शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अखेर त्या नरभक्षक वाघाला वन विभागाने केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2024 09:16 IST

चार इसमाचा बळी घेवून निर्माण केली होती दहशत, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह यांनी तात्काळ अधिनिस्त सर्व कर्मचारी यांना सोबत घेऊन वाघाला जेरबंद करण्याची मोहीम राबवत बल्लारशाह - करावा रोडचे वनात सेटअप लावण्यात लावला.

चंद्रपूर : बल्लारशाह वनपरिक्षेत्रात मागील काही महिन्यापासून धुमाकूळ घालत चार इसमाचा बळी घेवून दहशत निर्माण केलेल्या नरभक्षक वाघ टी- ८६-एम ला जेरबंद करण्यात बल्लारशाह वन विभागाला अखेर सोमवार दि. २९ एप्रिलला सायंकाळी  ६-३० जेरबंद करण्यात यश आले. मागील पाच वर्षात पहिल्यांदा एवढा मोठा वाघ परिसरात पकडण्याची ही पाहिलच घटना आहे. यामुळे बल्लारपूर शहर जंगलालगत परिसरातील नागरिकांनी आता  सुटकेचा निःश्वास सोडला.

बल्लारशाह वनपरिक्षेत्रात मागील काही महिन्यापासून बल्लारशाह-कारवा परिसरात  वाघाने चार इसमाचा बळी घेणाऱ्या घटने पासून वन विभाग डोळ्यात तेल ओतून मागोवा घेत होता व त्याला जेरबंद करण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू होती. वन कर्मचारी  हे दररोज वनात दिवस रात्र गस्त घालत होते. अखेर २९ एप्रिला नियतक्षेत्र बल्लाशाह मधील वनखंड क्र. ४९४ मधील ट्रॅप कॅमेरामध्ये सदर वाघ दिसून आला.

वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह यांनी तात्काळ अधिनिस्त सर्व कर्मचारी यांना सोबत घेऊन वाघाला जेरबंद करण्याची मोहीम राबवत बल्लारशाह - करावा रोडचे वनात सेटअप लावण्यात लावला. त्यानंतर वाघ हा टी-८६- एम असल्याची खात्री करण्यात आली. त्याला सायंकाळी ६-३० वाजताचे सुमारास पशु वैद्यकीय अधिकारी वन्य जीव उपचार केंद्र चंद्रपूर डॉ. कुंदन पोडचलवार यांचे मार्गदर्शनात शूटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला गणद्वारे डॉट मारले. त्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक व आदेशकुमार शेंडगे व वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांचे नेतृत्व सर्व वन कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने डॉट मारल्यानंतर वाघाची शोध मोहीम राबवली त्यामध्ये सदर वाघ बेशुद्ध आढळला. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करून त्यास पिंजऱ्यात बंद करून पुढील तपासणी करता वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे पाठविले. वाघ नर असून तो अंदाजे दहा वर्षाचा असल्याबाबत त्यांनी माहिती दिली.

या मोहिमेच्या यशस्वी आयोजनात उपवनसंरक्षक अधिकारी मध्य चांदा विभाग स्वेता बोडडू यांच्या मार्गदर्शनात सहा वनसंरक्षक अधिकारी मध्य चांदा वनविभाग आदेशकुमार शेंडगे व वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक बल्लारशाह के. एन. घुगलोत, ए. एस.पठाण (उमरी), व्ही.पी. रामटेके (करावा), वनसंरक्षक एस. एम. बोकडे, आर.एस. दुर्योधन, डी.बी. मेश्राम, टी.ओ. कमले, ए. बी. चौधरी, पी.एच.आनकाडे, एस. आर. देशमुख, बी.एम.वनकर, अतीशिग्र दल चंद्रपूर कर्मचारी  पीआरटी पथक इटोली, उमरी पोतदार, उमरी तुकुम सातारा कोमटी, सातारा भोसले आणि रोजंदारी वनमजूर यांनी परीश्रम घेवून मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. यामुळे वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश प्राप्त झाले. बायोलॉजिस्ट नुरअली सय्यद, रोजंदारी संरक्षण मजूर यांनी दररोज ट्रॅप कॅमेरे चेक करणे व टी- ८६-एम नर वाघाला मागोवा घेण्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आणि बल्लारशाह - कारवा जंगल परिसरात हिंस्र वन्य प्राण्यांचा वावर असल्याने नागरिकांनी वनात प्रवेश करू नये, असे आवाहन केले.

टॅग्स :Tigerवाघ