शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोटासाठी त्यांनी थाटला शेतातच संसार

By admin | Updated: March 28, 2016 01:06 IST

टिचभर पोटाची भूक भागविण्यासाठी माणसाला काय काय करावे लागते, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. गावात रोजगाराची

प्रकाश काळे ल्ल गोवरीटिचभर पोटाची भूक भागविण्यासाठी माणसाला काय काय करावे लागते, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. गावात रोजगाराची सोय नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटविण्यासाठी रोजगाराच्या शोधात असलेल्या त्या दोन कुटुंबीयांनी चक्क तेलंगणा राज्यातून राजुरा तालुक्यातील गोवरी येथे स्थलांतर केले आहे. येथील एका शेतातच संसार थाटला आहे. त्यांच्या रोजगाराच्या प्रश्न तात्पुरता मिटला असला तरी त्यांना पुन्हा कायमस्वरूपी रोजगार मिळविण्यासाठी पुन्हा भटकंती करावी लागणार आहे.तेलंगणा राज्यातील रूपारूर जि. आदिलाबाद येथील मनोहर विठ्ठल जाधव (४५) व भानुदास माणिक जिव्हारे (६०) यांच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घरात अठराविश्वे दारिद्र्य असल्याने पोटाची भूक त्यांनी जवळून अनुभवली आहे. घरी जमिनीचा कोरभर तुकडा नाही, राहायला धड घर नाही. गावाकडे रोजगाराची संधी नाही. एक दिवस मजुरी मिळाली तर चार दिवस हाताला काम नाही, अशा परिस्थितीत पोटाची भूक स्वस्थ बसू देत नव्हती. घरी मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च समोर होताच. मात्र या दोन कुटुंबीयांनी हार मानली नाही. रोजगाराच्या शोधात त्यांनी गाव सोडले. भटकंती करीत त्यांनी राजुरा तालुक्यातील गोवरी येथील भाऊराव रणदिवे यांच्या गावाजवळील शेतातच संसार थाटला. रणदिवे यांचा थोरला मुलगा अमित रणदिवे, सुमीत रणदिवे यांनी त्यांना राहण्याची सोय करून दिली.गेल्या तीन-चार महिन्यापासून रोजगाराच्या शोधात आलेले हे कुटूंब शेतातच वास्तव्याला आहेत. मनोेहर जाधव यांना दोन मुले व एक मुलगी आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलगी फुलाबाईने दहाव्या वर्गातूनच शिक्षण सोडले. तर त्यांची दोन मुले वसतिगृहात शिक्षण घेत आहे. आई-वडिलांना रोजगारासाठी मदत व्हावी, यासाठी मुलगी फुलाबाई त्यांच्या कामात मदत करते. तर भानुदास जिव्हारे यांच्या पत्नी सावित्रीबाई त्यांना रोजगारासाठी हातभार लावत आहे. दिवसभर शेतात राबायचे आणि काळ्या आईच्या कुशीत क्षणभर विश्रांती घ्यायची, हेच त्यांना ठाऊक आहे.होळी सणाला गावाला का गेले नाही, अशी विचारणा केली असता ‘सण बिन काई नाई’ दोन वेळेच्या जेवणाचे वांदे आहेत. तिथे कुठला आला सण, असे त्या कुटूंबियांचे म्हणणे आहे. हाताला काम मिळेल, तिथपर्यंत थांबायचे आणि पुन्हा दुसऱ्या गावी नवा रोजगार शोधायचा, हेच कायम त्यांची नशिबी आले आहे. ऊन्ह-वाऱ्याची तमा न बाळगता त्या दोन कुटुंबीयांनी चार महिन्यापासून शेतातच संसार थाटला आहे.हाताला काम मिळणे झाले कठीण४विज्ञानाने विविध क्षेत्रात क्रांती घडवून आणल्याने मजुरांच्या हाताने केले जाणारे काम आधुनिक मशीनने केले जात आहे. दिवसेंदिवस रोजगाराच्या संधी कमी होत असल्याने बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. त्यामुळे हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. रोजगार मिळत नसल्याने मजुरांना परप्रांतात जाऊन काम करावे लागत आहे.