शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

त्या आल्या अन् त्यांनी जिंकले !

By admin | Updated: October 11, 2014 23:01 IST

तब्बल ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ मध्ये स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी या शहरात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल ३० वर्षानंतर त्यांच्या स्नुषा सोनिया गांधी शनिवारी ब्रह्मपुरीत आल्या. त्यांच्या आगमनाच्या

ब्रह्मपुरीत जनसागर : ३० वर्षांनंतर आल्या इंदिराजींच्या स्नुषारवी रणदिवे - ब्रह्मपुरीतब्बल ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ मध्ये स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी या शहरात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल ३० वर्षानंतर त्यांच्या स्नुषा सोनिया गांधी शनिवारी ब्रह्मपुरीत आल्या. त्यांच्या आगमनाच्या उत्सुकतेने हजारोंचा जनसमुदाय त्यांना बघून आणि प्रत्यक्ष ऐकून भारावलाच. पण जनतेजवळ जाऊन त्यांनी स्वीकारलेल्या सर्वसामान्यांच्या अभिवादनाने त्यांनी या सभेलाच जिंकून घेतले.नियोजित वेळी त्यांचे आगमन झाले असले तरी दुपारी १ वाजतापासूनच गर्दी व्हायला लागली होती. दुपारपासूनच जनतेचे लोंढे दाखल व्हायला लागल्याने रस्ते फुलून गेले होते. दुपारी ३.५० वाजता त्यांचे हेलिकॉप्टर अवकाशात दिसताच टाळ्यांनी आणि ‘सोनिया गांधी आगे बढो’च्या घोषणांनी परिसर निनादून गेला. आपल्या ११ मिनिटांच्या भाषणात गरिबी, बेरोजगारी, स्थैर्य आणि विकासावर भर देत त्यांनी येथील जनतेला वचनपूर्तीचा शब्द दिला. सभेनंतर त्यांनी जनतेजवळ जावून संवादही साधला. अनेकांनी त्यांना आॅटोग्राफची विनंती केली. मात्र त्यांनी ती नम्रपणे नाकारली. विजय वडेट्टीवारांनी दिला जिल्हा निर्मितीचा शब्दआमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीचा शब्द दिला. ते म्हणाले, काँग्रेसने नेहमी सर्वसामान्यांचा विचार केला आहे. ब्रह्मपुरीच्या जिल्हा निर्मितीच्या मागणीची भावना विकासातूनच आली असल्याने आपण निवडून आल्यास वर्षभरात हा शब्द पूर्ण करून दाखवू. सिंचनावर बोलताना ते म्हणाले, गोसेखुर्दचे पाणी टेलपर्यंत पोहोचविणे हा आपला शब्द आहे. गोसेखुर्दच्या सिंचनात प्रचंड घोटाळे झाले. या घोटाळेबाजांना हटविण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहा. ब्रह्मपुरी जुना तालुका असूनही एमआयडीसी नाही. शिक्षणात तांत्रिकतेची येथे उणीव आहे. शासकीय रुग्णालय ३० बेडवरून १०० वर पोहचविण्याचा आपला प्रयत्न आहे. येथे उद्यान, सिंचन, हायटेक सिटी उभारण्याचाही शब्द त्यांनी दिला.यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार गेव्ह आवारी, आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार अविनाश वारजुकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.