शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

नवीन जिल्हानिर्मिती तूर्तास नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 01:06 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जिल्ह्याची मागणी उफाळून आली आहे. त्याकरिता जनआंदोलनदेखील पेटले आहे.

सुधीर मुनगंटीवार : वरोरा जिल्ह्यासाठी निवेदन वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जिल्ह्याची मागणी उफाळून आली आहे. त्याकरिता जनआंदोलनदेखील पेटले आहे. वरोरा तालुक्यातील एका शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले असता त्यांनी राज्यात तुर्तास नवीन जिल्हा निर्मिती करण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड व सिंदेवाही या तालुक्यांच्या गावांना काही इतर तालुके जोडून नवीन जिल्हा निर्मिती करण्याबाबत गेल्या १० दिवसांत जनआंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद पाहून वरोऱ्यातील नागरिकांनी आंदोलन न करता पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांची भेट घेतली. वरोरा जिल्हा निर्माण करावा, असे निवेदन सादर केले. चिमूर, नागभीड व ब्रह्मपुरी हे जिल्हा निर्मितीकरिता कसे योग्य आहेत, हे पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच धर्तीवर वरोरा येथील शिष्टमंडळाने वरोरा तालुकादेखील नवीन जिल्ह्यासाठी उपयुक्त असल्याचा युक्तिवाद ना. मुनगंटीवार यांच्या समक्ष केला. इतर सर्व तालुक्यांच्या तुलनेत नवीन जिल्ह्यासाठी वरोरा तालुका परिपूर्ण आणि सक्षम आहे. त्यामुळे वरोरा जिल्हा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात प्रवीण धनवलकर, गिरीष जयस्वाल, डॉ. भगवान गायकवाड, विलास टिपले, छोटूभाई शेख यांच्यासह व्यापारी वर्ग उपस्थित होता. (शहर प्रतिनिधी)