शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

आठ तालुक्यांत अग्निशमन यंत्रणा नाही

By admin | Updated: December 31, 2014 23:22 IST

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अग्निशमन यंत्रणा महत्वाची आहे. परंतु जिल्ह्यातील आठ तालुक्यात अग्निशमन यंत्रणा नसल्याने आगीच्या घटना घडल्यास मोठी दुर्घटना

जयंत जेनेकर - कान्हाळगावआगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अग्निशमन यंत्रणा महत्वाची आहे. परंतु जिल्ह्यातील आठ तालुक्यात अग्निशमन यंत्रणा नसल्याने आगीच्या घटना घडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.चंद्रपूर येथे महानगरपालिका आहे. वरोरा, भद्रावती, मूल, राजुरा, ब्रह्मपुरी, बल्लारपूर येथे नगर परिषदेची स्वतंत्र यंत्रणा आहे. याशिवाय काही उद्योगांकडेही स्वत:ची अग्निशमन यंत्रणा आहे. मात्र पोंभुर्णा, जिवती, चिमूर, सिंदेवाही, कोरपना, नागभीड, गोंडपिपरी, सावली या तालुक्यात कुठलीच यंत्रणा नसल्याने जवळच्या नगर परिषद व उद्योगांच्या अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते. या तालुक्यात ही यंत्रणा असलेल्या स्थळांचे अंतर जास्त आहे. त्यामुळे आगीची घटना घडल्यानंतर अग्निशमन वाहन येतपर्यंत मोठे नुकसान होते. यातील काही तालुक्यांचा लोकसंख्या व क्षेत्रफळांच्या दृष्टीकोनातून विस्तार मोठा आहे. एखादी आगीची घटना घडल्यास त्या गावात दोन-तीन तासानंतर वाहने पोहचतात. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान होते. प्रभावी सुरक्षा साधने नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होते. यातील काही अग्निशमन दलाची वाहने नादुरुस्त असल्याने त्याचाही फटका अनेकवेळ बसतो. आगीमुळे होणारे नुकसान कमी होण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत असली तरी, प्रत्यक्षात सर्वकाही संपल्यावर वाहने दाखल होतात अशी अवस्था आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या चंद्रपूर येथेही पुरेसे कर्मचारी नाही. अनेकवेळा येथूनही अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येते. मात्र दल अनेकवेळा वेळेवर पोहचतच नाही.प्रत्येक तालुकास्तरावर अग्निशमन विभाग उभारून अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्याचा विस्तार मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. औद्योगिक जिल्हा असल्याने अपघाताच्या घटना नेहमी घडत असतात, अशावेळी अग्निशमनय यंत्रणा अद्यावत असणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हास्तरावरून अग्निशमन यंत्रणेसाठी पाऊल उचलने महत्वाचे आहे . (वार्ताहर)