शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आदिवासी जीवनावर वैचारिक लेखन व्हायला हवे

By admin | Updated: February 15, 2015 00:48 IST

आदिवासी व गैरआदिवासी लेखकांनी आदिवासी जीवनावर कथा, कादंबरी, काव्य इत्यादी प्रकारात लेखन केले आहे. मात्र, त्यात वैचारिकतेची प्रकर्षाने उणीव दिसून येते.

वसंत खेडेकर बल्लारपूरआदिवासी व गैरआदिवासी लेखकांनी आदिवासी जीवनावर कथा, कादंबरी, काव्य इत्यादी प्रकारात लेखन केले आहे. मात्र, त्यात वैचारिकतेची प्रकर्षाने उणीव दिसून येते. आदिवासी साहित्यातून वैचारिकता प्रकट होणे गरजेचे आहे. यावर सर्व साहित्यीकांनी विचार करावा, असे मत वक्त्यांनी येथे जिल्हा साहित्य संमेलनात मांडले. दोन दिवसीय साहित्य संमेलन येथील सरदार पटेल महाविद्यालयात सुरू आहे. आज, ‘चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी साहित्य वर्तमान आणि भवितव्य’ या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात वक्त्यांनी आपले विचार मांडलेत. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यीका उषा किरण आत्राम होत्या. सुनील कुमरे, प्रा. राम वासेकर, प्रा. प्रकाश वट्टी, सुदर्शन दिवटे हे या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते होते.सुनील कुमरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील लेखकांनी केलेल्या आदिवासी साहित्याची पूर्ण माहिती देत, उल्लेखनीय कादंबरी, काव्यसंग्रह, वैचारिक लेख, नाटक आणि ऐतिहासिक लेखन यांची समिक्षा केली. गैरआदिवासी लेखकांचे यासंदर्भात मोठे योगदान असल्याचे सांगत अ‍ॅड. एकनाथराव साळवे, प्रा. सुरेश द्वारशीवार, स्व. दादा देशकर यांच्या कादंबरीचा प्रामुख्याने उल्लेख केला. आदिवासी साहित्यीक हा केवळ लेखनापर्यंतच मर्यादित न राहता, त्यांनी आदिवासी चळवळीत सक्रीय भाग घ्यावा, असे आवाहनही केले. प्रा. राम वासेकर यांनी, आदिवासी साहित्यात आदिवासींचा हुंकार प्रगट व्हायला हवा. तसा तो दिसत नाही. तरीही डॉ. विनायक तुमराम, राजगडकर यांचे याबाबतचे कार्य उल्लेखनीय आहे. आदिवासींचे जीवन, त्यांच्या जाणिवा जगासमोर येण्याकरीता वस्तुस्थितीवर लिहिण्याकरीता तरुण लेखकांनी पुढे यावे, असे म्हणाले. आदिवासी साहित्य लिखीत आणि अलिखीत अशा दोन स्वरुपात आहे असे, सांगत प्रा. प्रकाश वट्टी यांनी आदिवासींना मोठा इतिहास आहे. ते या प्रांतावर सत्ता गाजवून गेले आहे. त्यांचे कार्य साहित्यातून उमटवावे असे मत मांंडले. सुदर्शन दिवटे यांनी आदिवासींवरील कादंबरी प्रकार यावर प्रकाश टाकला. आदिवासींवर बऱ्याच कांबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. मात्र वैचारिकतेचा त्यात अभाव दिसून येतो. अ‍ॅड. साळवे यांची ‘एनकाऊंटर’ ही कादंबरी उजवी आहे. या कादंबरीत घटनांसोबत वैचारिक पातळी आहे, असे सांगितले.