शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दहावी पास सर्वांनाच मिळणार अकरावीत प्रवेश;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:29 IST

पालकांमध्ये अस्वस्थता : शाखा निहाय प्रवेशाचा समतोल बिघडणार चंद्रपूर : यंदा कोरोनामुळे शाळा व परीक्षाही झाल्या नाही. अंतर्गत ...

पालकांमध्ये अस्वस्थता : शाखा निहाय प्रवेशाचा समतोल बिघडणार

चंद्रपूर : यंदा कोरोनामुळे शाळा व परीक्षाही झाल्या नाही. अंतर्गत मूल्यांकनानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. अकरावीच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने सीईटी लागू केली. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून अर्ज सादर करावा लागणार असला तरी तांत्रिक कारणाने अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, सीईटीसाठी विद्यार्थ्यांची तयारी झाली का, त्यांना शाखा निहाय प्रवेश मिळणार काय याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये शंका आहे.

कोरोनामुळे दहावी परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे, याचा तिढा निर्माण झाला होता. राज्य शिक्षण मंडळाने नववीच्या गुणांकावर दहावी परीक्षेचा निकाल लावण्यात आला. निकाल लागल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी लागू केली. त्यासाठी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. ही परीक्षा घ्यायची असेल, तर विद्यार्थ्यांसाठी हा प्रकार नवीनच असणार आहे. यामुळे त्यांना किमान दीड महिन्यांचा अवधी, प्रश्नसंच, सराव परीक्षा आदी होणेही आवश्यक आहे. या सर्वांत वेळ खर्च होणार आहे.

प्रवेश प्रक्रिया २ ऑगस्टपर्यंत

राज्य परीक्षा मंडळाच्या ऐच्छिक सीईटी प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सोमवारी दुपारी ३ वाजतापासून संकेतस्थळावरून ऑनलाईन भरता येणार आहे. ही प्रक्रिया २ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. मंडळाच्या संकेतस्थळावरूनही सीईटी पोर्टल अ‍ॅक्सेस करता येतील, अशी माहिती देण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे हे संकेतस्थळ दुपारी ४ वाजता बंद झाले.

कशी असेल प्रवेश प्रक्रिया ?

राज्यातील अकरावीच्या सीईटीसाठीची नोंदणी ऑनलाइन करावी लागेल. १९ जुलैपासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. तसेच त्यांना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढेच संकेतस्थळावर जाऊन स्पष्ट करायचे आहे. तर अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे तपशील, गुण भरावे लागतील आणि १७० रुपये परीक्षा शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.

सीईटीची तयारी कशी कराल?

या प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. १०० गुणांच्या या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी दोन तासांचा वेळ दिला जाईल. या परीक्षेतल्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

-प्रा. विवेक झोडे, करिअर मार्गदर्शक, चंद्रपूर

सीईटी न देणाऱ्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांवर

जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत, त्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारावर केले जाईल.

प्रवेशाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाल्याने कला, वाणिज्य, विज्ञान, द्विलक्ष्यी अभ्यासक्रम या शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागा, त्या जागांसाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी यामुळे शाखानिहाय प्रवेशाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. हवे ते महाविद्यालय, हव्या त्या शाखेला प्रवेश मिळेल की नाही, याबाबत शंका आहे.