शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

वीज संकटासाठी तत्कालीन भाजप सरकार जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 05:00 IST

महाविकास आघाडी सरकार वीज संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी विशेष मंत्रिमंडळाची बैठक झाली. ज्यामध्ये गुजरातमधील खासगी वीज उद्योगांकडून ६३० मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा वीज खरेदी करार जुना आहे. त्या वीज उद्योगाला दिलेला दर नाकारण्यात आला होता. त्यामुळे उद्योगांनी वीज निर्मिती कमी केली होती. आता ते दर वाढवले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेल्या प्रचंड वीज संकटाला कोल इंडियासह तत्कालीन भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येथे बुधवारी पत्रकार परिषदेत केला.सध्या महाराष्ट्रात विजेचे मोठे संकट असून, राज्यात भारनियमनाची समस्या भेडसावत आहे. कोल इंडियाकडून औष्णिक वीज केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे राज्यातील सर्व औष्णिक वीज केंद्रांना कोळशाच्या तुटवड्याची समस्या भेडसावत आहे. चंद्रपूर वगळता अन्य वीज केंद्रांमध्ये केवळ एक-दोन दिवस कोळसा संकलन शिल्लक असल्याने तेथील वीजनिर्मितीवर मोठा परिणाम होत आहे, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या काळात सर्व निर्बंध हटवल्यामुळे सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू आहेत, उन्हाळा सुरू झाल्याने राज्यात विजेची मागणी सातत्याने वाढत आहे, परिणामी हे संकट निर्माण झाले आहे, याकडेही मंत्री तनपुरे यांनी लक्ष वेधले. वीज ग्राहकांकडे महावितरणची कोट्यवधीची थकबाकी आहे, त्यापैकी शेतकऱ्यांची सर्वाधिक थकबाकी आहे. ही रक्कम तत्कालीन भाजप सरकारच्या कार्यकाळापासूनची आहे. त्यामुळे वीज कंपनीची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ लागली आहे. वीज कंपनीवर २० हजार कोटींचे खेळते भांडवल कर्जही तत्कालीन सरकारचेच योगदान असल्याचे ते म्हणाले. राज्यातील वीज संकटातून बाहेर काढण्यासाठी आता केंद्र सरकारने मध्यस्थी करण्याची गरज असून, पुरेसा आणि नियमित कोळसा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच कोल इंडियावर दबाव आणू शकते. महाविकास आघाडी सरकार वीज संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी विशेष मंत्रिमंडळाची बैठक झाली. ज्यामध्ये गुजरातमधील खासगी वीज उद्योगांकडून ६३० मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा वीज खरेदी करार जुना आहे. त्या वीज उद्योगाला दिलेला दर नाकारण्यात आला होता. त्यामुळे उद्योगांनी वीज निर्मिती कमी केली होती. आता ते दर वाढवले जात आहेत. राज्यात विजेची उपलब्धता आणि मागणी यात तफावत असतानाही तो अबाधित राहणार आहे, तो एक्स्चेंज अंतर्गत पुलाचे काम सुरू आहे, असेही तनपुरे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर अध्यक्ष राजीव कक्कड, नितीन भटारकर, डी.के. आरीकर, हिराचंद बोरकुटे उपस्थित होते.