शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

प्रकल्पग्रस्तांना सुविधा पुरविण्यात हयगय नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

पैनगंगा कोळसा खाणीत  दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला. औद्योगिक जिल्ह्यात अशा दुर्घटना घडणे योग्य नाही. त्यामुळे प्रकल्प प्रमुखांनी कामगार कायद्यांचे पालन करावे. कामगारांच्या मृत्यूची चौकशी आठवडाभरात करण्याचे निर्देश  पालकमंत्र्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिले. कोळसा खाणीत शेकडो कामगार कार्यरत आहेत. त्यांना कायद्याप्रमाणे वेतन व भत्ते वेळेत मिळावेत. अनेक कारखान्यांमध्ये वेतनाबाबत तफावत असल्याने समानता असावी. वेकोलिने करार तत्त्वावरील कामगारांना श्रमाचा योग्य मोबदला द्यावा, असे निर्देश मंत्री वडेट्टीवार यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढून वेकोलिने नागरी सुविधा पुरवाव्यात.   या कामात हयगय करू नये. येत्या दोन आठवड्यात याबाबत पुन्हा आढावा घेण्यात येईल, अशी सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकल्पग्रस्त आढावा बैठकीत केली.यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते,  जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, वेकोलि वणी क्षेत्र व्यवस्थापक आर. बी. सिंह, उपप्रबंधक रोहित मेश्राम, अधीक्षक एम. वाय. पुरटकर आदींसह देवगडे, मारोती पिंपळकर, गौतम धोटे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.पैनगंगा कोळसा खाणीत  दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला. औद्योगिक जिल्ह्यात अशा दुर्घटना घडणे योग्य नाही. त्यामुळे प्रकल्प प्रमुखांनी कामगार कायद्यांचे पालन करावे. कामगारांच्या मृत्यूची चौकशी आठवडाभरात करण्याचे निर्देश  पालकमंत्र्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिले. कोळसा खाणीत शेकडो कामगार कार्यरत आहेत. त्यांना कायद्याप्रमाणे वेतन व भत्ते वेळेत मिळावेत. अनेक कारखान्यांमध्ये वेतनाबाबत तफावत असल्याने समानता असावी. वेकोलिने करार तत्त्वावरील कामगारांना श्रमाचा योग्य मोबदला द्यावा, असे निर्देश मंत्री वडेट्टीवार यांनी दिले. जमिनीच्या भूसंपादनाचा मोबदला व पुनर्वसनसंदर्भात शेतकऱ्यांशी वाटाघाटी करावी. कोळसा खाणीमुळे त्या भागात प्रदूषण होते. यासाठी पर्यावरण विभागाने पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी. वेकोलिने धुळीवर दररोज पाणी टाकण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

सहा महिन्यांत पुनर्वसन- पैनगंगा प्रकल्पांतर्गत  विरूर गाडे येथील ७२ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी जलदगतीने काम करावे. पात्र उर्वरित ३८ कुटुंबांपैकी १९ कुटुंबांचे पुनवर्सनस्थळी भूखंड विकल्प बदलाच्या प्रस्तावांवर व अनुदान विकल्पास मंजुरी द्यावी. प्रकल्पग्रस्तांचा हक्क  डावलू नये. पुनर्वसनाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केली. कोळसा खाणीमुळे शेताकडे जाण्याचे रस्ते बंद झाले. नदीचे प्रवाह बदलल्याने सर्वेक्षण करावे, अल्ट्राटेक सिमेंट उदयोगातील कामगारांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था कार्यस्थळी करावी, असेेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी  कामगारांनी अडचणी मांडल्या.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcollectorजिल्हाधिकारी