शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रकल्पग्रस्तांना सुविधा पुरविण्यात हयगय नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

पैनगंगा कोळसा खाणीत  दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला. औद्योगिक जिल्ह्यात अशा दुर्घटना घडणे योग्य नाही. त्यामुळे प्रकल्प प्रमुखांनी कामगार कायद्यांचे पालन करावे. कामगारांच्या मृत्यूची चौकशी आठवडाभरात करण्याचे निर्देश  पालकमंत्र्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिले. कोळसा खाणीत शेकडो कामगार कार्यरत आहेत. त्यांना कायद्याप्रमाणे वेतन व भत्ते वेळेत मिळावेत. अनेक कारखान्यांमध्ये वेतनाबाबत तफावत असल्याने समानता असावी. वेकोलिने करार तत्त्वावरील कामगारांना श्रमाचा योग्य मोबदला द्यावा, असे निर्देश मंत्री वडेट्टीवार यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढून वेकोलिने नागरी सुविधा पुरवाव्यात.   या कामात हयगय करू नये. येत्या दोन आठवड्यात याबाबत पुन्हा आढावा घेण्यात येईल, अशी सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकल्पग्रस्त आढावा बैठकीत केली.यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते,  जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, वेकोलि वणी क्षेत्र व्यवस्थापक आर. बी. सिंह, उपप्रबंधक रोहित मेश्राम, अधीक्षक एम. वाय. पुरटकर आदींसह देवगडे, मारोती पिंपळकर, गौतम धोटे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.पैनगंगा कोळसा खाणीत  दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला. औद्योगिक जिल्ह्यात अशा दुर्घटना घडणे योग्य नाही. त्यामुळे प्रकल्प प्रमुखांनी कामगार कायद्यांचे पालन करावे. कामगारांच्या मृत्यूची चौकशी आठवडाभरात करण्याचे निर्देश  पालकमंत्र्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिले. कोळसा खाणीत शेकडो कामगार कार्यरत आहेत. त्यांना कायद्याप्रमाणे वेतन व भत्ते वेळेत मिळावेत. अनेक कारखान्यांमध्ये वेतनाबाबत तफावत असल्याने समानता असावी. वेकोलिने करार तत्त्वावरील कामगारांना श्रमाचा योग्य मोबदला द्यावा, असे निर्देश मंत्री वडेट्टीवार यांनी दिले. जमिनीच्या भूसंपादनाचा मोबदला व पुनर्वसनसंदर्भात शेतकऱ्यांशी वाटाघाटी करावी. कोळसा खाणीमुळे त्या भागात प्रदूषण होते. यासाठी पर्यावरण विभागाने पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी. वेकोलिने धुळीवर दररोज पाणी टाकण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

सहा महिन्यांत पुनर्वसन- पैनगंगा प्रकल्पांतर्गत  विरूर गाडे येथील ७२ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी जलदगतीने काम करावे. पात्र उर्वरित ३८ कुटुंबांपैकी १९ कुटुंबांचे पुनवर्सनस्थळी भूखंड विकल्प बदलाच्या प्रस्तावांवर व अनुदान विकल्पास मंजुरी द्यावी. प्रकल्पग्रस्तांचा हक्क  डावलू नये. पुनर्वसनाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केली. कोळसा खाणीमुळे शेताकडे जाण्याचे रस्ते बंद झाले. नदीचे प्रवाह बदलल्याने सर्वेक्षण करावे, अल्ट्राटेक सिमेंट उदयोगातील कामगारांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था कार्यस्थळी करावी, असेेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी  कामगारांनी अडचणी मांडल्या.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcollectorजिल्हाधिकारी