शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तलावाच्या मागणीसाठी भटारीवासीयांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 00:46 IST

पोंभुर्णा तालुक्यातील भटारी वनग्रामातील कक्ष क्र. १०७ येथे तलावाचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव घेऊन प्रशासकीय मंजुरी दिली.

तलाव फक्त कागदावर : ३६ वर्षांपूर्वी प्रशासकीय मंजुरी चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील भटारी वनग्रामातील कक्ष क्र. १०७ येथे तलावाचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव घेऊन प्रशासकीय मंजुरी दिली. मात्र, या तलावाचे बांधकाम ३६ वर्षांनंतरही सुरू न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते सूरज गोरंतवार यांच्या नेतृत्त्वात भटारीवासीयानी पोंभुर्णा तहसील कार्यालयासमोर शनिवारी ठिय्या आंदोलन केले. शेकडोच्या संख्येने आलेल्या भटारीवासीयांनी पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती येथून शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर प्रशासनाच्या कामचुकार धोरणाच्या आंदोलन केले.वनग्राम भटारी येथील शेतकऱ्यांच्या शेतीकरिता पाण्याची समस्या जाणून जिल्हा परिषदेने १२ नोव्हेंंबर १९८० रोजी ठराव क्र. ९ नुसार प्रशासकीय मंजुरी दिली. त्या अनुषंगाने त्यांचे सीमांकन झाले. मात्र तलावाचे काम अजूनही सुरू झाले नाही. भटारी येथील राखीव वनक्षेत्र कक्ष क्र. १०७ मधील तलाव बांधकामाकरिता ३८.२० हेक्टर जमीन भूसंपादन करायची होती. त्याकरिता गैर वनक्षेत्राची महसूल विभागाच्या अधीनस्त ७६.४० जमीन वन विभागाला द्यायवयाची होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या ७६.४० हेक्टर जमिनीपैकी ७१.४१ हेक्टर जमीन योग्य असल्याचे व ४.९९ हेक्टर जमीन अयोग्य असून अतिक्रमण असल्याचे कळविण्यात आले. २००५ मध्ये राजुरा परिक्षेत्रातील महसूल विभागाच्या ताब्यातील ‘परमपोक’ क्षेत्र ही अतिक्रमण असल्याचे कळविले. शिवाय लघु सिंचन विभागाने भटारी येथील प्रास्तावित तलावाचे सुधारित अंदाजपत्रक १ कोटी ५२ लाख ४८ हजार ७४६ रुपये असल्याने व सिंचन तलावाकरिता शासनाने ठरवून दिलेल्या मापदंडात बसत नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन गोंडपिंपरी उपविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी तलावाचा वन प्रस्ताव रद्द करण्याबाबत कळवून मोकळे झाले. महाराष्ट्र शासनाने आदिवासींच्या सर्वांगिण विकासाकरिता कायद्याची अंमलबजावणी केली खरी असली तरी १०० टक्के आदिवासी गाव असलेल्या भटारी गावाला दुजाभाव सहन करावा लागत आहे.या आंदोलनात सुरज गोरंतवार, रमेश वेलादी, मारोती पेंदोर, देविदास पेंदोर, बापूजी शेडमाके, वासुदेव पेंदोरे, पितांबर पेंदोर, प्रभाकर कुसराम, श्रावण पेंदोर, श्रीहरी पेंदोर, मारोती कोवे, सोमाजी शेडमाके, तुळशीराम पेंदोर, रघुनाथ कोडापे, उषा आलाम, सुवर्णा पेंदोर, मंगला कन्नाके, कवडू कुंदावार, गिरीधरसिंह बैस, रुषी हेपट यांचेसह शेकडो भटारीवासी उपस्थित होते. ( प्रतिनिधी)रोजगारासाठी आंध्र प्रदेशची वाटभटारीतील लोकसंख्या ८५० च्या वर आहे. या गावात शेतीची पुरेसी सोय नाही. तसेच रोजगार नसल्याने २०० पेक्षा अधिक तरुण, वृद्ध, महिला पोट भरणाच्या निमित्ताने आंध ्रप्रदेशात जात आहेत. भटारी ग्राम विकास कृती समितीच्या वतीने शेकडो महिला, पुरुषांनी, आबाल- वृद्धांनी पोंभुर्णा तहसील कार्यालय परिसरात ठिय्या देवून मागणीच्या संबंधाने तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन सादर केले.