शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शंभरच्या नोटा उपलब्ध, एटीएमवर गर्दी करू नये

By admin | Updated: November 11, 2016 00:58 IST

काळा पैसा आणि बनावट चलणी नोटांवर प्रतिबंध घालण्यासाठी ५०० व १००० च्या नोटा बाद करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : पुरेशी रक्कम उपलब्ध राहणारचंद्रपूर : काळा पैसा आणि बनावट चलणी नोटांवर प्रतिबंध घालण्यासाठी ५०० व १००० च्या नोटा बाद करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून पुरेशा प्रमाणात शंभरच्या नोटा बँकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. बँकामध्ये जुन्या नोटा बदलून दिल्या जात असून एटीएमवरही उद्यापासून पैसे काढता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी एकाचवेळी बँक किंवा एटीएममध्ये गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे.नागरिकांना सध्या एका दिवशी चार हजाराच्या नोटा बदलून नवीन नोटा दिल्या जात आहे. शुक्रवारपासून एटीएमवरूनही पैसे काढता येणार आहे. बँका आणि एटीएमवरून व्यवहारासाठी पुरेशा प्रमाणात शंभरच्या नोटा उपलब्ध आहेत. त्यामुळे बँकामधून नोटा बदलण्यासोबतच एटीएमवरही पैसे उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी एकाचवेळी गर्दी केल्यास व्यवहारात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. एक-दोन दिवसात गर्दी कमी झाल्यानंतरही सहज पैसे उपलब्ध होवू शकतील. त्यामुळे आवश्यकता नसल्यास किंवा पुरेशे सुटे पैसे जवळ असल्यास नागरिकांनी बँक किंवा एटीएमवर जावू नये. ज्यांना आवश्यकता आहे, अशाच व्यक्तींनी पैसे काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पेट्रोल पंप आणि औषधी दुकानांमध्ये ११ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत जुन्या हजार व पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जात आहे. यामुळे या ठिकाणी वाढलेली गर्दी लक्षात घेता सुटे असल्यास सुटे पैसे द्यावे. दहा, वीस अशा रुपयांची औषधी खरेदी करायची असल्यास नेमके सुटे पैसे द्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)