शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

कर्जवसुली स्थगितीचा लाभ १० तालुक्यांना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:07 IST

खरीप हंगामात दुष्काळाचा फटका बसलेले शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले होते. दरम्यान, सरकारने शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले त्याचेही पुनर्गठनही होणार आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : पीक कर्जाचेही होणार पुनर्गठन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामात दुष्काळाचा फटका बसलेले शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले होते. दरम्यान, सरकारने शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले त्याचेही पुनर्गठनही होणार आहे.खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील दहा तालुक्यांना सर्वात मोठा फटका बसला होता. पिकांचे उत्पादन न झाल्याने कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला. दुष्काळी परिस्थितीमुळे शेकडो शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकेकडून खरीप हंगामाकरिता कर्ज घेतले होते. बँकेच्या अधिकाऱ्यांनी वसुलीचा तगादा लावल्याने याचा अनिष्ट परिणाम रब्बी हंगामावरही होण्याचा धोका निर्माण झाला होता. दरम्यान, २३ आॅक्टोबर २०१८ ला राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दहा तालुके दुष्काळग्रस्त निकषात पात्र ठरले. परंतु, कर्जाचे पुनर्गठन होणार की नाही, हा प्रश्न भेडसावत होता. राज्य शासनाने शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.लाभार्थी तालुकेपीककर्ज वसुलीच्या स्थगितीचा लाभ दहा तालुक्यांना मिळणार आहे. यामध्ये भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, नागभीड, पोंभुर्णा, राजुरा, सिंदेवाही, वरोरा तालुक्यांचा समावेश आहे. राष्ट्रीयकृत, व्यापारी व सहकारी बँकांनी तत्काळ कार्यवाही केल्यास रब्बी हंगामातील अडचण दूर होऊ शकते.३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत वसुलीला स्थगितीपीककर्जाच्या व्याजासह पुनर्गठन करण्यासोबतच खरीप २०१८ हंगामातील कृषी कर्जाच्या वसुलीला ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्थगिती देण्यात आली. याशिवाय अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात (कालावधी ५ वर्षे) पुनर्गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील दहा तालुक्यांच्या बाधित गावांतील शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची संमती घेऊन कर्जाचे व्याजासह पुनर्गठन केल्या जाणार आहे.