शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

स्त्रीची अनंत रुपे आहेत, ती जाणून घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

सिंधूताई यांनी सांगितले की मी केवळ चौथी पास आहे. असे असूनही आतापर्यंत मला ७५० पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपती पुरस्काराने चारदा सन्मानित करण्यात आले आहे. २२ देशात भ्रमण करून आले आहे. मात्र माझ्या संस्थेला अद्यापही अनुदान मिळाले नाही. तीन सरकार बदलले. अनेकदा कागदपत्रे सादर केली. पण त्याचा उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देसिंधूताई सपकाळ : लोकमतशी बातचित

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : बाई ,आई आहे. माई आहे. ताई आहे. तिची अनंत रूपे आहेत. हे आपण जाणून घेतले पाहिजे. या बाईला घडवायला विधात्याने ओव्हर टाईम घेतला असावा, असे मार्मिक विचार सुप्रसिद्ध समाज सेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.सोमवारी नागभीड येथे एका कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. तेव्हा लोकमतने त्यांच्याशी संवाद साधून विविध विषयावर बातचित केली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, बाईच्या खांद्यावरच देश उभा आहे. माय लेकरांसाठीच जगते. मात्र सध्या घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहेत. असे असले तरी प्रत्येक घटस्फोटाला पुरूषच जबाबदार असतात, अशातला भाग नाही.सिंधूताई यांनी सांगितले की मी केवळ चौथी पास आहे. असे असूनही आतापर्यंत मला ७५० पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपती पुरस्काराने चारदा सन्मानित करण्यात आले आहे. २२ देशात भ्रमण करून आले आहे. मात्र माझ्या संस्थेला अद्यापही अनुदान मिळाले नाही. तीन सरकार बदलले. अनेकदा कागदपत्रे सादर केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. सिंधूताईंनी सांगितले की आज मी चालवित असलेल्या गोरक्षण केंद्रात ३५० गायी आहेत. त्यासुद्धा भाकड आहेत. आज मी चार जिल्ह्यात संस्था चालवीत आहे. आजवर मी हजारो मुले घडविली आहेत. मला २८२ जावई आहेत. मी घडविलेल्या मुलांपैकी अनेकजण उच्च पदांवर कार्यरत आहेत. ४९ सुना आहेत. बदलत असलेल्या सामाजिक परिस्थितीवर मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की आता संस्कारच उरले नाहीत, असे वाटत आहे. पूर्वी संघर्ष होता. आता तो संघर्षच राहिला नाही. पालकही आपली जबाबदारी झटकत आहेत. सर्वच मोबाईलमध्ये हरवून गेले आहेत. प्रत्येक महिलेने अंगभर कपडे घालायलाच पाहिजे. बाई आई पाहिजे मादी नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल बोलताना सिंधूताईं म्हणाल्या, अगदी सुरूवातीच्या काळात राष्ट्रसंतांच्या भजनावरच मला भीक मिळत होती. म्हणूनच येथवर आले. एवढेच नाही तर मी स्मशानातील चितेवर जळत असलेले अन्न खाल्ले आहे, असेही त्या यावेळी लोकमतशी बोलताना म्हणाल्या.

टॅग्स :interviewमुलाखत