शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कालवे आहेत; पाणी नाही

By admin | Updated: November 8, 2015 01:17 IST

शेतपिकाला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशातून गोसेखूर्द प्रकल्प, बाघोली बुटी उपसा सिंचन योजनेंतर्गत सावली तालुक्यात कालवे तयार करण्यात आले आहेत.

शेतकरी चिंताग्रस्त : सावली तालुक्यातील धानपीक करपलेचंद्रपूर : शेतपिकाला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशातून गोसेखूर्द प्रकल्प, बाघोली बुटी उपसा सिंचन योजनेंतर्गत सावली तालुक्यात कालवे तयार करण्यात आले आहेत. यावर्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावातून सोडण्यात आले. मात्र, पाण्याचा प्रवाह कमी दाबाचा असल्याने आणि वाघोली बुटी योजनेच्या नहारातून पाणी येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानपीक करपले आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.हंगामाच्या सुरुवातीला पावसाने उशिरा हजेरी लावली. तसेच अपुऱ्या पावसाने डोंगराव येथील तलावात पुरेसे पाणी झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील बोरमाळा, डोंगरगाव, चिखली, विहीरगाव, कसरगाव, गेवरा खुर्द, सायखेडा आदी गावातील अनेक शेतकरी पऱ्हे टाकू शकले नसल्याने जमीन पडीक आहे. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली. त्यांना धानपीक कसे वाचवायचे, असा प्रश्न उभा ठाकला होता. गोसेखुर्द धरणाचे पाणी आसोलामेंढा तलावात सोडून अनेक वर्षाची शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्ण करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होऊ लागला. मात्र पालेबारसा येथील कालव्याला भगदाड पडल्याने पाणी वाया गेले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. तसेच जनकापूर, सायखेडा ते बोरमाळा गावापर्यंत जाणारा गोसेखुर्द प्रकल्पाच्या नहराचे काम तीन वर्षांपासून पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी नहराचे काम पूर्ण करुन पाणी देण्याची मागणी केली.परंतु शेतकऱ्यांच्या मागणीकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने दरवर्षीच त्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. ज्या शेतकऱ्यांची शेती कालव्याला लागून आहे. त्या शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळत आहे. परंतु ज्यांना दोन-तीन शेतकऱ्यांचे शेत ओलांडून पाणी न्यावे लागते. कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले नाही. जांब (बु.) येथील खुशाल लोडे या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा नसल्याने त्यांना दरवर्षीच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळी तोंडावर आली. हातात पुरेसे पीक आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. पाण्याअभावी संपूर्ण धान पीक करपले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाने नुकसान झालेल्या शेतीचा तातडीने पंचनामा करुन आर्थिक मदत द्यावी, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. (शहर प्रतिनिधी)