शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

आठ तालुक्यांत अग्निशमन यंत्रणा नाही

By admin | Updated: December 31, 2014 23:22 IST

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अग्निशमन यंत्रणा महत्वाची आहे. परंतु जिल्ह्यातील आठ तालुक्यात अग्निशमन यंत्रणा नसल्याने आगीच्या घटना घडल्यास मोठी दुर्घटना

जयंत जेनेकर - कान्हाळगावआगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अग्निशमन यंत्रणा महत्वाची आहे. परंतु जिल्ह्यातील आठ तालुक्यात अग्निशमन यंत्रणा नसल्याने आगीच्या घटना घडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.चंद्रपूर येथे महानगरपालिका आहे. वरोरा, भद्रावती, मूल, राजुरा, ब्रह्मपुरी, बल्लारपूर येथे नगर परिषदेची स्वतंत्र यंत्रणा आहे. याशिवाय काही उद्योगांकडेही स्वत:ची अग्निशमन यंत्रणा आहे. मात्र पोंभुर्णा, जिवती, चिमूर, सिंदेवाही, कोरपना, नागभीड, गोंडपिपरी, सावली या तालुक्यात कुठलीच यंत्रणा नसल्याने जवळच्या नगर परिषद व उद्योगांच्या अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते. या तालुक्यात ही यंत्रणा असलेल्या स्थळांचे अंतर जास्त आहे. त्यामुळे आगीची घटना घडल्यानंतर अग्निशमन वाहन येतपर्यंत मोठे नुकसान होते. यातील काही तालुक्यांचा लोकसंख्या व क्षेत्रफळांच्या दृष्टीकोनातून विस्तार मोठा आहे. एखादी आगीची घटना घडल्यास त्या गावात दोन-तीन तासानंतर वाहने पोहचतात. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान होते. प्रभावी सुरक्षा साधने नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होते. यातील काही अग्निशमन दलाची वाहने नादुरुस्त असल्याने त्याचाही फटका अनेकवेळ बसतो. आगीमुळे होणारे नुकसान कमी होण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत असली तरी, प्रत्यक्षात सर्वकाही संपल्यावर वाहने दाखल होतात अशी अवस्था आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या चंद्रपूर येथेही पुरेसे कर्मचारी नाही. अनेकवेळा येथूनही अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येते. मात्र दल अनेकवेळा वेळेवर पोहचतच नाही.प्रत्येक तालुकास्तरावर अग्निशमन विभाग उभारून अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्याचा विस्तार मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. औद्योगिक जिल्हा असल्याने अपघाताच्या घटना नेहमी घडत असतात, अशावेळी अग्निशमनय यंत्रणा अद्यावत असणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हास्तरावरून अग्निशमन यंत्रणेसाठी पाऊल उचलने महत्वाचे आहे . (वार्ताहर)