शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

एक दिवसात तापमान ४.६ अंशाने घसरले

By admin | Updated: June 6, 2016 01:54 IST

मागील आठ दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वाढत्या तापमानाने होरपळून निघत होते. अशातच शनिवारी

चंद्रपूर : मागील आठ दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वाढत्या तापमानाने होरपळून निघत होते. अशातच शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळला. सुमारे पाऊण-एक तास पावसाने झोडपून काढले. विजेमुळे जिल्ह्यात कुठेही जिवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र शेकडो झाले उन्मळून पडली. अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला. विशेष म्हणजे, शनिवारी ४३.६ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली होती. रविवारी ३९ अंश सेल्सियस तापमान होते. म्हणजे एक दिवसात तब्बल ४.६ अंशाने तापमान घसरले.मागील आठ ते दहा दिवसांपासून चंद्रपूरकर वाढत्या उष्णतामाने त्रस्त आहेत. सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. ४६.८ अंशापार तापमानाची नोंदही याच दिवसात झाली आहे. आजपर्यंत उष्माघाताने जिल्ह्यातील सहा जणांचा बळी गेला आहे. सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाची काहिली जाणवत असल्याने दुपारी तर नागरिकांनी घराबाहेर पडणेच बंद केले होते. आणखी किती दिवस सूर्याचा कोप अंगावर झेलावा लागणार, याची चिंता चंद्रपूरकर करू लागले होते. काल शनिवारीदेखील दिवसभरच कडाक्याचे उन्ह पडले. ४३.६ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली. रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात फरक पडला. विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळ सुरू झाले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, कोरपना, बल्लारपूर, राजुरा, जिवती, भद्रावती आदी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी वादळाचा जोरही मोठा असल्याने ग्रामीण भागातील अनेक घरांचे छप्पर उडाले. चंद्रपुरातील कस्तुरबा मार्गावरील, त्यानंतर रामनगर मार्गावरील व रामनगर ते दाताळा मार्गावरील अनेक झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यातील विविध भागातील शेकडो झाडेही उन्मळून पडल्याची माहिती आहे. चंद्रपुरात पावसाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच वीज पुरवठा खंडित झाला. जवळपास अर्धा तास वीज पुरवठा खंडित राहिला. अर्धा-पाऊण तास पावसाचा जोर कायम होता. हा पाऊस सर्वत्र झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. एरवी सकाळीच अंगाची लाहीलाही करणारी उन्ह आज रविवारी जाणवत नव्हती. शनिवारी झालेल्या पावसामुळे रविवारी तापमानातही घट झाली. (शहर प्रतिनिधी)नागभीड : शनिवारी रात्री अचानक आलेल्या वादळाचा तालुक्यातील पारडी (ठवरे) या गावाला चांगलाच फटका बसला. या वादळाने सात-आठ घरांचे छप्पर तर उडालेच पण एक झाड उन्मळून पडल्याने एक म्हैसही ठार झाली. शंकर गणपत ठाकरे, रमेश नत्थू ठाकरे, रामचंद्र दुधनकर, ईश्वर रामचंद्र ठवरे, होमराज दोनोडे, पुंडलिक दुधनकर यांच्या घरावरील टीन आणि कवेलू वादळाने पार उडून गेली. तर लवाजी तुकाराम ठवरे यांनी घरासमोरील चिचेच्या झाडाला बांधून ठेवलेली एक म्हैस अंगावर झाड पडल्याने जागीच ठार झाली.पिडीतांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उपसभापती मंदा मेंदाम यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)