शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

वीज संकटासाठी तत्कालीन भाजप सरकार जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 05:00 IST

महाविकास आघाडी सरकार वीज संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी विशेष मंत्रिमंडळाची बैठक झाली. ज्यामध्ये गुजरातमधील खासगी वीज उद्योगांकडून ६३० मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा वीज खरेदी करार जुना आहे. त्या वीज उद्योगाला दिलेला दर नाकारण्यात आला होता. त्यामुळे उद्योगांनी वीज निर्मिती कमी केली होती. आता ते दर वाढवले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेल्या प्रचंड वीज संकटाला कोल इंडियासह तत्कालीन भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येथे बुधवारी पत्रकार परिषदेत केला.सध्या महाराष्ट्रात विजेचे मोठे संकट असून, राज्यात भारनियमनाची समस्या भेडसावत आहे. कोल इंडियाकडून औष्णिक वीज केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे राज्यातील सर्व औष्णिक वीज केंद्रांना कोळशाच्या तुटवड्याची समस्या भेडसावत आहे. चंद्रपूर वगळता अन्य वीज केंद्रांमध्ये केवळ एक-दोन दिवस कोळसा संकलन शिल्लक असल्याने तेथील वीजनिर्मितीवर मोठा परिणाम होत आहे, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या काळात सर्व निर्बंध हटवल्यामुळे सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू आहेत, उन्हाळा सुरू झाल्याने राज्यात विजेची मागणी सातत्याने वाढत आहे, परिणामी हे संकट निर्माण झाले आहे, याकडेही मंत्री तनपुरे यांनी लक्ष वेधले. वीज ग्राहकांकडे महावितरणची कोट्यवधीची थकबाकी आहे, त्यापैकी शेतकऱ्यांची सर्वाधिक थकबाकी आहे. ही रक्कम तत्कालीन भाजप सरकारच्या कार्यकाळापासूनची आहे. त्यामुळे वीज कंपनीची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ लागली आहे. वीज कंपनीवर २० हजार कोटींचे खेळते भांडवल कर्जही तत्कालीन सरकारचेच योगदान असल्याचे ते म्हणाले. राज्यातील वीज संकटातून बाहेर काढण्यासाठी आता केंद्र सरकारने मध्यस्थी करण्याची गरज असून, पुरेसा आणि नियमित कोळसा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच कोल इंडियावर दबाव आणू शकते. महाविकास आघाडी सरकार वीज संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी विशेष मंत्रिमंडळाची बैठक झाली. ज्यामध्ये गुजरातमधील खासगी वीज उद्योगांकडून ६३० मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा वीज खरेदी करार जुना आहे. त्या वीज उद्योगाला दिलेला दर नाकारण्यात आला होता. त्यामुळे उद्योगांनी वीज निर्मिती कमी केली होती. आता ते दर वाढवले जात आहेत. राज्यात विजेची उपलब्धता आणि मागणी यात तफावत असतानाही तो अबाधित राहणार आहे, तो एक्स्चेंज अंतर्गत पुलाचे काम सुरू आहे, असेही तनपुरे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर अध्यक्ष राजीव कक्कड, नितीन भटारकर, डी.के. आरीकर, हिराचंद बोरकुटे उपस्थित होते.