमज्योत रॅलीरविवारी सकाळपासून बौध्द अनुयायी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ एकत्रित होऊ लागले. सायंकाळपर्यंत बौध्द अनुयायांचे येणे सुरूच होते. त्यानंतर सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून भव्य भिमज्योत रॅली काढण्यात आली. कॅण्डल घेऊन हजारो बौध्द अनुयायी यात सहभागी झाले. ही भिमज्योत रॅली दीक्षाभूमीवर गेली. तिथेही महामानवाला अभिवादन करण्यात आले.मुख्यमंत्र्यांनीही केले अभिवादनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका खासगी कामासाठी आज रविवारी चंद्रपुरात आले होते. त्यांनीही महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील गांधी चौकाजवळ स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना श्यामकुळे उपस्थित होते. बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळेच लोकशाही समृध्द बनली-अहीरमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेमुळेच देशाचे सार्वभौमत्व व या देशाची लोकशाही समृध्द बनली, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आयोजित श्रध्दांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हंसराज अहीर यांनीही बाबासाहेबांच्या अस्थीकलशाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.