शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

आदिवासी जीवनावर वैचारिक लेखन व्हायला हवे

By admin | Updated: February 15, 2015 00:48 IST

आदिवासी व गैरआदिवासी लेखकांनी आदिवासी जीवनावर कथा, कादंबरी, काव्य इत्यादी प्रकारात लेखन केले आहे. मात्र, त्यात वैचारिकतेची प्रकर्षाने उणीव दिसून येते.

वसंत खेडेकर बल्लारपूरआदिवासी व गैरआदिवासी लेखकांनी आदिवासी जीवनावर कथा, कादंबरी, काव्य इत्यादी प्रकारात लेखन केले आहे. मात्र, त्यात वैचारिकतेची प्रकर्षाने उणीव दिसून येते. आदिवासी साहित्यातून वैचारिकता प्रकट होणे गरजेचे आहे. यावर सर्व साहित्यीकांनी विचार करावा, असे मत वक्त्यांनी येथे जिल्हा साहित्य संमेलनात मांडले. दोन दिवसीय साहित्य संमेलन येथील सरदार पटेल महाविद्यालयात सुरू आहे. आज, ‘चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी साहित्य वर्तमान आणि भवितव्य’ या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात वक्त्यांनी आपले विचार मांडलेत. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यीका उषा किरण आत्राम होत्या. सुनील कुमरे, प्रा. राम वासेकर, प्रा. प्रकाश वट्टी, सुदर्शन दिवटे हे या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते होते.सुनील कुमरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील लेखकांनी केलेल्या आदिवासी साहित्याची पूर्ण माहिती देत, उल्लेखनीय कादंबरी, काव्यसंग्रह, वैचारिक लेख, नाटक आणि ऐतिहासिक लेखन यांची समिक्षा केली. गैरआदिवासी लेखकांचे यासंदर्भात मोठे योगदान असल्याचे सांगत अ‍ॅड. एकनाथराव साळवे, प्रा. सुरेश द्वारशीवार, स्व. दादा देशकर यांच्या कादंबरीचा प्रामुख्याने उल्लेख केला. आदिवासी साहित्यीक हा केवळ लेखनापर्यंतच मर्यादित न राहता, त्यांनी आदिवासी चळवळीत सक्रीय भाग घ्यावा, असे आवाहनही केले. प्रा. राम वासेकर यांनी, आदिवासी साहित्यात आदिवासींचा हुंकार प्रगट व्हायला हवा. तसा तो दिसत नाही. तरीही डॉ. विनायक तुमराम, राजगडकर यांचे याबाबतचे कार्य उल्लेखनीय आहे. आदिवासींचे जीवन, त्यांच्या जाणिवा जगासमोर येण्याकरीता वस्तुस्थितीवर लिहिण्याकरीता तरुण लेखकांनी पुढे यावे, असे म्हणाले. आदिवासी साहित्य लिखीत आणि अलिखीत अशा दोन स्वरुपात आहे असे, सांगत प्रा. प्रकाश वट्टी यांनी आदिवासींना मोठा इतिहास आहे. ते या प्रांतावर सत्ता गाजवून गेले आहे. त्यांचे कार्य साहित्यातून उमटवावे असे मत मांंडले. सुदर्शन दिवटे यांनी आदिवासींवरील कादंबरी प्रकार यावर प्रकाश टाकला. आदिवासींवर बऱ्याच कांबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. मात्र वैचारिकतेचा त्यात अभाव दिसून येतो. अ‍ॅड. साळवे यांची ‘एनकाऊंटर’ ही कादंबरी उजवी आहे. या कादंबरीत घटनांसोबत वैचारिक पातळी आहे, असे सांगितले.