शहरं
Join us  
Trending Stories
1
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
2
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
3
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
4
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
5
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
6
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
7
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
8
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
9
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
10
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
11
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप
12
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
13
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
14
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
15
कार्तिकी एकादशी २०२५: १ नोव्हेंबरला एकादशी तिथी प्रारंभ; पण उपास नेमका कधी? वाचा अचूक माहिती
16
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
17
₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं!
18
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
19
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
20
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा

घरातील कर्ताधर्ता माणूस गेला, मदत तरी वेळेवर मिळेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या वारसांना शासनातर्फे अर्थसाहाय्य म्हणून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यासाठी  वारसांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ८८३ वारसांनी अर्ज केले असून, यातील २ हजार ३३८ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. घरातील कर्ताधर्ता माणूस गेला मदत तरी वेळेवर मिळेल का?, अशी विचारणा मृतकांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या वारसांना शासनातर्फे अर्थसाहाय्य म्हणून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यासाठी  वारसांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ८८३ वारसांनी अर्ज केले असून, यातील २ हजार ३३८ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. घरातील कर्ताधर्ता माणूस गेला मदत तरी वेळेवर मिळेल का?, अशी विचारणा मृतकांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्राच्या मदत व पुनर्वसन विभागाला दिले होते. त्यानुसार केंद्र शासनाने राज्य शासनाला आदेशित करून आर्थिक मदत देण्यात आदेश दिले. दरम्यान, वारसांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 

 त्रुट्यांमुळे ३९५ अर्ज बाद      - कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या काही वारसदारांनी मदतीसाठी अर्ज केले. - जिल्ह्यातील ३९५ अर्ज विविध त्रुट्यांमुळे बाद झाले आहे. - या अर्जदारांनी पुन्हा प्रशासकीय कार्यालयात  मदतीसाठी पायपीट सुरु केली आहे.

यामुळे अडली वारसांना मदत कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या संबंधित वारसदारांनी अर्ज केले आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना मदत मिळाली नाही. यामध्ये वारसदारांमधील वाद, नेमका मृत्यू कोरोनाने झाला का,यासंदर्भात पुरावा नसणे आदी कारणामुळे मदत अडली आहे.

मदत कधी मिळणार?

मदतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला आहे. मात्र  अजूनही मदत मिळाली नाही. शासनाने याकडे लक्ष देऊन आर्थिक मदत त्वरित केल्यास कुटुंबांना आधार मिळेल. जिल्ह्यातील अनेकांचे प्रकरण मंजूर झाले आहे. मात्र खात्यात पैसे आले नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.  तर काहींनी मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती निवारण कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात चकरा मारल्या असून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

शहरातील अर्ज अधिक- जिल्ह्यातून मदतीसाठी प्राप्त अर्जापैकी शहरी भागातील तसेच मनपा क्षेत्रातील अर्ज सर्वाधिक आहे. तर काहींनी अर्ज बाद झाल्यानंतर दुसऱ्यांदा अर्ज सादर केले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgovernment schemeसरकारी योजना