शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

पहाटेच्या अंधारात रेतीची चोरी

By admin | Updated: March 18, 2015 01:16 IST

सावली तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झालेला नसल्यामुळे तालुक्यातील रेती माफीया पहाटे तीन वाजतापासूनच रेती घाटांवर गर्दी करीत आहेत.

सावली: सावली तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झालेला नसल्यामुळे तालुक्यातील रेती माफीया पहाटे तीन वाजतापासूनच रेती घाटांवर गर्दी करीत आहेत. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.२०१२ नंतर अजुनही सावली तालुक्यातील बोरमाळा एक व दोन, साखरी, हरांबा, मोहाळ चक, सिर्सी या सहा घाटांचा लिलाव झाला नाही. महसूल प्रशासनाच्या निर्णयानुसार या सहाही घाटांच्या लिलावाची ठरविण्यात आलेले प्राथमिक किंमत लिलावधारकांच्या आवाक्याबाहेर असल्याने लिलावात बोली बोलण्यास कोणीही पुढे येत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे सदर घाटांचा लिलाव २०१२ नंतर आजपर्यंतही झाला नाही. याच संधीचा फायदा घेत रेतीमाफीयांनी पहाटेच्या प्रहरापासून रेती चोरण्याचा उपद्रव अविरतपणे करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून शासनाला कोट्यवधीचा चुना लागला आहे. एका वर्षासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल या सहाही घाटांमधून शासनाला मिळतो. बोली रक्कम जास्त असल्यामुळे कोणी लिलावात भाग घेत नाही, ही बाब लक्षात आल्याने शासनाने निर्धारित रकमेत २५ टक्क्यांनी कपात केली आहे. तरीही लिलावात उतरण्यासाठी कोणीही कंत्राटदार धजावले नसल्याची माहिती आहे.बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर सहा रेती घाट असून येथील रेती बांधकामाच्या दृष्टीने उच्च दर्जाची मानली जाते. मात्र मोठ्या प्रमाणात मागणी असुनही वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीची असल्यामुळे या घाटावरुन रेतीचा फारसा उपसा केला जात नाही असा समज आहे. त्यामुळे कंत्राटदारांच्या मते त्या घाटांची निर्धारीत रक्कम ही अधिकच असल्याचे सांगितले जाते. या तांत्रिक अडचणीचा फायदा रेती माफीया मोठ्या प्रमाणात घेत असतानाच कर्मचारीही आपले हितसंबंध जोपासत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी सावलीच्या तहसीलदार वंदना सौरंगते यांनी धडक मोहीम राबवून काही ट्रॅक्टर चालकांवर दंड ठोठावला. त्यातून तीन लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. मात्र महसूल प्रशासन रेती माफीयांवर जरब बसविण्यात हतबल झाले आहे.महसूल प्रशासनातील यंत्रणा तोकडी असल्यामुळे रेती माफीयांवर अंकुश ठेवणे कठीण आहे. प्रशासनात अनेक कामे असल्यामुळे दररोज पहाटे उठून रेती चोरट्यांचा ट्रॅक्टर पकडून त्यांना दंड ठोठावणे शक्य नाही. महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टर पकडण्याचा अधिकार आहे. परंतु अनेक कर्मचारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत. काही कर्मचारी वैयक्तिक हितसंबंध जोपासत आहेत. त्यामुळे मी एकटीच कुठे कुठे लक्ष देऊ आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊ अशी अगतिकता सावलीच्या तहसीलदार वंदना सौरंगपते यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)