शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

सांगा आता जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

केंद्र शासनाने वर्षभरापूर्वी किसान सन्मान योजना जाहीर केली. तीन टप्प्यात दोन-दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये अनुदान मिळणार होते. मात्र त्यातीलही एक दमडीही अद्याप मिळालेली नाही. म्हणायला केवळ यादी तयार करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांचा शासकीय कामावर कायमचा विश्वासच उडाला आहे. यावर्षीच्या सततच्या पावसामुळे पीक परिस्थिती नाजूक असताना परतीच्या पावसाने उभे पीक आडवे केले.

ठळक मुद्देसाहेब, आम्हा कडेबी लक्ष द्या न जी!

जयंत जेनेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यात निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी पूर्णत: हादरला असून पेरणी केलेला खर्चही निघणे कठीण झाला आहे. या सर्वामध्ये पुढील वर्षभर काय खायचे, कसे जगायचे असे अनेक प्रश्न शेतकरी कुटुंबासमोर उभे ठाकले आहे.शासनाने शेताचे सर्व्हेक्षण सुरु केले आहे. बांधावर येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना साहेब, आम्हा कडेबी लक्ष द्या न जी, अशी आर्त हाक सध्या शेतकरी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना करताना दिसत आहे. मात्र सर्व्हेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात काहीच नसल्याने तेही निमुटपणे निघून जात आहे.केंद्र शासनाने वर्षभरापूर्वी किसान सन्मान योजना जाहीर केली. तीन टप्प्यात दोन-दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये अनुदान मिळणार होते. मात्र त्यातीलही एक दमडीही अद्याप मिळालेली नाही. म्हणायला केवळ यादी तयार करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचा शासकीय कामावर कायमचा विश्वासच उडाला आहे. यावर्षीच्या सततच्या पावसामुळे पीक परिस्थिती नाजूक असताना परतीच्या पावसाने उभे पीक आडवे केले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शेतकरी पुन्हा कामाला लागला. मात्र आता त्याचे पूर्णपणे कंबरडे मोडले आहे. ना सोयाबीनची साथ ना कापसाची अशी अवस्था झाली आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील शेत पिकांची पुरती दाणादाण उडाली आहे. कोरपना तालुक्यात ३१ हजार २०६ हेक्टरवर कापूस, ५ हजार ६९८ हेक्टरवर सोयाबीन, २ हजार ९२७ हेक्टरवर तूर लागवड करण्यात आली आहे. मात्र यातील अधिकाधिक क्षेत्रात पीक नुकसानीचा आकडा मोठा आहे.कापूस खरेंद्री केंद्रावर शुकशुकाटकापूस उत्पादनासाठी कोरपना तालुका प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे अनेक कापूस खरेदी केंद्र आहे. यावर्षी मात्र दिवाळी संपली असतानाही कापसाची आवक झालीच नाही. यावषीचा हंगाम थंडा जाणार अशी भिती व्यापाºयांनाही सतावत आहे.तातडीने पंचनामे करण्यासाठीजि.प. अध्यक्ष यंत्रणेसह बांधावरचंद्रपूर : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे शासकीय यंत्रणेसह जिल्हाभर बांधावर जावून शेतकऱ्यांची अवस्था जाणून घेत आहे. एवढेच नाही तर अधिकाऱ्यांना पंचनामा त्वरित करण्याच्यासूेचनाही दिल्या आहेत. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्याचे पालकंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आहे. त्यांनीही पंचनामे करण्याचे निर्देश शासकीय यंत्रणेला दिले आहेत. पाहणी दरम्यान सर्व शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शेतकऱ्यांनी दिले आहे.पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्याचे सोयाबीन, धान, कापूस व भाजीपाला इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असुन, हाती आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांसमोर आलेले अस्मानी संकटामध्ये शेतकऱ्यांना त्वरित मदत कशी देता येईल, यासाठी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे चंद्रपूर जिल्ह्यातील विविध गावांना भेट देत आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेतील इतरही पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरु केली आहे. यामध्ये ब्रह्मपुरीपासून जिवतीपर्यंत सर्वच तालुक्यातील गावागावांत सर्वेक्षणही सुरु केले असून मदत मिळेल,अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेती