शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पहाडावर रोजगार हमीचा श्रीगणेशाच नाही

By admin | Updated: November 19, 2014 22:36 IST

श्रमिकाला काम करण्याचा कायदेशीर हक्क मानून रोजगार हमी योजनेद्वारे तो कृतीत आणणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. सर्वसामान्य माणूस ज्या योजनेचा गाभा आहे, अशा रोजगार हमी योजनेच्या

शंकर चव्हाण - जिवती श्रमिकाला काम करण्याचा कायदेशीर हक्क मानून रोजगार हमी योजनेद्वारे तो कृतीत आणणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. सर्वसामान्य माणूस ज्या योजनेचा गाभा आहे, अशा रोजगार हमी योजनेच्या कामांचा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे जिवती तालुक्यात श्रीगणेशाच झाला नाही. त्यामुळे मजुरांना रोजगारासाठी येथून स्थलांतरित व्हावे लागत आहे.सततच्या नशिबी पडलेला कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ आणि शासनाच्या जबाबदार अधिकाऱ्याच्या निष्क्रीयतेमुळे स्वातंत्र्याची पन्नाशी उलटली तरीही जनतेच्या भाकरीचा प्रश्न सुटलेला नाही. अशा स्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इकडे तिकडे भटकण्याची पाळी या दुर्गम भागातील नागरिकांवर आली आहे. कित्येक कुटुंबांना तर दररोज आपली पोटाची खडगी भरणे कठीण होत आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. संसारउपयोगी साहित्य खरेदी करताकरता नेहमी डोळ्यातून अश्रु पडतात. सामान्य माणूस महागाईच्या कचाट्यात सापडला असताना दुबार तिबार पेरणी करूनही शेतातील पीक हाती येत नाही. तालुक्यात रोजगार मिळत नाही. स्थलांतरित होऊन ठेकेदार कंत्राटदार यांच्या कचाट्यात राहून शक्तीचे व मेहनतीचे काम त्यांना स्वीकारावे लागते. प्रत्येक गावातच मागेल त्याला काम देणारी शासनाची रोजगार हमी योजना जिवती तालुक्यात कुचकामी ठरू लागली आहे. कुपोषणाने दरवर्षी अनेक बालकाचा मृत्यू होतो. कितीही प्रयत्न केले तरीही कुपोषणाला आळा बसलेला दिसून येत नाही. कुपोषणामुळे मरणारी जास्तीत जास्त मुले गरिबांची, दलित, आदिवासी, बंजाराची असतात. माता व बालकाला पुरेसे अन्न व सकस आहार मिळत नाही. शासन अंगणवाडीच्या माध्यमातून सकस आहार देऊन कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न करीत असले तरी कामाच्या शोधात भटकंती करणाऱ्या मजुरांच्या मुलांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते.