शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

विकासासाठी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडणार

By admin | Updated: September 29, 2014 00:43 IST

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात १५ वर्षांत नागरिकांना केवळ भ्रष्ट राजवट दिली आहे. लोकहिताचे कोणतेही उल्लेखनिय निर्णय यांच्या सरकारने घेतले नाही. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात

चंद्रपूर : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात १५ वर्षांत नागरिकांना केवळ भ्रष्ट राजवट दिली आहे. लोकहिताचे कोणतेही उल्लेखनिय निर्णय यांच्या सरकारने घेतले नाही. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातला विकास साधण्यासाठी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडणार असल्याचा विश्वास बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. रविवारी दुपारी बल्लारपूर शहरातील गांधी चौक परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते. मुनगंटीवार पुढे म्हणाले, बल्लारपूर शहरात विकासाची मोठी मालिका भाजपाच्या माध्यमातून तयार केली. बल्लारपूर तालुक्याच्या निर्मीतीनंतर शहरात ग्रामीण रुग्णालय, उपकोषागार कार्यालय, ११ कोटी रुपये किंमतीची पाणी पुरवठा योजना, न्यायालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा, चार कोटी रुपये किमंतीच्या नाट्यगृहाचे बांधकाम, बल्लारपूर येथे उपविभागीय कार्यालयाच्या निर्मीतीचा निर्णय, बल्लारपूर-सास्ती या गावांना जोडणाऱ्या पुलाचे वर्धा नदीवर बांधकाम अशी विविध विकासाची कामे आम्ही जनतेच्या प्रेमाच्या बळावर पूर्णत्वास आणली. विकास प्रक्रियेत कधीही आम्ही राजकारण केले नाही, असे ते म्हणाले. या सभेच्या मंचावर भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, छत्तीसगढचे माजी आमदार वीरेंद्र साहू, भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हरीश शर्मा, देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय दुबे, रेणुका दुबे, निलेश खरबडे, शिवचंद द्विवेदी, राजु गुंडेटी, धर्मप्रकाश दुबे, मीना चौधरी, अ‍ॅड.रणंजय सिंह उपस्थित होते. सभेला पुष्पा डंगोरे, वर्षा सुंचूवार, येलय्या दासरप यांच्यासह भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)