शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पीकविमा काढूनही पिकांचे सर्वेक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 00:54 IST

कोरपना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना अंमलात आणली.

शासन मस्त, शेतकरी त्रस्त : दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक अडचणीत आशिष देरकर कोरपनाकोरपना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे हप्ते कापण्यात आले असले तरी पिकांचे सर्वेक्षणच न झाल्याने पीक विम्याचा उपयोग काय, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.कापूस, सोयाबीन, भात, तूर या पिकांसाठी सदर योजना असून विविध चिंतेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक संजीवनी देणारी योजना ठरणार असे वाटले होते. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने ही योजना अभिनव ठरणार असल्याचे शासनाचे प्रतिनिधीही सांगत फिरत होते. मात्र हप्त्याच्या रूपाने शेतकऱ्यांचे पैसे तर गेलेच बदल्यात पदरात मोबदला मिळण्याची आशा शेतकऱ्यांना उरली नाही.शासकीय परिपत्रकानुसार विम्याचा मोबदला मिळविण्याच्या अनेक अटी आहेत. अनेक शेतकरी गरीब व निरक्षर आहेत. त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळवावा, हे माहित नाही. बँक म्हणते म्हणून ते विमाधारी झाले. मात्र अपुऱ्या माहितीमुळे लाभार्थी होईल याची शास्वती देता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या विम्याची रक्कम पाण्यात जाईल एवढे, मात्र खरे. शासन व बँकांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांमध्ये योग्य जनजागृती केली नसल्याने अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.कुठे गेले आधुनिक तंत्रज्ञान?या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान कोणत्याही त्रृटी राहू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार होता. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस पडला यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतमालाचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे याची पाहणी करण्यासाठी ड्रोन, स्मार्ट फोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार होता. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञान कुठे गायब झाले, हा प्रश्नच आहे.४८ तासांत द्यायची होती नुकसानीची माहितीशेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यास ती माहिती संबंधित विभागाच्या टोल फ्री नंबरवर ४८ तासांत द्यायची होती. मात्र शेतकऱ्यांमध्ये याबाबत जनजागृती नसल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी फसवी ठरत आहे.रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने काढला विमाचंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कजार्तून बँकेच्या माध्यमातून रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने पीक विमा काढला. मात्र विम्याचा साधा पुरावा शेतकऱ्यांजवळ नसल्याने अनेक शेतकरी असुरक्षित आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही मोबदला मिळतो की नाही, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी मात्र पुरावा मागण्यात येणार आहे.