शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

स्त्रीची अनंत रुपे आहेत, ती जाणून घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

सिंधूताई यांनी सांगितले की मी केवळ चौथी पास आहे. असे असूनही आतापर्यंत मला ७५० पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपती पुरस्काराने चारदा सन्मानित करण्यात आले आहे. २२ देशात भ्रमण करून आले आहे. मात्र माझ्या संस्थेला अद्यापही अनुदान मिळाले नाही. तीन सरकार बदलले. अनेकदा कागदपत्रे सादर केली. पण त्याचा उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देसिंधूताई सपकाळ : लोकमतशी बातचित

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : बाई ,आई आहे. माई आहे. ताई आहे. तिची अनंत रूपे आहेत. हे आपण जाणून घेतले पाहिजे. या बाईला घडवायला विधात्याने ओव्हर टाईम घेतला असावा, असे मार्मिक विचार सुप्रसिद्ध समाज सेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.सोमवारी नागभीड येथे एका कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. तेव्हा लोकमतने त्यांच्याशी संवाद साधून विविध विषयावर बातचित केली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, बाईच्या खांद्यावरच देश उभा आहे. माय लेकरांसाठीच जगते. मात्र सध्या घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहेत. असे असले तरी प्रत्येक घटस्फोटाला पुरूषच जबाबदार असतात, अशातला भाग नाही.सिंधूताई यांनी सांगितले की मी केवळ चौथी पास आहे. असे असूनही आतापर्यंत मला ७५० पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपती पुरस्काराने चारदा सन्मानित करण्यात आले आहे. २२ देशात भ्रमण करून आले आहे. मात्र माझ्या संस्थेला अद्यापही अनुदान मिळाले नाही. तीन सरकार बदलले. अनेकदा कागदपत्रे सादर केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. सिंधूताईंनी सांगितले की आज मी चालवित असलेल्या गोरक्षण केंद्रात ३५० गायी आहेत. त्यासुद्धा भाकड आहेत. आज मी चार जिल्ह्यात संस्था चालवीत आहे. आजवर मी हजारो मुले घडविली आहेत. मला २८२ जावई आहेत. मी घडविलेल्या मुलांपैकी अनेकजण उच्च पदांवर कार्यरत आहेत. ४९ सुना आहेत. बदलत असलेल्या सामाजिक परिस्थितीवर मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की आता संस्कारच उरले नाहीत, असे वाटत आहे. पूर्वी संघर्ष होता. आता तो संघर्षच राहिला नाही. पालकही आपली जबाबदारी झटकत आहेत. सर्वच मोबाईलमध्ये हरवून गेले आहेत. प्रत्येक महिलेने अंगभर कपडे घालायलाच पाहिजे. बाई आई पाहिजे मादी नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल बोलताना सिंधूताईं म्हणाल्या, अगदी सुरूवातीच्या काळात राष्ट्रसंतांच्या भजनावरच मला भीक मिळत होती. म्हणूनच येथवर आले. एवढेच नाही तर मी स्मशानातील चितेवर जळत असलेले अन्न खाल्ले आहे, असेही त्या यावेळी लोकमतशी बोलताना म्हणाल्या.

टॅग्स :interviewमुलाखत