शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

देश महासत्ता होण्यासाठी सर्व भेद संपुष्टात आणा

By admin | Updated: January 23, 2016 01:20 IST

देश महासत्ता होण्यासाठी समाजाने स्त्रियांबाबतचा दृष्टीकोन बदलून व मानवनिर्मित सर्व भेद संपुष्टात आणून एकरस,

शिवराय कुळकर्णी : युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद व्याख्यानमालाभद्रावती: देश महासत्ता होण्यासाठी समाजाने स्त्रियांबाबतचा दृष्टीकोन बदलून व मानवनिर्मित सर्व भेद संपुष्टात आणून एकरस, एकसंघ समाजाची निर्मिती करण्याची आज गरज असल्याचे मत भाजपा प्रदेश प्रवक्ते तसेच व्याख्यानकर्ते शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केले.लोकसेवा मंडळ, भद्रावतीचे संस्थापक अध्यक्ष स्व. निळकंठराव उपाख्य बाबुराव पाटील गुंडावार यांच्या जयंती समारोहानिमित्त स्थानिक लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद’ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिवराय कुळकर्णी यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. व्याख्यानमालेचे हे १० वे वर्षे आहे.याप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार नागो गाणार होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शरदचंद्र सालफळे, लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव मनोहर पारधे, शाळा समिती अध्यक्ष विकास उपगन्लावार, प्राचार्य विनोद पांढरे उपस्थित होते.पुढे बोलताना शिवराय कुळकर्णी म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी आपल्या आयुष्यात भारताच्या अवनतीची काही प्रमुख कारणे सांगितली. त्यातील दोन प्रमुख कारणांचा संदर्भ आजही लागू पडतो. महिलांची स्थिती अधिकाअधिक सुधारुन त्या सक्षम होणे हे सुदृढ समाज निर्मितीसाठी आवश्यक आहे. भेदभावयुक्त समाज हे आजच्या अधोगतीचे मुख्य कारण आहे. यावर आजही विचार केला तर आम्ही मानसिकतेच्या पातळीवर बदलले आहोत का, असा प्रश्न याप्रसंगी शिवराय कुळकर्णी यांनी उपस्थित केला.शनिदेवाच्या चौथऱ्यावर एखादी महिला चढते व समाज आकांततांडव करायला लागते, या घटनेवरुन आमचा आजही महिलांकडे बघण्याचा दृष्टीकान काय आहे, हे स्पष्ट होते. स्वामी विवेकानंदानी समरस समाज निर्मितीसाठी भरीव प्रयत्न केले. रुढी, परंपरा, कुप्रथा मोडीस आणून भारताच्या संस्कृतीच्या आधारे जगात ममता व बंधूभाव स्थापित केला जावू शकतो, हा त्यांचा दृढ विश्वास होता. किंबहुना त्यांनी शिकागोच्या धर्मपरिषदेनंतर ते सिद्धच करुन दाखविले. आजही भोगवादाच्या आहारी गेलेले देश विस्फोटकावर आरुढ झाले आहेत. त्यावर केवळ भारतीय संस्कृतीचा आध्यात्मिक विचार हाच एकमेव उपाय असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणूनच संपूर्ण जगाच्या आशा भारताकडे केंद्रीत झाल्या आहेत, असे ते म्हणाले. धर्मातील शास्वत काय व परिवर्तनीय काय, याचा धर्ममार्तडांनी व समाज धुरीणांनी एकत्रीत येवून विचार केला पाहिजे व कालसंगत बदलही घडवून आणले पाहिजे. समाजाच्या उत्कर्षासाठी हे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. आज समाजाला अशा प्रकारच्या व्याख्यानमालेची गरज आहे. त्यातून बोध घ्यावा. भारतीय संस्कृतीची ओळख विसरत चालल्याची खंत कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. नागो गाणार यांनी व्यक्त केली. विवेकानंदाचे विचार प्रेरणादायी ठरु शकतात. म्हणून ते सर्वांनी आत्मसात करावे, असे ते म्हणाले, कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुरेश परसावार, प्रास्ताविक प्राचार्य विनोद पांढरे तर आभार अविनाश पाम्पट्टीवार यांनी मानले. व्याख्यानमालेच्या सुरुवातीला शारदास्तवन, स्वागत गित तसेच स्व. निळकंठराव गुंडावार यांच्या जीवन कार्यावर आधारित गौरवगीत झाले. ९ वीची विद्यार्थिनी मोनाली बतकी हिने स्व. निळकंठराव गुंडावार यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बबनराव गुंडावार, विठ्ठल पारधे, मधुकर नारळे, विठ्ठल पारधे, मधुकर नारळे, विश्वनाथ पत्तीवार, उपप्राचार्य रेखा पवितवार, पर्यवेक्षक गोपाल ठेंगणे, पर्यवेक्षक चंद्रकांत देशपांडे तसेच मोठ्या प्रमाणात श्रोता वर्ग उपस्थित होता. (तालुका प्रतिनिधी)