शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
4
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
5
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
6
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
7
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
8
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
9
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
10
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
11
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
12
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
13
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
14
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
15
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
16
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
19
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
20
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

पीकविमा काढूनही पिकांचे सर्वेक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 00:54 IST

कोरपना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना अंमलात आणली.

शासन मस्त, शेतकरी त्रस्त : दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक अडचणीत आशिष देरकर कोरपनाकोरपना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे हप्ते कापण्यात आले असले तरी पिकांचे सर्वेक्षणच न झाल्याने पीक विम्याचा उपयोग काय, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.कापूस, सोयाबीन, भात, तूर या पिकांसाठी सदर योजना असून विविध चिंतेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक संजीवनी देणारी योजना ठरणार असे वाटले होते. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने ही योजना अभिनव ठरणार असल्याचे शासनाचे प्रतिनिधीही सांगत फिरत होते. मात्र हप्त्याच्या रूपाने शेतकऱ्यांचे पैसे तर गेलेच बदल्यात पदरात मोबदला मिळण्याची आशा शेतकऱ्यांना उरली नाही.शासकीय परिपत्रकानुसार विम्याचा मोबदला मिळविण्याच्या अनेक अटी आहेत. अनेक शेतकरी गरीब व निरक्षर आहेत. त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळवावा, हे माहित नाही. बँक म्हणते म्हणून ते विमाधारी झाले. मात्र अपुऱ्या माहितीमुळे लाभार्थी होईल याची शास्वती देता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या विम्याची रक्कम पाण्यात जाईल एवढे, मात्र खरे. शासन व बँकांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांमध्ये योग्य जनजागृती केली नसल्याने अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.कुठे गेले आधुनिक तंत्रज्ञान?या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान कोणत्याही त्रृटी राहू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार होता. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस पडला यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतमालाचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे याची पाहणी करण्यासाठी ड्रोन, स्मार्ट फोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार होता. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञान कुठे गायब झाले, हा प्रश्नच आहे.४८ तासांत द्यायची होती नुकसानीची माहितीशेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यास ती माहिती संबंधित विभागाच्या टोल फ्री नंबरवर ४८ तासांत द्यायची होती. मात्र शेतकऱ्यांमध्ये याबाबत जनजागृती नसल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी फसवी ठरत आहे.रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने काढला विमाचंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कजार्तून बँकेच्या माध्यमातून रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने पीक विमा काढला. मात्र विम्याचा साधा पुरावा शेतकऱ्यांजवळ नसल्याने अनेक शेतकरी असुरक्षित आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही मोबदला मिळतो की नाही, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी मात्र पुरावा मागण्यात येणार आहे.