शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

घरातील कर्ताधर्ता माणूस गेला, मदत तरी वेळेवर मिळेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या वारसांना शासनातर्फे अर्थसाहाय्य म्हणून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यासाठी  वारसांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ८८३ वारसांनी अर्ज केले असून, यातील २ हजार ३३८ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. घरातील कर्ताधर्ता माणूस गेला मदत तरी वेळेवर मिळेल का?, अशी विचारणा मृतकांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या वारसांना शासनातर्फे अर्थसाहाय्य म्हणून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यासाठी  वारसांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ८८३ वारसांनी अर्ज केले असून, यातील २ हजार ३३८ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. घरातील कर्ताधर्ता माणूस गेला मदत तरी वेळेवर मिळेल का?, अशी विचारणा मृतकांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्राच्या मदत व पुनर्वसन विभागाला दिले होते. त्यानुसार केंद्र शासनाने राज्य शासनाला आदेशित करून आर्थिक मदत देण्यात आदेश दिले. दरम्यान, वारसांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 

 त्रुट्यांमुळे ३९५ अर्ज बाद      - कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या काही वारसदारांनी मदतीसाठी अर्ज केले. - जिल्ह्यातील ३९५ अर्ज विविध त्रुट्यांमुळे बाद झाले आहे. - या अर्जदारांनी पुन्हा प्रशासकीय कार्यालयात  मदतीसाठी पायपीट सुरु केली आहे.

यामुळे अडली वारसांना मदत कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या संबंधित वारसदारांनी अर्ज केले आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना मदत मिळाली नाही. यामध्ये वारसदारांमधील वाद, नेमका मृत्यू कोरोनाने झाला का,यासंदर्भात पुरावा नसणे आदी कारणामुळे मदत अडली आहे.

मदत कधी मिळणार?

मदतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला आहे. मात्र  अजूनही मदत मिळाली नाही. शासनाने याकडे लक्ष देऊन आर्थिक मदत त्वरित केल्यास कुटुंबांना आधार मिळेल. जिल्ह्यातील अनेकांचे प्रकरण मंजूर झाले आहे. मात्र खात्यात पैसे आले नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.  तर काहींनी मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती निवारण कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात चकरा मारल्या असून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

शहरातील अर्ज अधिक- जिल्ह्यातून मदतीसाठी प्राप्त अर्जापैकी शहरी भागातील तसेच मनपा क्षेत्रातील अर्ज सर्वाधिक आहे. तर काहींनी अर्ज बाद झाल्यानंतर दुसऱ्यांदा अर्ज सादर केले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgovernment schemeसरकारी योजना