शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मानवीमूल्यांचा उद्घोष करणारे साहित्य हवे

By admin | Updated: February 12, 2017 00:37 IST

आदिवासी साहित्यकारांनी वैश्विक साहित्य निर्मितीकडे झेप घेऊन आपल्या व्यक्तिगत अनुभवांना व्यापक रूप द्यावे. लेखन विज्ञाननिष्ट असावे.

बल्लारपुरात चर्चासत्र : अक्षयकुमार काळे यांचे प्रतिपादनबल्लारपूर : आदिवासी साहित्यकारांनी वैश्विक साहित्य निर्मितीकडे झेप घेऊन आपल्या व्यक्तिगत अनुभवांना व्यापक रूप द्यावे. लेखन विज्ञाननिष्ट असावे. त्यात समाजाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. साहित्याचा प्रकार कोणताही असो. त्यात मानवीमूल्यांचा उद्घोष असावा, असे प्रतिपादन अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी येथे केले.स्थानिक भालेराव पब्लिक स्कूलच्या प्रांगणात साहित्य अकादमी आणि आदिवासी उलगुलान उत्कर्ष संस्था बल्लारपूर यांचे संयुक्त विद्यमान ‘आदिवासी साहित्याचे विविध आयाम’, या विषयावर शनिवारपासून दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन केल्यावर डॉ. काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. विनायक तुमराम होते. याप्रसंगी मंचावर आदिवासी उलगुलान उत्कर्ष संस्थेचे सल्लागार सुनील कुमरे व संस्थेचे अध्यक्ष संतोष आत्राम उपस्थित होते.साहित्य अकादमी विषयी माहिती देताना डॉ. काळे म्हणाले, अकादमीद्वारा विविध भारतीय ग्रंथांचे भारतीय भाषांमध्ये भाषांंतर करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. साहित्य जतन करणे व त्याला चालना देणे हे या संस्थेचे काम असून आजचे हे चर्चासत्र त्याचाच एक भाग आहे. नागर संस्कृतीच्या लेखकांनी आदिवासींबाबत त्यांच्या समस्यांबाबत लिहावे, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. विनायक तुमराम म्हणाले की, लेखनात बोलघेवडेपणा नसावा. त्यात धार हवी. साहित्य समाजाच्या दूर जाणारे नसावे. अ.भा. मराठी साहित्य संमेलनात आदिवासी लेखकांना निमंत्रित केले जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आदिवासी हे वनवासी नाहीत तर ते राज्यकर्ते आहेत. त्यांनी या भागात ८०० वर्षे राज्य केले आहे, हे विसरू नये, असे इतिहासाचा दाखला डॉ. तुमराम यांनी दिला.प्रास्ताविक व संचालन सुनील कुमरे व कृष्णा किम्बहुने तर आभार प्रदर्शन संतोष आत्राम यांनी केले. यावेळी डॉ. काळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर जागतिकीकरण आणि आदिवासींचा निसर्ग धर्म’, ‘आदिवासी साहित्य नवे संदर्भ व नवे आकलन’, या दोन विषयांवर परिसंवाद घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)