शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवसात तापमान ४.६ अंशाने घसरले

By admin | Updated: June 6, 2016 01:54 IST

मागील आठ दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वाढत्या तापमानाने होरपळून निघत होते. अशातच शनिवारी

चंद्रपूर : मागील आठ दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वाढत्या तापमानाने होरपळून निघत होते. अशातच शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळला. सुमारे पाऊण-एक तास पावसाने झोडपून काढले. विजेमुळे जिल्ह्यात कुठेही जिवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र शेकडो झाले उन्मळून पडली. अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला. विशेष म्हणजे, शनिवारी ४३.६ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली होती. रविवारी ३९ अंश सेल्सियस तापमान होते. म्हणजे एक दिवसात तब्बल ४.६ अंशाने तापमान घसरले.मागील आठ ते दहा दिवसांपासून चंद्रपूरकर वाढत्या उष्णतामाने त्रस्त आहेत. सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. ४६.८ अंशापार तापमानाची नोंदही याच दिवसात झाली आहे. आजपर्यंत उष्माघाताने जिल्ह्यातील सहा जणांचा बळी गेला आहे. सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाची काहिली जाणवत असल्याने दुपारी तर नागरिकांनी घराबाहेर पडणेच बंद केले होते. आणखी किती दिवस सूर्याचा कोप अंगावर झेलावा लागणार, याची चिंता चंद्रपूरकर करू लागले होते. काल शनिवारीदेखील दिवसभरच कडाक्याचे उन्ह पडले. ४३.६ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली. रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात फरक पडला. विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळ सुरू झाले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, कोरपना, बल्लारपूर, राजुरा, जिवती, भद्रावती आदी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी वादळाचा जोरही मोठा असल्याने ग्रामीण भागातील अनेक घरांचे छप्पर उडाले. चंद्रपुरातील कस्तुरबा मार्गावरील, त्यानंतर रामनगर मार्गावरील व रामनगर ते दाताळा मार्गावरील अनेक झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यातील विविध भागातील शेकडो झाडेही उन्मळून पडल्याची माहिती आहे. चंद्रपुरात पावसाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच वीज पुरवठा खंडित झाला. जवळपास अर्धा तास वीज पुरवठा खंडित राहिला. अर्धा-पाऊण तास पावसाचा जोर कायम होता. हा पाऊस सर्वत्र झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. एरवी सकाळीच अंगाची लाहीलाही करणारी उन्ह आज रविवारी जाणवत नव्हती. शनिवारी झालेल्या पावसामुळे रविवारी तापमानातही घट झाली. (शहर प्रतिनिधी)नागभीड : शनिवारी रात्री अचानक आलेल्या वादळाचा तालुक्यातील पारडी (ठवरे) या गावाला चांगलाच फटका बसला. या वादळाने सात-आठ घरांचे छप्पर तर उडालेच पण एक झाड उन्मळून पडल्याने एक म्हैसही ठार झाली. शंकर गणपत ठाकरे, रमेश नत्थू ठाकरे, रामचंद्र दुधनकर, ईश्वर रामचंद्र ठवरे, होमराज दोनोडे, पुंडलिक दुधनकर यांच्या घरावरील टीन आणि कवेलू वादळाने पार उडून गेली. तर लवाजी तुकाराम ठवरे यांनी घरासमोरील चिचेच्या झाडाला बांधून ठेवलेली एक म्हैस अंगावर झाड पडल्याने जागीच ठार झाली.पिडीतांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उपसभापती मंदा मेंदाम यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)