शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षानंतर उघडली देवालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गामुळे सरकारने प्रतिबंध लागू केल्याने जिल्ह्यातील सर्व मंदिरे दीड वर्षापासून बंद होती. कोरोना संसर्ग आता ओसरण्याच्या मार्गावर आला. रुग्णांची संख्या दररोज चार किंवा पाचच्या पुढे जात नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हेच चित्र असल्याने राज्य सरकारने गुरुवारपासून  प्रतिबंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दीड वर्षापासून बंद असलेली जिल्ह्यातील मंदिरे आजपासून उघडल्याने नवरात्रोत्सव जणू चैतन्य घेऊन आला आहे. चंद्रपूरची आराध्य देवती माता महाकाली मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्थापनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. सार्वजनिक दुर्गा उत्सव व शारदा मंडळांनी सायंकाळी पूजाविधी, अभिषेक करून घटस्थापना केली. कोविड नियमांचे पालन करून आजपासून मातेचा जागर सुरू झाला आहे.कोरोना संसर्गामुळे सरकारने प्रतिबंध लागू केल्याने जिल्ह्यातील सर्व मंदिरे दीड वर्षापासून बंद होती. कोरोना संसर्ग आता ओसरण्याच्या मार्गावर आला. रुग्णांची संख्या दररोज चार किंवा पाचच्या पुढे जात नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हेच चित्र असल्याने राज्य सरकारने गुरुवारपासून  प्रतिबंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. गुरुवारी मंदिरे उघडण्याची परवानगी दिल्याने चंद्रपुरातील माता महाकाली, तसेच जिल्ह्यातील सर्वच मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. विशेष म्हणजे, आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. 

 गर्दी करण्यास प्रतिबंध- नवरात्र हा उत्सव देवी दुर्गेला समर्पित असा उत्सव आहे. संस्कृतमध्ये नवरात्री या शब्दाचा अर्थ ‘नऊ रात्री’ असा आहे. मंदिरे उघडण्याचा व नवरात्रोत्सवाचा दिवस एकच असल्याने देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ शकते, असा अंदाज होता. मंदिर व्यवस्थापनांकडून सूचना देण्याचे काम सुरू होते. मात्र, गुरुवारी पहिल्या दिवशी फारशी गर्दी दिसून आली नाही. सार्वजनिक देवी मंडपात गर्दी टाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.

दोन हजार पोलीस तैनात- कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने कुठेही कोविड नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने दोन हजार जवान तैनात केले आहेत. शिवाय जिल्हाभरात गृहरक्षण दलाच्या जवानांचीही नियुक्ती करण्यात     आली आहे .

लस घेतली असेल तरच मंदिरात प्रवेशकोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मनमार्फत महाकाली मंदिर परिसरात लसीकरण होणार आहे. मंदिरात प्रवेश करताना भक्तांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे. ज्या भाविकांनी लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी महाकाली मंदिर परिसरात लसीकरण होणार आहे. सकाळी सात ते सायकांळपर्यंत लसीकरण मोहीम सुरु राहणार आहे. मंदिर व्यवस्थापन समितीने भाविकांना टोकन देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Mahakali Mandirमहाकाली मंदिर