शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा काढूनही पिकांचे सर्वेक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 00:54 IST

कोरपना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना अंमलात आणली.

शासन मस्त, शेतकरी त्रस्त : दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक अडचणीत आशिष देरकर कोरपनाकोरपना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे हप्ते कापण्यात आले असले तरी पिकांचे सर्वेक्षणच न झाल्याने पीक विम्याचा उपयोग काय, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.कापूस, सोयाबीन, भात, तूर या पिकांसाठी सदर योजना असून विविध चिंतेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक संजीवनी देणारी योजना ठरणार असे वाटले होते. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने ही योजना अभिनव ठरणार असल्याचे शासनाचे प्रतिनिधीही सांगत फिरत होते. मात्र हप्त्याच्या रूपाने शेतकऱ्यांचे पैसे तर गेलेच बदल्यात पदरात मोबदला मिळण्याची आशा शेतकऱ्यांना उरली नाही.शासकीय परिपत्रकानुसार विम्याचा मोबदला मिळविण्याच्या अनेक अटी आहेत. अनेक शेतकरी गरीब व निरक्षर आहेत. त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळवावा, हे माहित नाही. बँक म्हणते म्हणून ते विमाधारी झाले. मात्र अपुऱ्या माहितीमुळे लाभार्थी होईल याची शास्वती देता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या विम्याची रक्कम पाण्यात जाईल एवढे, मात्र खरे. शासन व बँकांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांमध्ये योग्य जनजागृती केली नसल्याने अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.कुठे गेले आधुनिक तंत्रज्ञान?या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान कोणत्याही त्रृटी राहू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार होता. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस पडला यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतमालाचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे याची पाहणी करण्यासाठी ड्रोन, स्मार्ट फोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार होता. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञान कुठे गायब झाले, हा प्रश्नच आहे.४८ तासांत द्यायची होती नुकसानीची माहितीशेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यास ती माहिती संबंधित विभागाच्या टोल फ्री नंबरवर ४८ तासांत द्यायची होती. मात्र शेतकऱ्यांमध्ये याबाबत जनजागृती नसल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी फसवी ठरत आहे.रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने काढला विमाचंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कजार्तून बँकेच्या माध्यमातून रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने पीक विमा काढला. मात्र विम्याचा साधा पुरावा शेतकऱ्यांजवळ नसल्याने अनेक शेतकरी असुरक्षित आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही मोबदला मिळतो की नाही, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी मात्र पुरावा मागण्यात येणार आहे.