शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

कालवे आहेत; पाणी नाही

By admin | Updated: November 8, 2015 01:17 IST

शेतपिकाला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशातून गोसेखूर्द प्रकल्प, बाघोली बुटी उपसा सिंचन योजनेंतर्गत सावली तालुक्यात कालवे तयार करण्यात आले आहेत.

शेतकरी चिंताग्रस्त : सावली तालुक्यातील धानपीक करपलेचंद्रपूर : शेतपिकाला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशातून गोसेखूर्द प्रकल्प, बाघोली बुटी उपसा सिंचन योजनेंतर्गत सावली तालुक्यात कालवे तयार करण्यात आले आहेत. यावर्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावातून सोडण्यात आले. मात्र, पाण्याचा प्रवाह कमी दाबाचा असल्याने आणि वाघोली बुटी योजनेच्या नहारातून पाणी येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानपीक करपले आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.हंगामाच्या सुरुवातीला पावसाने उशिरा हजेरी लावली. तसेच अपुऱ्या पावसाने डोंगराव येथील तलावात पुरेसे पाणी झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील बोरमाळा, डोंगरगाव, चिखली, विहीरगाव, कसरगाव, गेवरा खुर्द, सायखेडा आदी गावातील अनेक शेतकरी पऱ्हे टाकू शकले नसल्याने जमीन पडीक आहे. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली. त्यांना धानपीक कसे वाचवायचे, असा प्रश्न उभा ठाकला होता. गोसेखुर्द धरणाचे पाणी आसोलामेंढा तलावात सोडून अनेक वर्षाची शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्ण करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होऊ लागला. मात्र पालेबारसा येथील कालव्याला भगदाड पडल्याने पाणी वाया गेले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. तसेच जनकापूर, सायखेडा ते बोरमाळा गावापर्यंत जाणारा गोसेखुर्द प्रकल्पाच्या नहराचे काम तीन वर्षांपासून पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी नहराचे काम पूर्ण करुन पाणी देण्याची मागणी केली.परंतु शेतकऱ्यांच्या मागणीकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने दरवर्षीच त्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. ज्या शेतकऱ्यांची शेती कालव्याला लागून आहे. त्या शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळत आहे. परंतु ज्यांना दोन-तीन शेतकऱ्यांचे शेत ओलांडून पाणी न्यावे लागते. कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले नाही. जांब (बु.) येथील खुशाल लोडे या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा नसल्याने त्यांना दरवर्षीच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळी तोंडावर आली. हातात पुरेसे पीक आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. पाण्याअभावी संपूर्ण धान पीक करपले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाने नुकसान झालेल्या शेतीचा तातडीने पंचनामा करुन आर्थिक मदत द्यावी, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. (शहर प्रतिनिधी)