शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

घरकुल नाही तर मतदान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:31 IST

चिमुर तालुक्यातील हिरापूर येथील ओबीसी समाजातील पात्र कुटुंंबांना घरकूल योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. दरम्यान, ३१ डिसेंबर २०१८ ला ग्रामपंचायतमध्ये आमसभा घेण्यात आली. ओबीसी कुटुंंबांना घरकूल मिळाले नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देहिरापूर आमसभेत ठराव : ओबीसी कुटुंबांवर अन्याय

लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : चिमुर तालुक्यातील हिरापूर येथील ओबीसी समाजातील पात्र कुटुंंबांना घरकूल योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. दरम्यान, ३१ डिसेंबर २०१८ ला ग्रामपंचायतमध्ये आमसभा घेण्यात आली. ओबीसी कुटुंंबांना घरकूल मिळाले नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.हिरापूर ग्रामपंचायतमध्ये या वर्षात एकूण ४० घरकूल मंजूर करण्यात आले. पण पंचायत समितीने ओबीसींसाठी सन २०१३ ते १८ या कालावधीत फक्त चार घरकूल मंजूर केले. गावात ओबीसींची संख्या ६० टक्के आहे. यातील बहुतांश कुटुंबेआर्थिकदृष्ट्या मागास असून कुडाच्या राहतात. मागील १५ ते २० वर्षांपासून ओबीसी कुटुंबांना घरकूल योजनेतून वगळण्यात येत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसी समाजाला विविध योजनांचा लाभ मिळत नाही.सरपंच, सचिव आणि ग्रा.पं. सदस्यांनी घरकूल मिळवून देण्याची जबाबदारी आमची नाही, असे जाहीरपणे सांगतात. ओबीसी नागरिकांची मागणी फेटाळून लावतात. यामुळे ओबीसी नागरिकामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मागील वर्षी याच गावात एका ग्रामपंचायत सदस्याला घरकूल मंजूर झाले. दरम्यान त्यांच्या दोन अविवाहीत मुले एकत्र कुटुंबात असतानाही आणखी दोन घरकूल मंजूर करण्यात आले होते. हिरापूर ग्रामपंचायतमध्ये असा भोंगळ भोंगळ सुरू आहे, असल्याची टीका आमसभेत नागरिकांनी केली.बहुसंख्य ओबीसी समाज आर्थिक दृष्ट्या मागास असताना घरकूल योजनेपासून डावलणे सुरू असल्याने येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीता मतदानावर बहिस्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.यावेळी संदीप गुरनुले, हरिश पंचवटे, मनोज सोगलकर, रामदास चंदेलकर, शेखर आदे, विलास बघीले, पुंडलिक बघीले, रोशन डांगे आदींसह ओबीसी समाजाचे बहुसंख्य कुटुंब उपस्थित होते.