शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
4
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
5
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
6
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
7
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
8
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
9
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
10
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
11
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
12
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
13
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
14
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
15
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
16
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
17
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
18
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
19
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
20
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण

‘ते’ विद्यार्थी शाळाबाह्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:09 IST

कोरपना तालुक्यातील एकमेव आयएसओ मानांकित जिल्हा परिषद शाळा, गेडामगुडा पटसंख्येअभावी बंद झाली आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी विशेष ग्रामसभा बोलावून आमची शाळा सुरू करा म्हणून ग्रामसभेत मागणी केली व तसा ‘पेसा’ ग्रामसभेचा ठराव सर्वानुमते मंजूर करून घेतला. मात्र सर्व पर्यायांचा वापर करूनही शाळा सुरु न झाल्याने गावकरी हताश झाले.

ठळक मुद्देपरीक्षेपासूनही वंचित : शासकीय धोरणाचा शासनालाच विसर

आशीष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कोरपना तालुक्यातील एकमेव आयएसओ मानांकित जिल्हा परिषद शाळा, गेडामगुडा पटसंख्येअभावी बंद झाली आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी विशेष ग्रामसभा बोलावून आमची शाळा सुरू करा म्हणून ग्रामसभेत मागणी केली व तसा ‘पेसा’ ग्रामसभेचा ठराव सर्वानुमते मंजूर करून घेतला. मात्र सर्व पर्यायांचा वापर करूनही शाळा सुरु न झाल्याने गावकरी हताश झाले. गावकऱ्यांनी शेजारच्या शाळेत विद्यार्थ्यांना न पाठविल्याने विद्यार्थी वार्षिक परीक्षेपासून वंचित तर राहिलेच; शिवाय नवीन सत्र सुरू झाल्यानंतर एकही दिवस शाळेत गेले नाही. शासनधोरणामुळेच हे विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहे.२६ जूनला शाळेची पहिली घंटा वाजली. मागील सत्रात तब्बल तीन महिने विद्यार्थी शाळेत गेले नाही. गेडामगुडा येथील विद्यार्थी सतत शाळाबाह्य असून त्यांच्या पालकांना समजावून सांगण्याची जबाबदारी कोणताही अधिकारी घेत नसल्याचे दिसते. येथील ग्रामस्थ इतर कोणत्याची शाळेत आपले विद्यार्थी पाठविण्यास तयार नाही. मागील सत्रात शिक्षण विभाग, तेथील पूर्वीचे मुख्याध्यापक लहू नवले यांनी येथील विद्यार्थ्यांना इतर शाळेत पाठविण्यासाठी गावात जाऊन प्रयत्न केले.मात्र गावकºयांनी एकच निर्णय घेतल्याने शिक्षण विभागाची पंचाईत झाली आहे. आमची शाळा सुरु झाल्यावरच आमचे विद्यार्थी शाळेत जातील, असा पवित्रा येथील लोकांनी घेतला आहे. शिक्षण विभाग यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विद्यार्थी हुशार; मात्र शिक्षणात खंडगेडामगुडा शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षणात हुशार आहेत. मात्र शिक्षणात तीन महिन्यांचा खंड पडल्याने विद्यार्थ्यांसह पालक फार हताश झाले आहे. आज नाही तर उद्या माय-बाप सरकार निर्णय घेऊन किमान गुणवत्तेच्या आधारावर आमची शाळा सुरु करतील, या आशेवर असलेल्या गावकऱ्यांच्या पदरी निराशाच आलेली आहे.शासन अनभिज्ञतीन महिन्यांपासून विद्यापर्थी शाळाबाह्य असून शासनास या गंभीर बाबीची कल्पना नसावी, ही मोठी शोकांतिका आहे. जिल्हास्तरावरून शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनी येथे भेट देऊन अहवाल सादर करण्याची गरज आहे. आरटीईनुसार एकही विद्यार्थी शाळाबाह्य असू नये, असे शासनाचे धोरण असताना शासनालाच या धोरणाचा विसर पडला की काय, असा प्रश्न लोकांना पडला आहे.गावकऱ्यांना शाळेचा अभिमानजिल्हा परिषद शाळा गेडामगुडा या शाळेने विद्यार्थ्यांना चांगले घडविले आहे. पालकांनी स्वत:ची शाळा समजून शाळेला मोठे योगदान दिले आहे. शेकडो शिक्षकांनी शाळेला भेटी दिल्या आहे. लोकसहभागातून शाळा घडली असल्यामुळे शाळेविषयी गावकऱ्यांना अभिमान आहे. शाळेचा दर्जा उंचावलेला आहे. असे उत्तम वातावरण, गुणवत्ता व लोकसहभाग असताना शासनाने शाळा बंद केल्याने पालकांवर मोठा आघात झाला आहे.