शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कालवे आहेत; पाणी नाही

By admin | Updated: November 8, 2015 01:17 IST

शेतपिकाला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशातून गोसेखूर्द प्रकल्प, बाघोली बुटी उपसा सिंचन योजनेंतर्गत सावली तालुक्यात कालवे तयार करण्यात आले आहेत.

शेतकरी चिंताग्रस्त : सावली तालुक्यातील धानपीक करपलेचंद्रपूर : शेतपिकाला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशातून गोसेखूर्द प्रकल्प, बाघोली बुटी उपसा सिंचन योजनेंतर्गत सावली तालुक्यात कालवे तयार करण्यात आले आहेत. यावर्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावातून सोडण्यात आले. मात्र, पाण्याचा प्रवाह कमी दाबाचा असल्याने आणि वाघोली बुटी योजनेच्या नहारातून पाणी येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानपीक करपले आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.हंगामाच्या सुरुवातीला पावसाने उशिरा हजेरी लावली. तसेच अपुऱ्या पावसाने डोंगराव येथील तलावात पुरेसे पाणी झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील बोरमाळा, डोंगरगाव, चिखली, विहीरगाव, कसरगाव, गेवरा खुर्द, सायखेडा आदी गावातील अनेक शेतकरी पऱ्हे टाकू शकले नसल्याने जमीन पडीक आहे. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली. त्यांना धानपीक कसे वाचवायचे, असा प्रश्न उभा ठाकला होता. गोसेखुर्द धरणाचे पाणी आसोलामेंढा तलावात सोडून अनेक वर्षाची शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्ण करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होऊ लागला. मात्र पालेबारसा येथील कालव्याला भगदाड पडल्याने पाणी वाया गेले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. तसेच जनकापूर, सायखेडा ते बोरमाळा गावापर्यंत जाणारा गोसेखुर्द प्रकल्पाच्या नहराचे काम तीन वर्षांपासून पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी नहराचे काम पूर्ण करुन पाणी देण्याची मागणी केली.परंतु शेतकऱ्यांच्या मागणीकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने दरवर्षीच त्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. ज्या शेतकऱ्यांची शेती कालव्याला लागून आहे. त्या शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळत आहे. परंतु ज्यांना दोन-तीन शेतकऱ्यांचे शेत ओलांडून पाणी न्यावे लागते. कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले नाही. जांब (बु.) येथील खुशाल लोडे या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा नसल्याने त्यांना दरवर्षीच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळी तोंडावर आली. हातात पुरेसे पीक आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. पाण्याअभावी संपूर्ण धान पीक करपले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाने नुकसान झालेल्या शेतीचा तातडीने पंचनामा करुन आर्थिक मदत द्यावी, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. (शहर प्रतिनिधी)