शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

एक दिवसात तापमान ४.६ अंशाने घसरले

By admin | Updated: June 6, 2016 01:54 IST

मागील आठ दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वाढत्या तापमानाने होरपळून निघत होते. अशातच शनिवारी

चंद्रपूर : मागील आठ दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वाढत्या तापमानाने होरपळून निघत होते. अशातच शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळला. सुमारे पाऊण-एक तास पावसाने झोडपून काढले. विजेमुळे जिल्ह्यात कुठेही जिवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र शेकडो झाले उन्मळून पडली. अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला. विशेष म्हणजे, शनिवारी ४३.६ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली होती. रविवारी ३९ अंश सेल्सियस तापमान होते. म्हणजे एक दिवसात तब्बल ४.६ अंशाने तापमान घसरले.मागील आठ ते दहा दिवसांपासून चंद्रपूरकर वाढत्या उष्णतामाने त्रस्त आहेत. सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. ४६.८ अंशापार तापमानाची नोंदही याच दिवसात झाली आहे. आजपर्यंत उष्माघाताने जिल्ह्यातील सहा जणांचा बळी गेला आहे. सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाची काहिली जाणवत असल्याने दुपारी तर नागरिकांनी घराबाहेर पडणेच बंद केले होते. आणखी किती दिवस सूर्याचा कोप अंगावर झेलावा लागणार, याची चिंता चंद्रपूरकर करू लागले होते. काल शनिवारीदेखील दिवसभरच कडाक्याचे उन्ह पडले. ४३.६ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली. रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात फरक पडला. विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळ सुरू झाले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, कोरपना, बल्लारपूर, राजुरा, जिवती, भद्रावती आदी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी वादळाचा जोरही मोठा असल्याने ग्रामीण भागातील अनेक घरांचे छप्पर उडाले. चंद्रपुरातील कस्तुरबा मार्गावरील, त्यानंतर रामनगर मार्गावरील व रामनगर ते दाताळा मार्गावरील अनेक झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यातील विविध भागातील शेकडो झाडेही उन्मळून पडल्याची माहिती आहे. चंद्रपुरात पावसाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच वीज पुरवठा खंडित झाला. जवळपास अर्धा तास वीज पुरवठा खंडित राहिला. अर्धा-पाऊण तास पावसाचा जोर कायम होता. हा पाऊस सर्वत्र झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. एरवी सकाळीच अंगाची लाहीलाही करणारी उन्ह आज रविवारी जाणवत नव्हती. शनिवारी झालेल्या पावसामुळे रविवारी तापमानातही घट झाली. (शहर प्रतिनिधी)नागभीड : शनिवारी रात्री अचानक आलेल्या वादळाचा तालुक्यातील पारडी (ठवरे) या गावाला चांगलाच फटका बसला. या वादळाने सात-आठ घरांचे छप्पर तर उडालेच पण एक झाड उन्मळून पडल्याने एक म्हैसही ठार झाली. शंकर गणपत ठाकरे, रमेश नत्थू ठाकरे, रामचंद्र दुधनकर, ईश्वर रामचंद्र ठवरे, होमराज दोनोडे, पुंडलिक दुधनकर यांच्या घरावरील टीन आणि कवेलू वादळाने पार उडून गेली. तर लवाजी तुकाराम ठवरे यांनी घरासमोरील चिचेच्या झाडाला बांधून ठेवलेली एक म्हैस अंगावर झाड पडल्याने जागीच ठार झाली.पिडीतांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उपसभापती मंदा मेंदाम यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)