शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

राखीव वनक्षेत्राचा तातडीने पुनर्विचार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:36 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा महसुली विभागाअंतर्गत जिवती (माणिकगड पहाड) व राजुरा या दोन तालुक्यांमध्ये सुमारे ३३ हजार ४८६ हेक्टर जमीन न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य शासनाने २०१५ मध्ये राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले होते.

ठळक मुद्देकेंद्रीय समितीद्वारे अभ्यास : केंद्रीय वनमंत्र्यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा महसुली विभागाअंतर्गत जिवती (माणिकगड पहाड) व राजुरा या दोन तालुक्यांमध्ये सुमारे ३३ हजार ४८६ हेक्टर जमीन न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य शासनाने २०१५ मध्ये राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले होते. परिणामी विकासकामांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. या निर्णयाचा लवकरच पुनर्विचार केला जाणार असून, त्यासंदर्भात केंद्रीय समितीकडून अध्ययन करण्यात येणार आहे, असे आश्वासन केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले.जिवती व राजुरा तालुक्यातील ६० हजारांहून अधिक लोकांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे वनक्षेत्र म्हणून अधिसूचित झालेली ही जमीन वगळण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय ृराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना निवेदन सादर केले.उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने २०१० मध्ये दिलेल्या निवाड्यानुसार वनक्षेत्र म्हणून अधिसूचित झालेल्या या जमिनीमुळे जिवती व राजुरा महसूली भागातील विकासाची प्रक्रिया पूर्णत: ठप्प झाली आहे. हजारो कुटुंबीयांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून विकासापासून तालुक्यातील वंचित राहावे लागत आहे. शासनाच्या सोयी, सुविधा व सवलती मिळत नसल्याने ही जमीन वगळण्यात यावी, अशी मागणी ना. अहीर व शिष्टमंडळाने केली.केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री महोदयांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देऊन केंद्रीय वने व पर्यावरण विकास प्रक्रिया थांबविण्यात आल्याची माहिती चर्चेदरमयान दिली. या तालुक्यामध्ये वनक्षेत्राचे आरक्षण असल्यान विकास निधी गेल्या अनेक वर्षापासून खर्च होऊ शकला नाही, याकडेही ना. अहीर यांनी लक्ष वेधले. जीवनाशी निगडीत हा जटील प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय समितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अहवाल प्राप्त झाल्यानंतरच शेतकºयांना पट्टे दिले आहेत. या तालुक्यात दोन पोलीस ठाणे, ४३ उपपोलीस ठाणे, रुग्णालय, शाळा व ३५ ग्रामपंचायती आहेत.या सर्व बाबींचा व्यापक विचार करून केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने या प्रकरणात तातडीने निर्णय घ्यावा, असेही नाा. हंसराज अहीर यांनी चर्चेदरम्यान केली.केंद्रातून लवकरच अभ्यास पथक येणार असून, त्याद्वारे वनक्षेत्राचा अभ्यास करण्यात येणार आहे. अभ्यासानंतर अहवाल सादर करेल. या शिष्टमंडळात भाजपाचे जिवती तालुकाध्यक्ष केशवराव गिरमाजी अरुण मस्की, पं.स. उपसभापती महेश देवकते, सुरेश केंद्रे, दत्ताजी राठोड, प्रल्हाद मदने, गोविंद टोकरे यांचेसह अनेक मान्यवरांचा समावेश होता.