शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
2
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
3
दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला; भाजपाच्या २ जागा घटल्या, काँग्रेसला फायदा
4
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
5
मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं?
6
तुटलेले दात, चॉकलेट अन् मृतदेह; लाल सुटकेसमध्ये होता ८ वर्षीय चिमुकला, उघडताच उडाला थरकाप
7
राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये प्रशिक्षणादरम्यान इंदिरा गांधी कालव्यात लष्कराचा टँक बुडाला; एका जवानाचा मृत्यू
8
सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण
9
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
10
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
11
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
12
अखेर केडीएमसीने मॅनहोलमध्ये पडलेेल्या 'त्या' मुलाच्या मृत्युची जबाबदारी घेतली, पालकांना देणार सहा लाख
13
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
14
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
15
हवा कुठे, किती खराब? अचूक माहिती मिळणार; BMC हवा गुणवत्ता मोजण्यासाठी ‘मानस’ उपक्रम राबवणार
16
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
17
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
18
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
19
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
20
Palash Muchhal: पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील पाण्याने भागते चंद्रपूर जिल्ह्याची तहान

By admin | Updated: June 1, 2016 01:13 IST

चंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीच्या पाण्यावर अनेक गावांची व शहराची तहान भागते.

बेंबळा धरणाचे पाणी सोडले : उद्योगांनाही लाभप्रवीण खिरटकर वरोराचंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीच्या पाण्यावर अनेक गावांची व शहराची तहान भागते. मात्र उन्हाळा सुरु होताच वर्धा नदीची धार आटल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीवर विसंबुन असणाऱ्या गावांत पाणी टंचाई निर्माण झाली. उन्हाळ्यात पाणी देणारे वर्धा जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने तिथून पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळले नाही. अखेरीस यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळ धरणातून वर्धा नदीला ३० दलघमी पाणी सोडण्यात आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ३६ नळ योजना भर उन्हाळ्यात कार्यान्वीत झाल्या आहेत. या पाण्याचा उद्योगांनाही लाभ होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा नदी एका टोकावरुन दुसऱ्या टोकावर वाहत आहे. वर्धा नदीच्या काठावर अनेक गावे वसली असल्याने त्या गावातील नागरिक वर्धा नदीच्या पाण्यावर विसंबून राहत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शहरांना वर्धा नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा होतो. त्यामुळे जिल्ह्यातील ३६ नळ योजना व ५६ संस्था नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. उन्हाळ्याची चाहुल लागताच वर्धा नदीची धार आटली. सूर्य आग ओकत असताना वर्धा नदीची धार पूर्णत: आटल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीवर असलेल्या पाणी पुरवठा योजना बंद पडल्या. प्रशासनाने दरवर्षी प्रमाणे यंदाही वर्धा नदीत पाणी सोडण्याकरिता वर्धा जिल्ह्यातील धरणाचा आढावा घेतला. वर्धा जिल्ह्यातील धरणात कमी पाणी साठा असल्याने तेथील प्रशासनाने लाल व पोथरा धरणातून कॅनलद्वारे पाणी चंद्रपूर जिल्ह्यात सोडून ते वर्धा नदीच्या पात्रात सोडण्याची योजना आखली. कॅनलमधून पाणी येत असताना उष्ण तापमानाने पाणी पाहिजे त्या प्रमाणात वाहत नव्हते. त्यामुळे सदर योजनेतून वर्धा नदीच्या पात्रातून पाणी येणे शक्य नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील धरणाची पाहणी करून यवतमाळ जिल्हा प्रशासनाला बेंबळ धरणातून वर्धा नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचा विचार करून व चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती विचारात घेता यवतमाळ जिल्हा प्रशासनाने तातडीने वर्धा नदीत ३० दलघमी पाणी नुकतेच सोडले आहे. सध्या वर्धा नदीच्या दोन्ही पात्रातून पाणी वाहत असल्याने याचा फायदा यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना झाला आहे. उन्हाळ्यात यवतमाळ जिल्ह्याचे चंद्रपूर जिल्ह्याची तहान भागवून शेजारी धर्म पाळला असल्याने दिसून येत आहे. पाठपुराव्याचा ध्यास व परिणाम वर्धा नदीत प्रारंभी वर्धा जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडून चंद्रपूर जिल्ह्याची तहान भागवावी, अशी आग्रही भूमीका उन्हाळ्याच्या प्रारंभी आ. बाळू धानोरकर यांनी घेतली होती. वर्धा जिल्ह्यातील धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील धरणातून वर्धा नदीत पाणी सोडावे, याकरिता आ. धोनोरकर यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याने वर्धा नदीमध्ये धरणातील पाणी सोडण्यात आले आहे.