शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

मानवीमूल्यांचा उद्घोष करणारे साहित्य हवे

By admin | Updated: February 12, 2017 00:37 IST

आदिवासी साहित्यकारांनी वैश्विक साहित्य निर्मितीकडे झेप घेऊन आपल्या व्यक्तिगत अनुभवांना व्यापक रूप द्यावे. लेखन विज्ञाननिष्ट असावे.

बल्लारपुरात चर्चासत्र : अक्षयकुमार काळे यांचे प्रतिपादनबल्लारपूर : आदिवासी साहित्यकारांनी वैश्विक साहित्य निर्मितीकडे झेप घेऊन आपल्या व्यक्तिगत अनुभवांना व्यापक रूप द्यावे. लेखन विज्ञाननिष्ट असावे. त्यात समाजाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. साहित्याचा प्रकार कोणताही असो. त्यात मानवीमूल्यांचा उद्घोष असावा, असे प्रतिपादन अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी येथे केले.स्थानिक भालेराव पब्लिक स्कूलच्या प्रांगणात साहित्य अकादमी आणि आदिवासी उलगुलान उत्कर्ष संस्था बल्लारपूर यांचे संयुक्त विद्यमान ‘आदिवासी साहित्याचे विविध आयाम’, या विषयावर शनिवारपासून दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन केल्यावर डॉ. काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. विनायक तुमराम होते. याप्रसंगी मंचावर आदिवासी उलगुलान उत्कर्ष संस्थेचे सल्लागार सुनील कुमरे व संस्थेचे अध्यक्ष संतोष आत्राम उपस्थित होते.साहित्य अकादमी विषयी माहिती देताना डॉ. काळे म्हणाले, अकादमीद्वारा विविध भारतीय ग्रंथांचे भारतीय भाषांमध्ये भाषांंतर करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. साहित्य जतन करणे व त्याला चालना देणे हे या संस्थेचे काम असून आजचे हे चर्चासत्र त्याचाच एक भाग आहे. नागर संस्कृतीच्या लेखकांनी आदिवासींबाबत त्यांच्या समस्यांबाबत लिहावे, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. विनायक तुमराम म्हणाले की, लेखनात बोलघेवडेपणा नसावा. त्यात धार हवी. साहित्य समाजाच्या दूर जाणारे नसावे. अ.भा. मराठी साहित्य संमेलनात आदिवासी लेखकांना निमंत्रित केले जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आदिवासी हे वनवासी नाहीत तर ते राज्यकर्ते आहेत. त्यांनी या भागात ८०० वर्षे राज्य केले आहे, हे विसरू नये, असे इतिहासाचा दाखला डॉ. तुमराम यांनी दिला.प्रास्ताविक व संचालन सुनील कुमरे व कृष्णा किम्बहुने तर आभार प्रदर्शन संतोष आत्राम यांनी केले. यावेळी डॉ. काळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर जागतिकीकरण आणि आदिवासींचा निसर्ग धर्म’, ‘आदिवासी साहित्य नवे संदर्भ व नवे आकलन’, या दोन विषयांवर परिसंवाद घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)