शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

विहीरगावच्या वादग्रस्त जमिनीचा ठाणेदारांनी लावला निवाडा

By admin | Updated: December 8, 2015 00:51 IST

विरुर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या विहिरगाव येथील बौद्ध समाजाच्या ताब्यात असलेल्या वादग्रस्त ...

बौद्ध समाज बांधवात आनंद : ३० वर्षांपासून सुरू होता वादविरुर (स्टे.): विरुर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या विहिरगाव येथील बौद्ध समाजाच्या ताब्यात असलेल्या वादग्रस्त जमिनीचा वाद ठाणेदारांच्या मध्यस्थीने मिटला आहे. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विरुरचे ठाणेदार यांनी सदर जमिनीचा निवाडा लावल्याने बौद्ध समाज बांधवामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ठाणेदाराचे कौतुक होत आहे. विरुर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या विहीरगाव येथील ३० वर्षापूर्वी अजय डंभारे यांच्या आईने बसस्थानकाला लागून असलेली साडे तीन गुंटे जमीन बौद्ध समाज मंडळांला विक्री केली. तेव्हा पासून या जागेवर बौद्ध बांधव धार्मिक कार्यक्रम पार पाडत होते. त्यावेळेस बौद्ध समाज बांधवांनी रितसर विक्रीपत्र करुन घेतले नाही. मात्र ठरविल्याप्रमाणे जागेची अर्धी रक्कम घेऊन इसार पत्र केले. मात्र पूर्ण पैसे देऊन विक्रीपत्र करुन आपल्या नावावर जमीन करुन न घेतल्यामुळे चार वर्षा अगोदर अजय डंभारे यांनी सदर जागा ही माझ्या मालकीची असल्याचा दावा केला. त्यामुळे जमिनीचा वाद वाढत गेला. सदर प्रकरण विरुर पोलीस ठाण्यात गेले तसेच न्यायप्रविष्ट होते. सदर जागेचे कोणतेही कागदपत्र बौद्ध समाज मंडळाकडे नसल्याने न्यायालयाने सदर जागा अजय डंभारेच्या मालकीची असल्याचे सांगितले. मात्र बौद्ध बांधवांना धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी दुसरी कोणतीही जागा उपलब्ध नसल्याने धार्मिक कार्यक्रम कुठे घ्यायचे, या विवंचनेत होते. तेव्हा विरुर ठाणेदारांनी डंभारे कुटुंबीय आणि बौद्ध बांधवांना जमिनीबाबत चर्चा करण्याचे ठरविले. त्यात परिसरातील विविध गावातील नागरिकांना बोलाविण्यात आले. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून चर्चा करण्यात आली. चर्चासत्रात उपस्थितांनी आपआपली मते मांडली. तेव्हा चर्चेअंती ठाणेदारांनी एकूण जमिनीपैकी अर्धी जमीन समाजाला दान करा, अशी विनंती केली. तेव्हा डंभारे यांनी त्या जमिनी पैकी दीड गुंटा जमीन समाजाला देण्याचे मान्य केले. अखेर ३० वर्षांपासून असलेल्या वादग्रस्त जमिनीचा ठाणेदारांनी निवाडा लावला. यावेळी जि.प. सदस्य अविनाश जाधव, ठाणेदार श्याम गव्हाणे, सरपंच प्रतिभा करमनकर, उपसरपंच शेख इरशाद, तंटामुक्त समिती अध्यक्ष नीलकंठ खेळेकर, चरणदास नगराळे, अविनाश रामटेके, सचिन पिपरे, बंडू रामटेके, लटारु नारनवरे, पुरुषोत्तम चहारे, गणपत पुणेकर, परशुराम वाघमारे तसेच गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)