शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

त्या आल्या अन् त्यांनी जिंकले !

By admin | Updated: October 11, 2014 23:01 IST

तब्बल ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ मध्ये स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी या शहरात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल ३० वर्षानंतर त्यांच्या स्नुषा सोनिया गांधी शनिवारी ब्रह्मपुरीत आल्या. त्यांच्या आगमनाच्या

ब्रह्मपुरीत जनसागर : ३० वर्षांनंतर आल्या इंदिराजींच्या स्नुषारवी रणदिवे - ब्रह्मपुरीतब्बल ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ मध्ये स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी या शहरात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल ३० वर्षानंतर त्यांच्या स्नुषा सोनिया गांधी शनिवारी ब्रह्मपुरीत आल्या. त्यांच्या आगमनाच्या उत्सुकतेने हजारोंचा जनसमुदाय त्यांना बघून आणि प्रत्यक्ष ऐकून भारावलाच. पण जनतेजवळ जाऊन त्यांनी स्वीकारलेल्या सर्वसामान्यांच्या अभिवादनाने त्यांनी या सभेलाच जिंकून घेतले.नियोजित वेळी त्यांचे आगमन झाले असले तरी दुपारी १ वाजतापासूनच गर्दी व्हायला लागली होती. दुपारपासूनच जनतेचे लोंढे दाखल व्हायला लागल्याने रस्ते फुलून गेले होते. दुपारी ३.५० वाजता त्यांचे हेलिकॉप्टर अवकाशात दिसताच टाळ्यांनी आणि ‘सोनिया गांधी आगे बढो’च्या घोषणांनी परिसर निनादून गेला. आपल्या ११ मिनिटांच्या भाषणात गरिबी, बेरोजगारी, स्थैर्य आणि विकासावर भर देत त्यांनी येथील जनतेला वचनपूर्तीचा शब्द दिला. सभेनंतर त्यांनी जनतेजवळ जावून संवादही साधला. अनेकांनी त्यांना आॅटोग्राफची विनंती केली. मात्र त्यांनी ती नम्रपणे नाकारली. विजय वडेट्टीवारांनी दिला जिल्हा निर्मितीचा शब्दआमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीचा शब्द दिला. ते म्हणाले, काँग्रेसने नेहमी सर्वसामान्यांचा विचार केला आहे. ब्रह्मपुरीच्या जिल्हा निर्मितीच्या मागणीची भावना विकासातूनच आली असल्याने आपण निवडून आल्यास वर्षभरात हा शब्द पूर्ण करून दाखवू. सिंचनावर बोलताना ते म्हणाले, गोसेखुर्दचे पाणी टेलपर्यंत पोहोचविणे हा आपला शब्द आहे. गोसेखुर्दच्या सिंचनात प्रचंड घोटाळे झाले. या घोटाळेबाजांना हटविण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहा. ब्रह्मपुरी जुना तालुका असूनही एमआयडीसी नाही. शिक्षणात तांत्रिकतेची येथे उणीव आहे. शासकीय रुग्णालय ३० बेडवरून १०० वर पोहचविण्याचा आपला प्रयत्न आहे. येथे उद्यान, सिंचन, हायटेक सिटी उभारण्याचाही शब्द त्यांनी दिला.यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार गेव्ह आवारी, आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार अविनाश वारजुकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.