शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

संचालकाच्या मध्यस्थीनंतरही तोडगा नाही

By admin | Updated: February 7, 2017 00:32 IST

तालुक्यातील धोपटाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा, सुब्बई, चिंचोली येथील जमिनी अधिग्रहित केल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे.

वेकोलि प्रकल्पग्रस्त : केंद्रीय मंत्र्यांची आंदोलनकर्त्यांशी चर्चाराजुरा : तालुक्यातील धोपटाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा, सुब्बई, चिंचोली येथील जमिनी अधिग्रहित केल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकल्पाला जलद गतीने सुरु करण्यासाठी प्रयत्न करुन प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन केंद्रीय राज्यगृहमंत्री हंसराज अहीर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या उपोषण मंडपाला भेटी दरम्यान बोलताना दिले. केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर यांच्या सूचनेनुसार जीएम कार्यालयामध्ये वेकोलिचे डायरेक्टर पर्सनल डॉ. संजय कुमार यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त शेतकरी, शासकीय अधिकारी यांची दोन तास बैठक झाली. यावेळी वेकोलिचे जीएम आर. के. मिश्रा, नागपूरचे अधिकारी आनंद आझमी, बी. के. गुप्ता, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी विजय चन्ने, नियोजन अधिकारी मनोज नवले, राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे उपस्थित होते. मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरुच असून राजू मोहारे, विकास घटे, सोनू गाडगे, बाळू जुलमे, बालाजी पिंपळकर, रवींद्र बोबडे, पुष्पा बुधवारे, मुर्लीधर फटाले आदी शेतकरी आमरण उपोषण करीत आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती खालावत असून त्याच्या समर्थनार्थ २०० महिला पुरुष रात्रदिवस उपोषणाला करीत आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, यासाठी शासकीय अधिकारी, पोलीस विभाग सर्वोतोपरी मदत करीत आहे. परंतु राष्ट्रीय स्तरावरील १० सदस्यीय बोर्ड बैठकीमध्ये या खदानीला मंजुरी मिळणार नाही, तोपर्यंत प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न सुटणे कठीण आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी सकारात्मक पाठपुरावा करणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी) बार्डाच्या बैठकीशिवाय तोडगा अशक्यवेकोलिचे डायरेक्टर (पर्सनल) डॉ. संजय कुमार यांनी स्पष्टपणे सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरील बोर्डाच्या बैठकीत मार्च महिन्यात प्रकल्पांच्या मंजुरीचा प्रस्ताव ठेवण्यात येईल आणि यामध्ये निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. या बैठकीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील १० सदस्य असून धोपटाळा प्रकल्प सुरु करण्यासाठी बोर्डाच्या बैठकीची परवानगी मिळाल्याशिवाय आम्ही काहीच करु शकत नाही. कोळसा खरेदीकरिता ग्राहक उपलब्ध नाही. त्याकरिता महाजनकोकडे विनंती केली आहे. वीज प्रकल्प बंद होत असल्यामुळे कोळसा विक्री मंदावली असून वेकोलिच्या मार्फत प्रयत्न सुरु आहेत.प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरुच राहणार- विजय चन्नेउपोषणाचा पाचवा दिवस असून मागील पाच वर्षांपासून नोकरी आणि पैशाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यामुळे ८७१ हेक्टर जमीन आणि १ हजार ८० नौकऱ्याचा ज्वलंत प्रश्न आहे. वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या माहितीवरुन समाधान न झाल्यामुळे बेमुदत उपोषण सुरुच ठेवण्यात येत असल्याचे विजय चन्ने यांनी सांगितले.