शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

यवतमाळ जिल्ह्यातील पाण्याने भागते चंद्रपूर जिल्ह्याची तहान

By admin | Updated: June 1, 2016 01:13 IST

चंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीच्या पाण्यावर अनेक गावांची व शहराची तहान भागते.

बेंबळा धरणाचे पाणी सोडले : उद्योगांनाही लाभप्रवीण खिरटकर वरोराचंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीच्या पाण्यावर अनेक गावांची व शहराची तहान भागते. मात्र उन्हाळा सुरु होताच वर्धा नदीची धार आटल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीवर विसंबुन असणाऱ्या गावांत पाणी टंचाई निर्माण झाली. उन्हाळ्यात पाणी देणारे वर्धा जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने तिथून पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळले नाही. अखेरीस यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळ धरणातून वर्धा नदीला ३० दलघमी पाणी सोडण्यात आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ३६ नळ योजना भर उन्हाळ्यात कार्यान्वीत झाल्या आहेत. या पाण्याचा उद्योगांनाही लाभ होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा नदी एका टोकावरुन दुसऱ्या टोकावर वाहत आहे. वर्धा नदीच्या काठावर अनेक गावे वसली असल्याने त्या गावातील नागरिक वर्धा नदीच्या पाण्यावर विसंबून राहत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शहरांना वर्धा नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा होतो. त्यामुळे जिल्ह्यातील ३६ नळ योजना व ५६ संस्था नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. उन्हाळ्याची चाहुल लागताच वर्धा नदीची धार आटली. सूर्य आग ओकत असताना वर्धा नदीची धार पूर्णत: आटल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीवर असलेल्या पाणी पुरवठा योजना बंद पडल्या. प्रशासनाने दरवर्षी प्रमाणे यंदाही वर्धा नदीत पाणी सोडण्याकरिता वर्धा जिल्ह्यातील धरणाचा आढावा घेतला. वर्धा जिल्ह्यातील धरणात कमी पाणी साठा असल्याने तेथील प्रशासनाने लाल व पोथरा धरणातून कॅनलद्वारे पाणी चंद्रपूर जिल्ह्यात सोडून ते वर्धा नदीच्या पात्रात सोडण्याची योजना आखली. कॅनलमधून पाणी येत असताना उष्ण तापमानाने पाणी पाहिजे त्या प्रमाणात वाहत नव्हते. त्यामुळे सदर योजनेतून वर्धा नदीच्या पात्रातून पाणी येणे शक्य नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील धरणाची पाहणी करून यवतमाळ जिल्हा प्रशासनाला बेंबळ धरणातून वर्धा नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचा विचार करून व चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती विचारात घेता यवतमाळ जिल्हा प्रशासनाने तातडीने वर्धा नदीत ३० दलघमी पाणी नुकतेच सोडले आहे. सध्या वर्धा नदीच्या दोन्ही पात्रातून पाणी वाहत असल्याने याचा फायदा यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना झाला आहे. उन्हाळ्यात यवतमाळ जिल्ह्याचे चंद्रपूर जिल्ह्याची तहान भागवून शेजारी धर्म पाळला असल्याने दिसून येत आहे. पाठपुराव्याचा ध्यास व परिणाम वर्धा नदीत प्रारंभी वर्धा जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडून चंद्रपूर जिल्ह्याची तहान भागवावी, अशी आग्रही भूमीका उन्हाळ्याच्या प्रारंभी आ. बाळू धानोरकर यांनी घेतली होती. वर्धा जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील धरणातून वर्धा नदीत पाणी सोडावे, याकरिता आ. धोनोरकर यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याने वर्धा नदीमध्ये धरणातील पाणी सोडण्यात आले आहे.