शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

संचालकाच्या मध्यस्थीनंतरही तोडगा नाही

By admin | Updated: February 7, 2017 00:32 IST

तालुक्यातील धोपटाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा, सुब्बई, चिंचोली येथील जमिनी अधिग्रहित केल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे.

वेकोलि प्रकल्पग्रस्त : केंद्रीय मंत्र्यांची आंदोलनकर्त्यांशी चर्चाराजुरा : तालुक्यातील धोपटाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा, सुब्बई, चिंचोली येथील जमिनी अधिग्रहित केल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकल्पाला जलद गतीने सुरु करण्यासाठी प्रयत्न करुन प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन केंद्रीय राज्यगृहमंत्री हंसराज अहीर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या उपोषण मंडपाला भेटी दरम्यान बोलताना दिले. केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर यांच्या सूचनेनुसार जीएम कार्यालयामध्ये वेकोलिचे डायरेक्टर पर्सनल डॉ. संजय कुमार यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त शेतकरी, शासकीय अधिकारी यांची दोन तास बैठक झाली. यावेळी वेकोलिचे जीएम आर. के. मिश्रा, नागपूरचे अधिकारी आनंद आझमी, बी. के. गुप्ता, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी विजय चन्ने, नियोजन अधिकारी मनोज नवले, राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे उपस्थित होते. मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरुच असून राजू मोहारे, विकास घटे, सोनू गाडगे, बाळू जुलमे, बालाजी पिंपळकर, रवींद्र बोबडे, पुष्पा बुधवारे, मुर्लीधर फटाले आदी शेतकरी आमरण उपोषण करीत आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती खालावत असून त्याच्या समर्थनार्थ २०० महिला पुरुष रात्रदिवस उपोषणाला करीत आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, यासाठी शासकीय अधिकारी, पोलीस विभाग सर्वोतोपरी मदत करीत आहे. परंतु राष्ट्रीय स्तरावरील १० सदस्यीय बोर्ड बैठकीमध्ये या खदानीला मंजुरी मिळणार नाही, तोपर्यंत प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न सुटणे कठीण आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी सकारात्मक पाठपुरावा करणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी) बार्डाच्या बैठकीशिवाय तोडगा अशक्यवेकोलिचे डायरेक्टर (पर्सनल) डॉ. संजय कुमार यांनी स्पष्टपणे सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरील बोर्डाच्या बैठकीत मार्च महिन्यात प्रकल्पांच्या मंजुरीचा प्रस्ताव ठेवण्यात येईल आणि यामध्ये निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. या बैठकीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील १० सदस्य असून धोपटाळा प्रकल्प सुरु करण्यासाठी बोर्डाच्या बैठकीची परवानगी मिळाल्याशिवाय आम्ही काहीच करु शकत नाही. कोळसा खरेदीकरिता ग्राहक उपलब्ध नाही. त्याकरिता महाजनकोकडे विनंती केली आहे. वीज प्रकल्प बंद होत असल्यामुळे कोळसा विक्री मंदावली असून वेकोलिच्या मार्फत प्रयत्न सुरु आहेत.प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरुच राहणार- विजय चन्नेउपोषणाचा पाचवा दिवस असून मागील पाच वर्षांपासून नोकरी आणि पैशाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यामुळे ८७१ हेक्टर जमीन आणि १ हजार ८० नौकऱ्याचा ज्वलंत प्रश्न आहे. वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या माहितीवरुन समाधान न झाल्यामुळे बेमुदत उपोषण सुरुच ठेवण्यात येत असल्याचे विजय चन्ने यांनी सांगितले.