शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

विकासासाठी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडणार

By admin | Updated: September 29, 2014 00:43 IST

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात १५ वर्षांत नागरिकांना केवळ भ्रष्ट राजवट दिली आहे. लोकहिताचे कोणतेही उल्लेखनिय निर्णय यांच्या सरकारने घेतले नाही. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात

चंद्रपूर : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात १५ वर्षांत नागरिकांना केवळ भ्रष्ट राजवट दिली आहे. लोकहिताचे कोणतेही उल्लेखनिय निर्णय यांच्या सरकारने घेतले नाही. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातला विकास साधण्यासाठी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडणार असल्याचा विश्वास बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. रविवारी दुपारी बल्लारपूर शहरातील गांधी चौक परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते. मुनगंटीवार पुढे म्हणाले, बल्लारपूर शहरात विकासाची मोठी मालिका भाजपाच्या माध्यमातून तयार केली. बल्लारपूर तालुक्याच्या निर्मीतीनंतर शहरात ग्रामीण रुग्णालय, उपकोषागार कार्यालय, ११ कोटी रुपये किंमतीची पाणी पुरवठा योजना, न्यायालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा, चार कोटी रुपये किमंतीच्या नाट्यगृहाचे बांधकाम, बल्लारपूर येथे उपविभागीय कार्यालयाच्या निर्मीतीचा निर्णय, बल्लारपूर-सास्ती या गावांना जोडणाऱ्या पुलाचे वर्धा नदीवर बांधकाम अशी विविध विकासाची कामे आम्ही जनतेच्या प्रेमाच्या बळावर पूर्णत्वास आणली. विकास प्रक्रियेत कधीही आम्ही राजकारण केले नाही, असे ते म्हणाले. या सभेच्या मंचावर भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, छत्तीसगढचे माजी आमदार वीरेंद्र साहू, भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हरीश शर्मा, देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय दुबे, रेणुका दुबे, निलेश खरबडे, शिवचंद द्विवेदी, राजु गुंडेटी, धर्मप्रकाश दुबे, मीना चौधरी, अ‍ॅड.रणंजय सिंह उपस्थित होते. सभेला पुष्पा डंगोरे, वर्षा सुंचूवार, येलय्या दासरप यांच्यासह भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)