शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

आठ तालुक्यांत अग्निशमन यंत्रणा नाही

By admin | Updated: December 31, 2014 23:22 IST

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अग्निशमन यंत्रणा महत्वाची आहे. परंतु जिल्ह्यातील आठ तालुक्यात अग्निशमन यंत्रणा नसल्याने आगीच्या घटना घडल्यास मोठी दुर्घटना

जयंत जेनेकर - कान्हाळगावआगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अग्निशमन यंत्रणा महत्वाची आहे. परंतु जिल्ह्यातील आठ तालुक्यात अग्निशमन यंत्रणा नसल्याने आगीच्या घटना घडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.चंद्रपूर येथे महानगरपालिका आहे. वरोरा, भद्रावती, मूल, राजुरा, ब्रह्मपुरी, बल्लारपूर येथे नगर परिषदेची स्वतंत्र यंत्रणा आहे. याशिवाय काही उद्योगांकडेही स्वत:ची अग्निशमन यंत्रणा आहे. मात्र पोंभुर्णा, जिवती, चिमूर, सिंदेवाही, कोरपना, नागभीड, गोंडपिपरी, सावली या तालुक्यात कुठलीच यंत्रणा नसल्याने जवळच्या नगर परिषद व उद्योगांच्या अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते. या तालुक्यात ही यंत्रणा असलेल्या स्थळांचे अंतर जास्त आहे. त्यामुळे आगीची घटना घडल्यानंतर अग्निशमन वाहन येतपर्यंत मोठे नुकसान होते. यातील काही तालुक्यांचा लोकसंख्या व क्षेत्रफळांच्या दृष्टीकोनातून विस्तार मोठा आहे. एखादी आगीची घटना घडल्यास त्या गावात दोन-तीन तासानंतर वाहने पोहचतात. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान होते. प्रभावी सुरक्षा साधने नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होते. यातील काही अग्निशमन दलाची वाहने नादुरुस्त असल्याने त्याचाही फटका अनेकवेळ बसतो. आगीमुळे होणारे नुकसान कमी होण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत असली तरी, प्रत्यक्षात सर्वकाही संपल्यावर वाहने दाखल होतात अशी अवस्था आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या चंद्रपूर येथेही पुरेसे कर्मचारी नाही. अनेकवेळा येथूनही अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येते. मात्र दल अनेकवेळा वेळेवर पोहचतच नाही.प्रत्येक तालुकास्तरावर अग्निशमन विभाग उभारून अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्याचा विस्तार मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. औद्योगिक जिल्हा असल्याने अपघाताच्या घटना नेहमी घडत असतात, अशावेळी अग्निशमनय यंत्रणा अद्यावत असणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हास्तरावरून अग्निशमन यंत्रणेसाठी पाऊल उचलने महत्वाचे आहे . (वार्ताहर)