शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका रिपब्लिक विचाराची

By admin | Updated: May 26, 2016 02:02 IST

२६ जानेवारी १९५० नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिक विचाराची भूमिका संविधानातून निर्माण केली.

भय्या रामटेके यांचे प्रतिपादन : रिपब्लिक साहित्य संमेलनराजुरा : २६ जानेवारी १९५० नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिक विचाराची भूमिका संविधानातून निर्माण केली. पारतंत्रातील राजकीय व अराजकीय संघटन म्हणजे शेड्युल कॉस्ट फेडरेशन व समता सैनिक दल विसर्जीत केले आणि गणतंत्रातील राजकीय संघटन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया व अराजकीय संघटन रिपब्लिक ट्रेनिंग स्कूलची स्थापना केली. परंतु परंपरावादी अनुयायींनी मातृ संघटनेच्या नावावर राजकीय व अराजकीय संघटन नेस्तनाबुत केल्याची माहिती संमेलनाध्यक्ष भय्या रामटेके यांनी दिली.स्थानिक बुद्धभूमीत राजुरा रिपब्लिकन ट्रेनिंग स्कूल महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने अखिल भारतीय दुसरे रिपब्लिक साहित्य संमेलन पार पडले. यावेळी ते बोलत होते.या संमेलनाचे उद्घाटन तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी केले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून रिपब्लिकन साहित्यिक भैय्या रामटेके, प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्णाबोधी, मधू बावलकर, डॉ. इन्नय्या उम्मडी, चरणदास नगराळे उपस्थित होते. यावेळी रामटेके पुढे म्हणाले, दोन खासदार असलेली भाजपा केंद्रात बहुमतात आली. बहुमतासाठी नरेंद्र मोदी यांनी १६ मे २०१४ ला पाच पिढीचे आभार मानले व शंभर वर्ष जुनी पारतंत्राचे आठवण करुन ६५ वर्षाच्या गणतंत्राला पंतप्रधान मोदी विसरले, अशी आठवण संमेलनाध्यक्ष भैय्या रामटेके यांनी यावेळी करून दिली. संमेलनात देशातील हजारो प्रतिनिधींनी सहभाग दर्शविला. यापूर्वी पहिले रिपब्लिक साहित्य संमेलन आदिलाबाद तेलंगाना येथे पार पडले होते. रिपब्लिकन कवी संमेलनाचे संचालन प्रा. प्रशांत वंजारे यांनी केले. हे कवी संमेलन ज्येष्ठ कवी भाऊराव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी देशातील कवींनी उत्स्फूर्ततेने सहभाग घेतला. रिपब्लिक साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक चरणदास नगराळे यांनी केले. संचालन प्रा. प्रशांत मोरे यांनी केले. आभार शुद्धोधन निरांजने यांनी मानले.