शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

त्या आल्या अन् त्यांनी जिंकले !

By admin | Updated: October 11, 2014 23:01 IST

तब्बल ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ मध्ये स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी या शहरात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल ३० वर्षानंतर त्यांच्या स्नुषा सोनिया गांधी शनिवारी ब्रह्मपुरीत आल्या. त्यांच्या आगमनाच्या

ब्रह्मपुरीत जनसागर : ३० वर्षांनंतर आल्या इंदिराजींच्या स्नुषारवी रणदिवे - ब्रह्मपुरीतब्बल ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ मध्ये स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी या शहरात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल ३० वर्षानंतर त्यांच्या स्नुषा सोनिया गांधी शनिवारी ब्रह्मपुरीत आल्या. त्यांच्या आगमनाच्या उत्सुकतेने हजारोंचा जनसमुदाय त्यांना बघून आणि प्रत्यक्ष ऐकून भारावलाच. पण जनतेजवळ जाऊन त्यांनी स्वीकारलेल्या सर्वसामान्यांच्या अभिवादनाने त्यांनी या सभेलाच जिंकून घेतले.नियोजित वेळी त्यांचे आगमन झाले असले तरी दुपारी १ वाजतापासूनच गर्दी व्हायला लागली होती. दुपारपासूनच जनतेचे लोंढे दाखल व्हायला लागल्याने रस्ते फुलून गेले होते. दुपारी ३.५० वाजता त्यांचे हेलिकॉप्टर अवकाशात दिसताच टाळ्यांनी आणि ‘सोनिया गांधी आगे बढो’च्या घोषणांनी परिसर निनादून गेला. आपल्या ११ मिनिटांच्या भाषणात गरिबी, बेरोजगारी, स्थैर्य आणि विकासावर भर देत त्यांनी येथील जनतेला वचनपूर्तीचा शब्द दिला. सभेनंतर त्यांनी जनतेजवळ जावून संवादही साधला. अनेकांनी त्यांना आॅटोग्राफची विनंती केली. मात्र त्यांनी ती नम्रपणे नाकारली. विजय वडेट्टीवारांनी दिला जिल्हा निर्मितीचा शब्दआमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीचा शब्द दिला. ते म्हणाले, काँग्रेसने नेहमी सर्वसामान्यांचा विचार केला आहे. ब्रह्मपुरीच्या जिल्हा निर्मितीच्या मागणीची भावना विकासातूनच आली असल्याने आपण निवडून आल्यास वर्षभरात हा शब्द पूर्ण करून दाखवू. सिंचनावर बोलताना ते म्हणाले, गोसेखुर्दचे पाणी टेलपर्यंत पोहोचविणे हा आपला शब्द आहे. गोसेखुर्दच्या सिंचनात प्रचंड घोटाळे झाले. या घोटाळेबाजांना हटविण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहा. ब्रह्मपुरी जुना तालुका असूनही एमआयडीसी नाही. शिक्षणात तांत्रिकतेची येथे उणीव आहे. शासकीय रुग्णालय ३० बेडवरून १०० वर पोहचविण्याचा आपला प्रयत्न आहे. येथे उद्यान, सिंचन, हायटेक सिटी उभारण्याचाही शब्द त्यांनी दिला.यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार गेव्ह आवारी, आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार अविनाश वारजुकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.