शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST

चंद्रपूर : यावर्षी अगदी मृग नक्षत्रामध्येच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. सर्व दु:ख विसरून, इकडून-तिकडून पैशाची ...

चंद्रपूर : यावर्षी अगदी मृग नक्षत्रामध्येच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. सर्व दु:ख विसरून, इकडून-तिकडून पैशाची जुळवाजुळव करून पेरणी केली. मात्र, पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून सोयाबीन तसेच अन्य पिकांची वाढ खुंटली आहे. दरम्यान, दुबार पेरणी करण्याची वेळ आल्यास करायचे काय, असा प्रश्न असून सांग, सांग भोलनाथ पाऊस पडेल काय, अशी विचारणा सद्यस्थितीत शेतकरी करीत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात धान, सोयाबीन, कापूस यासह अन्य पिकांची लागवड केली जाते. कपाशीला नियमित तर सोयाबीनला मध्य स्वरुपाचा पाऊस पाहिजे आहे. विशेषत: धान पट्ट्यामध्ये अधिक पावसाची गरज आहे. यावर्षी पावसाने अगदी मृगात हजेरी लावली. त्यामुळे प्रत्येकांच्याच आशा पल्लवीत झाल्या. हवामान खात्यानेही यावर्षी भरपूर पाऊस कोसळेल, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, यावर्षी तो खोटा ठरत आहे. मागील आठवडाभर तर उकाड्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले. रविवारी तसेच सोमवारी आकाशात ढग झाले. मात्र, ढगांच्या तुलनेत पाऊस कोसळलाच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची निराशा झाला आहे.

जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात कपाशीची पेरणी करण्यात आली. मात्र, योग्य आणि नियमित पाऊस नसल्याने कपाशीची वाढ खुंटली आहे. त्यातच काही शेतकऱ्यांनी खताची मात्राही दिली आहे. त्यामुळे कपाशी जळणार तर नाही ना, अशी भीती आहे. तर सोयाबीनची अवस्था बिकट आहे. काही शेतात सोयाबीन उगवले. मात्र, सध्या पावसाअभावी तो कोमेजला आहे. तर काही ठिकाणी भरपूर पावसाअभावी ते उगवलेच नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागेल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पावसासाठी सध्या शेतकरी आकाशाकडे टक लावून बसले आहेत.

बाॅक्स

सोयाबीनचा पेरा वाढला

जिल्हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, काही तालुक्यात कापूस तसेच सोयाबीनची पेरणी केली जाते. कापूस पेरणीनंतर मशागतीचा मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्यातच मजूरसुद्धा भरपूर प्रमाणात लागतात. त्या तुलनेमध्ये कापसाचे उत्पन्न तसेच भावसुद्धा नसल्यामुळे शेतकरी आता कमी खर्चाच्या पिकांकडे वळले असून यामध्ये सोयाबीनला अधिक महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला आहे.

बाॅक्स

तर दुबार पेरणी...

मृगात पाऊस कोसळल्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांनी लगबग करीत पेरणी केली. त्यामुळे कपाशीचे बऱ्यापैकी पीक आहे. मात्र, सोयाबीनची वाढ पाहिजे तशी झाली नसल्याने तसेच काहींच्या शेतातील सोयाबीन पावसाअभावी उगवलेच नसल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

कोट

देव अशी परीक्षा का घेतो

दरवर्षी या ना त्या कारणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. यावर्षी पाऊस भरपूर कोसळेल, असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला होता. मात्र, यावर्षी पावसाने दगा दिला. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. खत, बी-बियाणे महागले आहे. त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची जगायचे तरी कसे, असा प्रश्न आहे.

-दादा चहारे, चंद्रपूर

कोट

दिवसेंदिवस शेती परवडत नाही. सर्वच महाग झाले आहे. त्यातच निसर्गसुद्धा साथ देत नाही. एखाद्या वर्षी निसर्गाने साथ दिली तर सरकार शेतपिकाला भाव देत नाही. त्यामुळे शेती करणे सोडून द्यावे वाटते. सरकारने शेतपिकांना योग्य भाव तसेच सिंचनाची सुविधा करून दिल्यास काही प्रमाणात लाभ मिळू शकेल.

दिवाकर मडावी, चंद्रपूर

बाॅक्स

जिल्ह्यातील सध्याची स्थिती

आतापर्यंत अपेक्षित पाऊस-११९६

प्रत्यक्ष झालेला पाऊस-३०९.३

आतापर्यंत झालेली पेरणी

--