शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीची अनंत रुपे आहेत, ती जाणून घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

सिंधूताई यांनी सांगितले की मी केवळ चौथी पास आहे. असे असूनही आतापर्यंत मला ७५० पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपती पुरस्काराने चारदा सन्मानित करण्यात आले आहे. २२ देशात भ्रमण करून आले आहे. मात्र माझ्या संस्थेला अद्यापही अनुदान मिळाले नाही. तीन सरकार बदलले. अनेकदा कागदपत्रे सादर केली. पण त्याचा उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देसिंधूताई सपकाळ : लोकमतशी बातचित

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : बाई ,आई आहे. माई आहे. ताई आहे. तिची अनंत रूपे आहेत. हे आपण जाणून घेतले पाहिजे. या बाईला घडवायला विधात्याने ओव्हर टाईम घेतला असावा, असे मार्मिक विचार सुप्रसिद्ध समाज सेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.सोमवारी नागभीड येथे एका कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. तेव्हा लोकमतने त्यांच्याशी संवाद साधून विविध विषयावर बातचित केली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, बाईच्या खांद्यावरच देश उभा आहे. माय लेकरांसाठीच जगते. मात्र सध्या घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहेत. असे असले तरी प्रत्येक घटस्फोटाला पुरूषच जबाबदार असतात, अशातला भाग नाही.सिंधूताई यांनी सांगितले की मी केवळ चौथी पास आहे. असे असूनही आतापर्यंत मला ७५० पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपती पुरस्काराने चारदा सन्मानित करण्यात आले आहे. २२ देशात भ्रमण करून आले आहे. मात्र माझ्या संस्थेला अद्यापही अनुदान मिळाले नाही. तीन सरकार बदलले. अनेकदा कागदपत्रे सादर केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. सिंधूताईंनी सांगितले की आज मी चालवित असलेल्या गोरक्षण केंद्रात ३५० गायी आहेत. त्यासुद्धा भाकड आहेत. आज मी चार जिल्ह्यात संस्था चालवीत आहे. आजवर मी हजारो मुले घडविली आहेत. मला २८२ जावई आहेत. मी घडविलेल्या मुलांपैकी अनेकजण उच्च पदांवर कार्यरत आहेत. ४९ सुना आहेत. बदलत असलेल्या सामाजिक परिस्थितीवर मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की आता संस्कारच उरले नाहीत, असे वाटत आहे. पूर्वी संघर्ष होता. आता तो संघर्षच राहिला नाही. पालकही आपली जबाबदारी झटकत आहेत. सर्वच मोबाईलमध्ये हरवून गेले आहेत. प्रत्येक महिलेने अंगभर कपडे घालायलाच पाहिजे. बाई आई पाहिजे मादी नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल बोलताना सिंधूताईं म्हणाल्या, अगदी सुरूवातीच्या काळात राष्ट्रसंतांच्या भजनावरच मला भीक मिळत होती. म्हणूनच येथवर आले. एवढेच नाही तर मी स्मशानातील चितेवर जळत असलेले अन्न खाल्ले आहे, असेही त्या यावेळी लोकमतशी बोलताना म्हणाल्या.

टॅग्स :interviewमुलाखत