शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

घरातील कर्ताधर्ता माणूस गेला, मदत तरी वेळेवर मिळेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या वारसांना शासनातर्फे अर्थसाहाय्य म्हणून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यासाठी  वारसांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ८८३ वारसांनी अर्ज केले असून, यातील २ हजार ३३८ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. घरातील कर्ताधर्ता माणूस गेला मदत तरी वेळेवर मिळेल का?, अशी विचारणा मृतकांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या वारसांना शासनातर्फे अर्थसाहाय्य म्हणून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यासाठी  वारसांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ८८३ वारसांनी अर्ज केले असून, यातील २ हजार ३३८ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. घरातील कर्ताधर्ता माणूस गेला मदत तरी वेळेवर मिळेल का?, अशी विचारणा मृतकांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्राच्या मदत व पुनर्वसन विभागाला दिले होते. त्यानुसार केंद्र शासनाने राज्य शासनाला आदेशित करून आर्थिक मदत देण्यात आदेश दिले. दरम्यान, वारसांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 

 त्रुट्यांमुळे ३९५ अर्ज बाद      - कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या काही वारसदारांनी मदतीसाठी अर्ज केले. - जिल्ह्यातील ३९५ अर्ज विविध त्रुट्यांमुळे बाद झाले आहे. - या अर्जदारांनी पुन्हा प्रशासकीय कार्यालयात  मदतीसाठी पायपीट सुरु केली आहे.

यामुळे अडली वारसांना मदत कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या संबंधित वारसदारांनी अर्ज केले आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना मदत मिळाली नाही. यामध्ये वारसदारांमधील वाद, नेमका मृत्यू कोरोनाने झाला का,यासंदर्भात पुरावा नसणे आदी कारणामुळे मदत अडली आहे.

मदत कधी मिळणार?

मदतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला आहे. मात्र  अजूनही मदत मिळाली नाही. शासनाने याकडे लक्ष देऊन आर्थिक मदत त्वरित केल्यास कुटुंबांना आधार मिळेल. जिल्ह्यातील अनेकांचे प्रकरण मंजूर झाले आहे. मात्र खात्यात पैसे आले नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.  तर काहींनी मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती निवारण कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात चकरा मारल्या असून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

शहरातील अर्ज अधिक- जिल्ह्यातून मदतीसाठी प्राप्त अर्जापैकी शहरी भागातील तसेच मनपा क्षेत्रातील अर्ज सर्वाधिक आहे. तर काहींनी अर्ज बाद झाल्यानंतर दुसऱ्यांदा अर्ज सादर केले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgovernment schemeसरकारी योजना